शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:41 IST

मागील वर्षी कीडरोगामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान शासनाने कीडरोगामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन अहवाल शासनाकडे पाठविला होता.

ठळक मुद्देसाडेपाच हजार लाभार्थी प्रतीक्षेत : खाते क्रमांक चुकीचे

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : मागील वर्षी कीडरोगामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान शासनाने कीडरोगामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन अहवाल शासनाकडे पाठविला होता. शासनाने कीडरोगामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली. मात्र सहा महिन्याचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याने त्यांची पायपीट सुरू आहे.तालुक्यात मागील वर्षी झालेल्या गारपीट व मावा तुडतुडा या कीडरोगांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर शासनाने प्रत्येक तालुक्यातील पिकांच्या नुकसानीचा अहवाल पाठविण्याचे निर्देश तहसील कार्यालयाला दिले. गोरेगाव तहसील कार्यालयाने याचा अहवाल शासनाकडे पाठविला. मात्र याला सहा महिन्याचा कालावधी लोटूनही ३ हजार ८८० दुष्काळग्रस्त व १६३५ गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. तालुक्यात एकूण १९ हजार ८५२ दुष्काळग्रस्त लाभार्थी आहेत. यासाठी तहसील कार्यालयाला ७२ लाख १६ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला. त्यापैकी १५ हजार ९७२ लाभार्थ्यांना सहा कोटी ३८ लाख ९९ हजार ४८४ रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वळता करण्यात आला. मात्र अद्यापही ३ हजार ८८० लाभार्थी शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत असून त्यांना १ कोटी ३३ लाख १६ हजार ५१६ रुपये मिळणे बाकी आहे. तर गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाईसाठी १ कोटी ८३ लाख १६ हजार ८८२ निधी प्राप्त झाला. यातील चार हजार ३३४ लाभार्थ्यांपैकी केवळ २ हजार ६९९ लाभार्थ्यांना १ कोटी १३ लाख ९१ हजार ६०४ वाटप करण्यात आल. तर १६३५ लाभार्थ्यांना ६ कोटी ९२ लाख ५ हजार २७८ एवढ्या रक्कमेचे वाटप होणे बाकी आहे. तर मावा तुळतुडा या कीडरोगांच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गोरेगाव तहसील कार्यालयाला २४ व २५ मे रोजी ३ कोटी ६३ लाख ६५ हजार ८५६ रुपये प्राप्त झाले.नुकसान भरपाईसाठी १५ हजार ७४० शेतकरी पात्र ठरले होते. त्यातील १२ हजार ३२० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित ३ हजार ३२० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्यापही पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांची तहसील कार्यालय आणि बँकामध्ये पायपीट सुरू आहे.शेतकरी लाभार्थ्यांनी चुकीचे बँक खाते क्रमांक व काही लाभार्थ्यांच्या खात्यात त्रुट्या असल्यामुळे पैसे जमा करण्यास अडचण होत आहे. लवकरच त्रृट्या दूर करुन लाभ देण्यात येईल.-अरविंद हिंगे,तहसीलदार, गोरेगाव

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती