शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेवर शेतकऱ्यांचा आक्रोश

By admin | Updated: September 20, 2014 23:53 IST

बेरडीपार येथे ग्रामस्तरावर कार्यरत असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभेत शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या लाभासंबंधी लुबाडणूक होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

काचेवानी : बेरडीपार येथे ग्रामस्तरावर कार्यरत असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सभेत शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या लाभासंबंधी लुबाडणूक होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुखदेव बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी भूवन कापसे, गणेश कोल्हटकर, गोविंद ठाकरे, मोहपत टेंभेकर, नारायण पटले, नकटू कटरे, जयप्रकाश गौतम, छगनलाल कृपाले, इम्रता पारधी व गीता कटरे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक गटसचिव आर.एम. पटले यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांनी विविध सेवा सहकारी संस्थेने सर्व सभासदांना अहवाल पुस्तिका द्यावी, अशी मागणी केली. मागील पाच वर्षांपासून शेतकरी कोणत्या ना कोणत्या संकटात सापडत आहे. पण शासनाने हवे तसे सहकार्य केले नाही. तसेच त्याबाबत संस्थेने पाठपुरावा केल्या नसल्याचा आरोप केला. गेल्या पाच वर्षांपासून पीक विमा योजनेच्या नावावर लाखो रूपये शेतकऱ्यांपर्यंत गडप करण्यात आले. सेवा सहकारी संस्थेने शेतकऱ्यांना लुबाडण्यापूरता दिलासा दिला. मात्र या काळात टंचाई परिस्थिती निर्माण झाल्यावरही पीक विम्याचा लाभ देण्यात आलेला नाही. तसेच संस्थेने शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न केले नाही. शिवाय विमा कंपनीच्या दलालीत सेवा सहकारी सोसायटी सहभागी असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यामाने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा वेळेवर पुरविण्यात येत असल्या तरी यातून ते कर्जबाजारीच होत आहे. पीक विमा योजना ही फसवेगिरी करणारी योजना असल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखविले. यावेळी माजी उपसरपंच धनराज पटले यांनी शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी व समस्यांवर चर्चा घडवून आणली. आपल्या अध्यक्षीय भाषणात बिसेन यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. पीक कर्ज प्रत्येक वर्षी देण्यात येते. मागणी करणाऱ्यांना वंचित करण्यात आले नाही. कर्जाची वसुली सर्व सभासदांनी वेळेच्या आत दिल्याने सवलतींचा लाभ मिळेल. तसेच पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सेवा सहकारी संस्थेने पीक विमा काढण्याच्या प्रयत्नाकडे दुर्लक्ष केले. ६०० सभासदांपैकी १६० सभासदांनी पीक विमा काढल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संचालक मंडळासह गावातील ३०० शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)