शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
8
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
9
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
10
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
11
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
12
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
13
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
14
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
15
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
16
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
17
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
18
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
19
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
20
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी

घुमर्रा येथील शेतकरी बसणार उपोषणावर

By admin | Updated: November 11, 2016 01:29 IST

तब्बल मागील २० वर्षापासून गोरेगाव तालुक्यातील घुमर्रा येथील भूमिहीन गरीब शेतकऱ्यांना अजूनही शेतीचा मोबदला

मोबदल्याची प्रतीक्षा : २० वर्षांपासून प्रशासनाकडून दुर्लक्षगोंदिया : तब्बल मागील २० वर्षापासून गोरेगाव तालुक्यातील घुमर्रा येथील भूमिहीन गरीब शेतकऱ्यांना अजूनही शेतीचा मोबदला मिळाला नसल्यामुळे येत्या १५ डिसेंबरनंतर गोंदिया येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.गोरेगाव तालुक्यातील घुमर्रा येथील ७३ शेतकऱ्यांना भूमिहीन करुन त्यांच्या सुपीक जमिनी हस्तांतरण केल्यानंतर सन १९९५-१६ मध्ये कलपाथरी मध्यम प्रकल्प म्हणून बांध बांधण्यात आला. शेती हस्तांतरण करताना शासनाच्या कर्मचाऱ्यांपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत या सर्वांनी शेतकऱ्यांना तुम्ही आता भूमिहीन होत असल्यामुळे दोन किंवा तीन वर्षात तुम्हाला शेतीचा मोबदला दुप्पट भावाने राशी मिळेल असे सांगितले. एवढेच नाही तर कायमस्वरुपी शेती गेल्यामुळे तुमच्या परिवारातील प्रत्येकी एकाला शिक्षणानुसार शासकीय नोकरी पण मिळेल, अशी हमी देत मध्यम प्रकल्प बांधाची पाळ बांधण्यासाठी सुपिक शेती हस्तांतरण केली. पण शासकीय नोकरी तर मिळाली नाहीच, परंतु मोबदला राशीही पुरेशी मिळाली नाही. टप्प्याटप्प्याने मिळालेला मोबदला सुपीक जमिनीऐवजी पडीत शेतीच्या भावाने प्रतिएकर ४० हजाराच्या दराने देऊन ज्यांनी स्वत: भूमिहिन होऊन दुसऱ्यांना उज्वल भविष्यासाठी आपली शेती दिली, अशा अन्नदाता शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आली. वाटल्यास बांधातील पाणी साठवण्यासाठी इतर बाहेरील शेतकऱ्यांना बुडीत शेतीचा मोबदला त्या सर्वांना केव्हाचाच दुप्पट भावाने मिळाला ही वास्तविकता आहे.या सर्व घडामोडीवर पुन्हा १५ आॅक्टोबर २०१५ या जावक तारखेनुसार मागील वर्षी तिरोडा येथील उपविभागीय अधिकारी तथा भूअर्जन अधिकारी यांच्याकडून पुनर्वसन अनुदान मिळण्याबाबतचे पत्र घुमर्रा येथील ७३ शेतकऱ्यांना मिळाले. ज्याप्रमाणे ७३ शेतकऱ्यांपैकी ६० शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे सादर करुन सुद्धा दर महिन्याला ७० किलोमीटर जाणे आणि परत येणे सतत असे १४० किमीचा प्रवास करुन सुद्धा अजुनही संबंधित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही.या सर्व संबंधात ७ नोव्हेंबरला पुन्हा तिरोडा येथील उपविभागीय अधिकारी तथा भूअर्जन अधिकारी सुनील सूर्यवंशी यांची घुमर्रा येथील सदर शेतकऱ्यांनी भेट घेतली असता त्यांनी एक महिन्याची मुदत मागितली आहे. परंतु यानंतरही अनुदान व मिळाल्यास १५ डिसेंबरनंतर गोंदिया येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणावर बसणार असल्याची माहिती सेवकराम कटरे, रमेश कटरे, हरिचंद फुंडे, सोमराज लांजेवार, तिलकचंद पटले, गोपाल बिसेन, लोकचंद पटले, नेतराम चौधरी, हेतराम कटरे, गुणवंत मानकर, नरेंद्र चौधरी, युवराज बिसेन, चैतराम पटले, रमेश चन्ने आणि सुरेश चन्ने या भूमिहिन झालेल्या शेतकऱ्यांनी दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)