शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

‘अच्छे दिन’च्या नावावर शेतकऱ्यांची फसवणूक

By admin | Updated: June 27, 2015 02:24 IST

मोदी सरकारने अच्छे दिन, मन की बात, प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये, शेतकऱ्यांच्या मालाला भाव,

राधाकृष्ण विखे पाटील : भ्रष्टाचारी सरकारची करामतसडक अर्जुनी : मोदी सरकारने अच्छे दिन, मन की बात, प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये, शेतकऱ्यांच्या मालाला भाव, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू अशा जनतेला भूलथापा देवून खोटे बोलून ‘अच्छे दिन’च्या नावावर शेतकरी व जनतेची फसवणूक केली आहे. आता त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. अशा थापाबाज सरकारला त्यांची जागा दाखवून जि.प. व पं.स.मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारांनाच निवडून द्या, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. सदर सभेला मार्गदर्शन करताना विखे पाटील म्हणाले, या सरकारमध्ये दररोज भ्रष्टाचार होत आहे. स्मृती इरानी, सुषमा स्वराज, वसुंधरा राजे आणि पंकजा मुंडे यांचा ‘चिक्की घोटाळा’ समोर आला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावाडे यांची डिग्री बोगस आहे. यावरून विद्यार्थ्यांनी कोणता आदर्श घ्यावा? असा टोलाही त्यांनी लावला. या प्रचार सभेला आ.सुनील केदार, माजी आ.सुभाष धोटे, अमर वऱ्हाडे, शेषराव गिऱ्हेपुंजे, राजेश नंदागवळी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मिताराम देशमुख, अनिल राजगिरे, जि.प.सदस्य जागेश्वर धनभाते, बाबा कटरे, तालुका महिला काँग्रेसचे अध्यक्ष माया चौधरी, काँग्रेस पक्षाचे चिखली जि.प. उमेदवार माधुरी कोरे, पं.स. चिखलीचे उमेदवार मधुसूदन दोनोडे, कोकणाचे पं.स. उमेदवार शिवदास साखरे मंचावर उपस्थित होते. सभेला मार्गदर्शन करताना आ.केदार म्हणाले, धानाच्या विषयावरुन मोदी सरकार गंभीर नाही. सध्या धानाचे भाव कमी आहे. बोनस जाहिर केला, पण तो किती शेतकऱ्यांना मिळाला त्या बोनसचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना होणार आहे. माजी आ.सुभाष धोटे म्हणाले, या सरकारच्या काळात ‘सबका साथ सबका विकास’ असे म्हणून सरकारने सत्ता हस्तगत केली. पण विकास मात्र अंबानी, अदानीचा झाला. सर्वसामान्यांचा नाही. काँग्रेसला भरभरुन यश द्या, असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक राजेश नंदागवळी, संचालन जागेश्वर धनभाते तर आभार दिनेश कोरे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)