शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
3
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
4
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
5
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
6
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
7
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
8
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
9
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?
10
नीरेचा नदीकाठ आक्रोशाने गहिवरला; 36 तासानंतर सापडला आजीसोबत पंढरपूरला निघालेल्या गोविंदाचा मृतदेह
11
“तळीये गावातील दरडग्रस्त कुटुंबियांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे”; अंबादास दानवेंची मागणी
12
Vastu Tips: शुक्रवारी बांबूचे रोप आणा घरी, लक्ष्मी कुबेर येतील दारी; चुकवू नका योग्य दिशा!
13
Sonam Raghuwanshi : "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप
14
Royal Enfield: रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'या' धमाकेदार बाईकची विक्री पुन्हा सुरू!
15
अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाला आणखी एक धक्का! दिल्ली-वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द
16
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
17
"माझा एक मित्र लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाट्टेल ते करतो..." , कोणाबद्दल बोलतोय प्रियदर्शन जाधव?
18
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
19
डाबर च्यवनप्राशची बदनामी; रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका! काय दिले आदेश?
20
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

धान पिकावरील रोगराईने शेतकरी हवालदिल

By admin | Updated: October 18, 2015 02:07 IST

पावसाने दगा दिल्यावरही शेतकऱ्यांनी कशी तरी रोवणी केली.एवढे करून हाती काहीतरी येणार असल्याची आशा बाळगून असतानाच धानावर रोगराई लागल्याने शेतकरी मात्र हवालदील झाला आहे.

मुंडिकोटा : पावसाने दगा दिल्यावरही शेतकऱ्यांनी कशी तरी रोवणी केली.एवढे करून हाती काहीतरी येणार असल्याची आशा बाळगून असतानाच धानावर रोगराई लागल्याने शेतकरी मात्र हवालदील झाला आहे. निसर्गाने पुन्हा शेतकऱ्यांना झोडपून काढले असून डोळ्यांसमोर धान पीक खराब होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहे. तिरोडा तालुक्यात शेती हाच मुख्य व्यवसाय असून मोठया प्रमाणात शेतकरी आजही पारंपारिक व्यवसायावरच निर्भर आहेत. यंदा मात्र पावसाने चांगलीच खेळी केली. मात्र कसे तरी शेतकऱ्याने घाम गाळून रोवणी करून धानाचे पीक घेतले. आता मात्र धान पिकावर मोठ्या प्रमाणात किडी व रोगराई लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता धान पीक निघूनही शेतकऱ्याला हाती काहीच लागणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पिकाला रोगराईपासून वाचविण्यासाठी शेतकरी किटकनाशकांचा वापर करीत आहे. मात्र त्यांचाही काहीच फायदा दिसत नसून कधी कोणती अळी व रोगराई हल्ला करणार याच भितीत शेतकरी वावरत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी कन्हान -कामठी वरून औषधी आणली, मात्र त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे शेतकरी बोलत आहेत. विशेष म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी १०१० धान लावले आहे. हे उच्च प्रतीचे धान असून कमी प्रमाणात घेतले आहे. या धानाला एका पावसाची गरज असतानाच निसर्गाने दगा दिला. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्यांचे धान पीक उत्तम येणार असे दिसत आहे. तर ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही त्यांचे मात्र काही खरे नाही. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना जिल्ह्यातील शेतकरी करीत आहे. जगाचे पोट भरत असताना मात्र त्यालाच दोन वेळचे जेवण कठीण होत आहे. अशा परिस्थितीत शेती करणे परवडणारे राहिलेले नाही. मात्र पारंपारिक व्यवसाय असल्याने करावाच लागत आहे. त्यात मात्र निसर्गानेच साथ दिल्यावर आता शेतकऱ्यांचा कैवारी कुणीच उरलेला नाही. त्यामुळे तो चिंताग्रस्त आहे. (वार्ताहर)