शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:03 IST

सध्या खरीप हंगाम सुरू असून विविध कंपन्याचे बियाणे बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहे. परिणामी या कंपन्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली असून अधिकाधिक ग्राहक मिळविण्यासाठी या कंपन्यांचे मार्केटिंग प्रतिनिधी सूट देण्याचे कूपन छापून शेतकऱ्यांची दिशाभूल करुन लूट करीत असल्याचा प्रकार सडक अर्जुनी तालुक्यात उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देसूट देण्याचे आमिष : फौजदारी गुन्हा दाखल करा, शेतकऱ्यांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सध्या खरीप हंगाम सुरू असून विविध कंपन्याचे बियाणे बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहे. परिणामी या कंपन्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली असून अधिकाधिक ग्राहक मिळविण्यासाठी या कंपन्यांचे मार्केटिंग प्रतिनिधी सूट देण्याचे कूपन छापून शेतकऱ्यांची दिशाभूल करुन लूट करीत असल्याचा प्रकार सडक अर्जुनी तालुक्यात उघडकीस आला आहे.सडक अर्जुनी तालुक्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. हीच बाब हेरुन विविध बियाणे कंपन्या सुध्दा खरीप हंगामाच्या तोंडावर सक्रीय झाल्या आहेत. खरीपासाठी शेतकऱ्यांना लागणाऱ्या धानाच्या बियाणांची गरज लक्षात घेवून वर्धा येथील यशोदा सिड्स कंपनीच्या एजंटनी तालुक्यातील अनेक शेतकºयांकडून यशोदा १३१२, अहिल्या, हरिमाऊली, अंबिका, चायना राईस, आर.एच.१० या प्रजातीच्या धानाची बुंकीग करुन घेतली.ज्या शेतकºयांनी या धानाची बुंकीग केली त्या शेतकºयांना धानाच्या प्रती बॅगवर १५० रुपयांची सूट मिळेल यासंबंधिचे एक कूपन दिले आहे. शिवाय हे कूपन ज्या कृषी केंद्रातून शेतकरी धानाची खरेदी करतील त्या दुकानातून त्यांना सूट दिली जाईल असे सांगितले जात आहे. या कंपनीच्या एजंटनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेकडो शेतकºयांना कुपनचे वितरण करुन बुकींग करुन घेतले. शेतकऱ्यांनी सुध्दा बियाणे खरेदी करताना आपले चारपाचशे रुपये वाचतील या आशेने धानाची बुकींग करुन घेतली.मात्र प्रत्यक्षात जेव्हा शेतकरी हे कुपन घेवून कृषी केंद्रात धानाचे बुकींग करण्यासाठी जात आहेत तेव्हा त्यांना सदर दुकानदार या कंपनीचे बियाणे घेतल्यानंतर सुध्दा कुठलीच सूट देत नसल्यानंतर शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येत आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील दिलीप गायकवाड, परसराम राऊत, गोपी भोयर, राजाराम झिंगरे, यशवंत गायकवाड, भाऊराव शेंडे, प्रल्हाद गायकवाड, सुभाष बागडे, छगनलाल खोब्रागडे या शेतकऱ्यांनी या कंपनीचे बियाणे खरेदी करुन सुध्दा त्यांना दिलेल्या कूपननुसार सूट देण्यात आली नाही.त्यामुळे त्यांनी याची कृषी विभागाकडे तक्रार करुन सदर कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.एकाच कंपनीच्या बियाण्यांचे भिन्न दरकंपनी कुठलीही असली तरी त्या बियाणांचे दर सर्वच दुकानात एकसारखे असण्याची गरज आहे. मात्र यशोदा कंपनीच्या बियाणांचे दर कृषी केंद्र संचालक आपल्या मनमर्जीने आकारात आहे.प्रती बॅग मागे बियाणांच्या दरात ७० ते ८० रुपयांची तफावत असून शेतकऱ्यांची दिशाभूल व लूट केली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.कृषी विभागाचे भरारी पथके गायबखरीप हंगामाला सुरूवात झाली असून विविध कंपन्याचे बियाणे बाजारात आले आहे. त्यामुळे शेतकºयांची दिशाभूल होवू नये यासाठी कृषी विभागाच्या भरारी पथकाने शोध मोहीम राबवून अशा बियाणे कंपन्यांवर कारवाही करण्याची गरज आहे. मात्र जिल्ह्यातून कृषी विभागाचे भरारी पथकच गायब झाले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.स्थायी समितीत मांडणार मुद्दाजिल्ह्यातील काही कृषी केंद्र संचालकाकडून आणि बियाणे कंपन्याकडून शेतकºयांची सरार्सपणे दिशाभूल केली जात आहे. मात्र अद्यापही एकाही केंद्रावर कारवाही करण्यात आली नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या भुमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे बुधवारी आयोजित स्थायी समितीच्या सभेत हा मुद्दा उपस्थित करुन सदर कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती