शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी बसले पुन्हा उपोषणावर

By admin | Updated: December 16, 2015 02:05 IST

न्याय मिळावा यासाठी मागील जुलै महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणावर बसलेल्या गोरेगाव ...

मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला ठिय्या गोंदिया: न्याय मिळावा यासाठी मागील जुलै महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणावर बसलेल्या गोरेगाव तालुक्यातील भंडगा येथील कोमलप्रसाद देवकरण कटरे या शेतकऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांनी समस्येचे निराकरण करण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र अद्याप कसलीच कारवाई करण्यात आली नसून जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन फुसके बार ठरल्याचे दिसत आहे. त्यामुळे कटरे यांनी सोमवारपासून (दि.१४) पु्न्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला असून, आपल्या मागण्यांसदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे. कटरे यांनी भूमीअभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार व अतिक्रमणकर्र्त्याच्या आडकाठी धोरणामुळेच त्रस्त होऊन भुमी अभिलेख अधिकारी व अतिक्रमणकर्त्यांवर कारवाई करण्यात यावी व अतिक्रमण केलेली जमीन सरकार जमा करावी या मागणीसाठी जुलै महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी उपोषणाची दखल घेऊन १५ दिवसांच्या आत न्याय मिळवून देऊ असे लेखी आश्वासन दिल्याने कटरे यांनी उपोषण मागे घेतले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गोरेगावचे संबंधित भूमी अभिलेख उपअधीक्षक यांना कटरे यांच्या प्रकरणाची योग्य चौकशी करुन समस्या सोडविण्याचे आदेश दिले होते. मात्र उपअधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करीत कसलीच कारवाई न करता न्यायालयाचे कसलेच आदेश नसताना कटरे यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या प्रकरणाला आता पाच महिन्यांचा कालावधी लोटत असून अतिक्रमणकर्त्यांने कटरे यांना शेतात जाऊ न दिल्याने यंदा खरीप हंगामात त्यांना पिक घेता आले नाही. तर याप्रकरणी स्थानिक तहसीलदारांना मौक्यावर येऊन पंचनामा करण्याची विनंती केली असता तहसीलदारांनी शेताकडे ढुंकृणही बघितले नाही. परिणामी कटरे यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे शेतकरी कटरे यांच्यावर गुन्हा उपोषणावर बसण्याची वेळ आली असून अतिक्रमण करण्यात आलेली ०.४ आर जमीन सरकार जमा करावी, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्या उपअधीक्षकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, पंचनामा न करणारे तहसीलदार यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी या मागणीला घेऊन ते सोमवारपासून (दि.१४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा बेमुदत उपोषणावर बसले आहेत. विशेष म्हणजे कटरे यांच्या शेतात जाणाऱ्या मार्गाजवळच्या ०.१४ हे.आर. सरकारी जमिनीवर द्वारकाप्रसाद दमाहे यांनी अतिक्रमण केले आहे. तर भूमीअभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी हात ओले करुन जमीन दमाहे यांच्या नावाने देखील करुन दिली आहे. त्यामुळे त्या जमिनीवर हक्क दाखवून दमाहे कटरे यांना शेतात जाण्यास मज्जाव करीत आहे. एवढेच नव्हे तर दमाहे यांनी गहेलाटोला ते जानाटोला मार्गावरील सरकारी जमिनीवर देखील अतिक्रमण करुन शेतकऱ्यांवर मज्जाव करण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे कटरे यांचे दोन वर्षांपासून पिकांचे नुकसान होत आहे.