शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतकऱ्यांचा प्रयोग ठरतोय प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

शासनाच्या शेततळे योजनेंतर्गत तालुक्यात कृषी विभागाच्यावतीने शेततळे व बोडी शेतकऱ्यांच्या शेतात तयार करण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून इतरत्र पीक व उत्पादन घ्यावे असा उद्देश शासनाचा आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यावर कृषी विभाग खूप भर देत आहे. मागेल त्याला शेततळे व बोडी देण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : सततच्या अस्मानी व अवकाळी संकटांना सामोरे जाणाऱ्यां शेतकऱ्यांना काही तरी जोडधंदा करण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने तालुक्यातील शेतकºयाने मिळालेल्या बोडीत मत्स्यपालन व शिंगाडा उत्पादन करुन शेतीतील तूट भरुन काढली. शिवाय आणखी एक यशस्वी प्रयोग सेंद्रीय भागात पिकाच्या शेतात मस्त्यपालन करुन उत्पन्नात दुपटीने वाढ केली आहे. या प्रयोगातून शेतकºयाने इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.शासनाच्या शेततळे योजनेंतर्गत तालुक्यात कृषी विभागाच्यावतीने शेततळे व बोडी शेतकऱ्यांच्या शेतात तयार करण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून इतरत्र पीक व उत्पादन घ्यावे असा उद्देश शासनाचा आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यावर कृषी विभाग खूप भर देत आहे. मागेल त्याला शेततळे व बोडी देण्यात आले आहेत. त्यातून ग्राम बिहिरीया येथील शेतकरी डुलीचंद नारायण पटले यांनी पारंपारीक पिकांसह दुसरे पीक घेण्याचा विचार केला. त्यात त्यांनी मिळालेल्या बोडीत मत्स्य जिवांची बिजाई टाकून मत्स्य उत्पादन घेतले.सोबतच शिंगाड्याची शेतीही केली व त्यातून यशस्वीपणे उत्पादन घेवून भात पिकाची तुट भरुन काढली. एवढ्यावरच न थांबता आणखी एका आगळ्यावेगळ्या प्रयोगाची पायाभरणी केली.सेंद्रीय भाताच्या शेतात मत्स्य जिवांची बिजाई घालून भाताबरोबरच मत्स्य उत्पादन हा प्रयोग यशस्वी केला व आपल्या उत्पन्नात दुपटीने वाढ केली. त्यामुळे त्यांच्या या आगळ्या वेगळ्या प्रयोगाची प्रशंसा संपूर्ण जिल्हास्तरावर होत आहे.हा यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच संपूर्ण जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकाºयांनी भेट देवून पाहणी केली.

टॅग्स :Farmerशेतकरी