शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:03 IST

सध्या खरीप हंगाम सुरू असून विविध कंपन्याचे बियाणे बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहे. परिणामी या कंपन्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली असून अधिकाधिक ग्राहक मिळविण्यासाठी या कंपन्यांचे मार्केटिंग प्रतिनिधी सूट देण्याचे कूपन छापून शेतकऱ्यांची दिशाभूल करुन लूट करीत असल्याचा प्रकार सडक अर्जुनी तालुक्यात उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देसूट देण्याचे आमिष : फौजदारी गुन्हा दाखल करा, शेतकऱ्यांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सध्या खरीप हंगाम सुरू असून विविध कंपन्याचे बियाणे बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहे. परिणामी या कंपन्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली असून अधिकाधिक ग्राहक मिळविण्यासाठी या कंपन्यांचे मार्केटिंग प्रतिनिधी सूट देण्याचे कूपन छापून शेतकऱ्यांची दिशाभूल करुन लूट करीत असल्याचा प्रकार सडक अर्जुनी तालुक्यात उघडकीस आला आहे.सडक अर्जुनी तालुक्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. हीच बाब हेरुन विविध बियाणे कंपन्या सुध्दा खरीप हंगामाच्या तोंडावर सक्रीय झाल्या आहेत. खरीपासाठी शेतकऱ्यांना लागणाऱ्या धानाच्या बियाणांची गरज लक्षात घेवून वर्धा येथील यशोदा सिड्स कंपनीच्या एजंटनी तालुक्यातील अनेक शेतकºयांकडून यशोदा १३१२, अहिल्या, हरिमाऊली, अंबिका, चायना राईस, आर.एच.१० या प्रजातीच्या धानाची बुंकीग करुन घेतली.ज्या शेतकºयांनी या धानाची बुंकीग केली त्या शेतकºयांना धानाच्या प्रती बॅगवर १५० रुपयांची सूट मिळेल यासंबंधिचे एक कूपन दिले आहे. शिवाय हे कूपन ज्या कृषी केंद्रातून शेतकरी धानाची खरेदी करतील त्या दुकानातून त्यांना सूट दिली जाईल असे सांगितले जात आहे. या कंपनीच्या एजंटनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेकडो शेतकºयांना कुपनचे वितरण करुन बुकींग करुन घेतले. शेतकऱ्यांनी सुध्दा बियाणे खरेदी करताना आपले चारपाचशे रुपये वाचतील या आशेने धानाची बुकींग करुन घेतली.मात्र प्रत्यक्षात जेव्हा शेतकरी हे कुपन घेवून कृषी केंद्रात धानाचे बुकींग करण्यासाठी जात आहेत तेव्हा त्यांना सदर दुकानदार या कंपनीचे बियाणे घेतल्यानंतर सुध्दा कुठलीच सूट देत नसल्यानंतर शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येत आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील दिलीप गायकवाड, परसराम राऊत, गोपी भोयर, राजाराम झिंगरे, यशवंत गायकवाड, भाऊराव शेंडे, प्रल्हाद गायकवाड, सुभाष बागडे, छगनलाल खोब्रागडे या शेतकऱ्यांनी या कंपनीचे बियाणे खरेदी करुन सुध्दा त्यांना दिलेल्या कूपननुसार सूट देण्यात आली नाही.त्यामुळे त्यांनी याची कृषी विभागाकडे तक्रार करुन सदर कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.एकाच कंपनीच्या बियाण्यांचे भिन्न दरकंपनी कुठलीही असली तरी त्या बियाणांचे दर सर्वच दुकानात एकसारखे असण्याची गरज आहे. मात्र यशोदा कंपनीच्या बियाणांचे दर कृषी केंद्र संचालक आपल्या मनमर्जीने आकारात आहे.प्रती बॅग मागे बियाणांच्या दरात ७० ते ८० रुपयांची तफावत असून शेतकऱ्यांची दिशाभूल व लूट केली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.कृषी विभागाचे भरारी पथके गायबखरीप हंगामाला सुरूवात झाली असून विविध कंपन्याचे बियाणे बाजारात आले आहे. त्यामुळे शेतकºयांची दिशाभूल होवू नये यासाठी कृषी विभागाच्या भरारी पथकाने शोध मोहीम राबवून अशा बियाणे कंपन्यांवर कारवाही करण्याची गरज आहे. मात्र जिल्ह्यातून कृषी विभागाचे भरारी पथकच गायब झाले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.स्थायी समितीत मांडणार मुद्दाजिल्ह्यातील काही कृषी केंद्र संचालकाकडून आणि बियाणे कंपन्याकडून शेतकºयांची सरार्सपणे दिशाभूल केली जात आहे. मात्र अद्यापही एकाही केंद्रावर कारवाही करण्यात आली नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या भुमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे बुधवारी आयोजित स्थायी समितीच्या सभेत हा मुद्दा उपस्थित करुन सदर कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती