शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बँकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 23:57 IST

राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केली. यासाठी जिल्ह्यातील ८३ हजार शेतकरी पात्र ठरले होते. मात्र आत्तापर्यंत केवळ ६३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून २० हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देओटीएसधारक शेतकरी अडचणीत : हंगामापासून वंचित राहण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केली. यासाठी जिल्ह्यातील ८३ हजार शेतकरी पात्र ठरले होते. मात्र आत्तापर्यंत केवळ ६३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून २० हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. तर दीड लाखांवर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम बँकाकडे भरली. पण या शेतकऱ्यांना बँका आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने खरीप हंगामाला मुकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.कर्जमाफी योजनेतंर्गत शासनाने दीड लाखांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ केले. तर त्यापेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम भरल्यानंतर त्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाणार होती. तसेच या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी नवीन पीक कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार होते. मात्र कर्जाची परतफेड करणारे शेतकरी आता बँका आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाकडे जात आहे. तेव्हा त्यांना नवीन पीक कर्ज देण्यास नकार दिला जात आहे. हा प्रकार सर्वाधिक तिरोडा तालुक्यात सुरु आहे. बोदलकसा येथील नानकसिंग बघेले, डॉ.नन्हासिंग पटले, कन्हयालाल कटरे,छबिलाल पटले, छत्रपाल बघले यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी सेवा सहकारी सोसायट्याच्या गटसचिवांच्या सांगण्यावरुन ओटीएस अंतर्गत कर्जाची परतफेड केली. आता ते नवीन पीक कर्जाची उचल करण्यासाठी सेवा सहकारी सोसायट्यांकडे गेल्यावर त्यांना कर्जमाफीच्या यादीत तुमचे नाव नसल्याचे सांगून कर्ज देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे नवीन पीक कर्ज मिळेल या आशेवर उधार उसनवारी आणि व्याजाने पैसे आणून शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली. आता मात्र बँका आणि सेवा सहकारी सोसायट्यांकडून कर्ज मिळणार नसल्याचे सांगून त्यांची आर्थिक कोंडी केली जात आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांवर खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.कर्जवसुलीसाठी लढविली शक्कलग्रामीण भागातील शेतकरी सर्वाधिक पीक कर्जाची उचल जिल्हा बँक आणि सेवा सहकारी सोसायट्यांकडून करतात. त्यामुळे यांच्या थकीतबाकीदार सभासद शेतकºयांची संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणावर आहे. सेवा सेहकारी सोसायट्याच्या गटसचिवांनी शेतकऱ्यांकडून थकीत कर्ज वसूल करण्यासाठी तुमचे नाव कर्जमाफीच्या ग्रीन यादीत असल्याचे सांगितले. तसेच तुम्ही कर्जाची परतफेड केल्यास तुम्हाला कर्जमाफीचा लाभ आणि नवीन पीक कर्ज मिळेल असे आश्वासन दिले. मात्र आता या शेतकऱ्यांची नावच ग्रीन यादीत नसल्याने त्यांना नवीन पीक कर्ज देण्यास नकार देत असल्याची माहिती आहे.शेतकरी काढणार जिल्हा बँकेवर मोर्चाखरीप हंगामाला सुरूवात होवून महिनाभराचा कालावधी लोटला आहे. मागील आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने रोवणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. मात्र कर्जमाफीस पात्र ठरलेल्या तब्बल २० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे त्यांना नवीन पीक कर्जाची उचल करण्यास अडचण जात आहे. रोवणीसाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. यासर्व समस्यांना घेवून शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेवर मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे.याद्यांच्या विलंबाने समस्येत वाढजवळपास दोन महिन्यांचा कालावधी लोटून जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकाना कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यासाठी दहावी ग्रीन यादी प्राप्त झाली नाही. त्यामुळे बँकाना सदर शेतकऱ्यांचे खाते शून्य करुन नवीन पीक कर्ज देण्यास अडचण जात आहे. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.गटसचिवांनी ग्रीन यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनाच ओटीएस योजनेचा लाभ मिळत असल्याचे सांगावे. ज्यांची नावे ग्रीन यादीत नाही त्यांना कर्जमाफीचा लाभ देता येत नाही. गटसचिवांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास निश्चित कारवाई केली जाईल.- सुरेश टेटे,मुख्यकार्यकारी अधिकारीजिल्हा बँक गोंदिया....................विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या गटसचिवांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास निश्चितच कारवाई करु.- अनिल गोस्वामी,प्रभारी उपनिबंधक गोंदिया.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी