शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:00 IST

रब्बीची धान खरेदी आतापर्यंत सुरु झाली नसल्याने मागील १० दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांचे धान गिरणीच्या परिसरात पडून आहे. अशात अचानक मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना धान खराब होण्याची चिंता वाटत असून त्यांचे धान लवकर काटा करुन खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे.

ठळक मुद्देलवकर काटा करण्यासाठी विनवणी : पुरवठा अधिकाऱ्याला दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : रब्बीची धान खरेदी आतापर्यंत सुरु झाली नसल्याने मागील १० दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांचे धान गिरणीच्या परिसरात पडून आहे. अशात अचानक मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना धान खराब होण्याची चिंता वाटत असून त्यांचे धान लवकर काटा करुन खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली आहे.मागील १० दिवसांपासून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी रब्बी पिकाचे धान सहकारी भात गिरणी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर घेऊन गेले. परंतु संस्थेचे अध्यक्ष बाबुलाल उपराडे यांनी शेतकऱ्यांना सांगितले की सध्या गोदामात खरीप हंगामाचे धान भरलेले असून नवीन आवक झालेले धान मोजून ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाही आहे.अशात तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुरवठा निरीक्षक रमेश कुंभरे यांची भेट घेऊन जुन्या धानाची लवकरात लवकर उचल करुन नवीन धान काटा करायला सुरुवात करावी व धान आपल्या अधीन करावे अशी मागणी केली. धानाची उचल लवकर न केल्यास नुकसान होण्याची शक्यता वर्तविली. शिष्टमंडळात शंकरलाल मडावी, यादनलाल बनोठे, लटारु नागपुरे, परसराम फुंडे यांच्यासह तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी