शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

धान पिकावरील रोगराईने शेतकरी हवालदिल

By admin | Updated: October 18, 2015 02:07 IST

पावसाने दगा दिल्यावरही शेतकऱ्यांनी कशी तरी रोवणी केली.एवढे करून हाती काहीतरी येणार असल्याची आशा बाळगून असतानाच धानावर रोगराई लागल्याने शेतकरी मात्र हवालदील झाला आहे.

मुंडिकोटा : पावसाने दगा दिल्यावरही शेतकऱ्यांनी कशी तरी रोवणी केली.एवढे करून हाती काहीतरी येणार असल्याची आशा बाळगून असतानाच धानावर रोगराई लागल्याने शेतकरी मात्र हवालदील झाला आहे. निसर्गाने पुन्हा शेतकऱ्यांना झोडपून काढले असून डोळ्यांसमोर धान पीक खराब होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहे. तिरोडा तालुक्यात शेती हाच मुख्य व्यवसाय असून मोठया प्रमाणात शेतकरी आजही पारंपारिक व्यवसायावरच निर्भर आहेत. यंदा मात्र पावसाने चांगलीच खेळी केली. मात्र कसे तरी शेतकऱ्याने घाम गाळून रोवणी करून धानाचे पीक घेतले. आता मात्र धान पिकावर मोठ्या प्रमाणात किडी व रोगराई लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता धान पीक निघूनही शेतकऱ्याला हाती काहीच लागणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पिकाला रोगराईपासून वाचविण्यासाठी शेतकरी किटकनाशकांचा वापर करीत आहे. मात्र त्यांचाही काहीच फायदा दिसत नसून कधी कोणती अळी व रोगराई हल्ला करणार याच भितीत शेतकरी वावरत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी कन्हान -कामठी वरून औषधी आणली, मात्र त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे शेतकरी बोलत आहेत. विशेष म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी १०१० धान लावले आहे. हे उच्च प्रतीचे धान असून कमी प्रमाणात घेतले आहे. या धानाला एका पावसाची गरज असतानाच निसर्गाने दगा दिला. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्यांचे धान पीक उत्तम येणार असे दिसत आहे. तर ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही त्यांचे मात्र काही खरे नाही. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना जिल्ह्यातील शेतकरी करीत आहे. जगाचे पोट भरत असताना मात्र त्यालाच दोन वेळचे जेवण कठीण होत आहे. अशा परिस्थितीत शेती करणे परवडणारे राहिलेले नाही. मात्र पारंपारिक व्यवसाय असल्याने करावाच लागत आहे. त्यात मात्र निसर्गानेच साथ दिल्यावर आता शेतकऱ्यांचा कैवारी कुणीच उरलेला नाही. त्यामुळे तो चिंताग्रस्त आहे. (वार्ताहर)