शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:41 IST

मागील वर्षी कीडरोगामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान शासनाने कीडरोगामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन अहवाल शासनाकडे पाठविला होता.

ठळक मुद्देसाडेपाच हजार लाभार्थी प्रतीक्षेत : खाते क्रमांक चुकीचे

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : मागील वर्षी कीडरोगामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान शासनाने कीडरोगामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन अहवाल शासनाकडे पाठविला होता. शासनाने कीडरोगामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली. मात्र सहा महिन्याचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याने त्यांची पायपीट सुरू आहे.तालुक्यात मागील वर्षी झालेल्या गारपीट व मावा तुडतुडा या कीडरोगांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर शासनाने प्रत्येक तालुक्यातील पिकांच्या नुकसानीचा अहवाल पाठविण्याचे निर्देश तहसील कार्यालयाला दिले. गोरेगाव तहसील कार्यालयाने याचा अहवाल शासनाकडे पाठविला. मात्र याला सहा महिन्याचा कालावधी लोटूनही ३ हजार ८८० दुष्काळग्रस्त व १६३५ गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. तालुक्यात एकूण १९ हजार ८५२ दुष्काळग्रस्त लाभार्थी आहेत. यासाठी तहसील कार्यालयाला ७२ लाख १६ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला. त्यापैकी १५ हजार ९७२ लाभार्थ्यांना सहा कोटी ३८ लाख ९९ हजार ४८४ रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वळता करण्यात आला. मात्र अद्यापही ३ हजार ८८० लाभार्थी शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत असून त्यांना १ कोटी ३३ लाख १६ हजार ५१६ रुपये मिळणे बाकी आहे. तर गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाईसाठी १ कोटी ८३ लाख १६ हजार ८८२ निधी प्राप्त झाला. यातील चार हजार ३३४ लाभार्थ्यांपैकी केवळ २ हजार ६९९ लाभार्थ्यांना १ कोटी १३ लाख ९१ हजार ६०४ वाटप करण्यात आल. तर १६३५ लाभार्थ्यांना ६ कोटी ९२ लाख ५ हजार २७८ एवढ्या रक्कमेचे वाटप होणे बाकी आहे. तर मावा तुळतुडा या कीडरोगांच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गोरेगाव तहसील कार्यालयाला २४ व २५ मे रोजी ३ कोटी ६३ लाख ६५ हजार ८५६ रुपये प्राप्त झाले.नुकसान भरपाईसाठी १५ हजार ७४० शेतकरी पात्र ठरले होते. त्यातील १२ हजार ३२० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित ३ हजार ३२० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्यापही पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांची तहसील कार्यालय आणि बँकामध्ये पायपीट सुरू आहे.शेतकरी लाभार्थ्यांनी चुकीचे बँक खाते क्रमांक व काही लाभार्थ्यांच्या खात्यात त्रुट्या असल्यामुळे पैसे जमा करण्यास अडचण होत आहे. लवकरच त्रृट्या दूर करुन लाभ देण्यात येईल.-अरविंद हिंगे,तहसीलदार, गोरेगाव

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती