शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
7
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
8
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
9
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
10
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
11
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
12
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
13
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
14
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
15
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
16
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
17
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
18
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
19
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
20
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 22:07 IST

पावसाचे एकापाठोपाठ एक नक्षत्र कोरडे जात असतांना अद्यापही वरुण राजाने दमदार हजेरी लावली नाही. परिणामी पेरणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पाऊस झाला नसला तरी काही शेतकरी धूळ पेरणी करीत आहेत. मात्र यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेरणी करण्यास पुन्हा पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी शिल्लक असून शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा सल्ला : पाऊस लांबल्याने शेतकरी संकटात ,१५ जुलैपर्यंत मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पावसाचे एकापाठोपाठ एक नक्षत्र कोरडे जात असतांना अद्यापही वरुण राजाने दमदार हजेरी लावली नाही. परिणामी पेरणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पाऊस झाला नसला तरी काही शेतकरी धूळ पेरणी करीत आहेत. मात्र यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेरणी करण्यास पुन्हा पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी शिल्लक असून शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ९२ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. धानाचे पऱ्हे टाकण्यासाठी जमिनीत किमान पाच इंचापर्यत ओलावा निर्माण होणे आवश्यक आहे. मात्र यंदा जून महिना पूर्ण लोटत असताना मृगापोठोपाठ आद्रा नक्षत्र सुध्दा कोरडा जात असल्याने शेतकऱ्यांवरील संकटात वाढ झाली आहे. मृगाचा दमदार पाऊस होताच शेतकरी पेरणीला सुरुवात करतात. पण यंदा अद्यापही पावसाने दमदार हजेरी लावली नाही. परिणामी पेरणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. रोज आकाशात ढग दाटून येत आहे मात्र पाऊस पडत नसल्याने वातावरणात सुध्दा उकाडा निर्माण होत आहे. पाऊस लांबत असल्याने पेरण्यांना उशीर होत असून शेतकऱ्यांच्या काळजीत सुध्दा वाढ होत आहे. पेरणीस उशीर झाल्याने रोवणी देखील लांबणार असून यामुळे याचा उत्पादनावर सुध्दा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी विभागाच्या अधिकाºयांनुसार धानाची पेरणी ही १५ जुलैपर्यंत करता येते . त्यामुळे पेरणी करण्यास पुन्हा २० दिवसांचा कालावधी शिल्लक असून शेतकºयांनी पेरणी करण्याची घाई करु नये असे सांगितले. १५ जुलैपर्यंत पाऊस झाल्यास शेतकºयांनी हलक्या प्रजातीच्या धानाची लागवड करावी ज्यामुळे शेतकºयांचे नुकसान होणार नाही.यंदा पाऊस लांबल्याने पेरण्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. मात्र धानाची पेरणी करण्यास पुन्हा २० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकºयांनी घाई न करता काही दिवस प्रतीक्षा करावी. चांगला दमदार पाऊस झाल्यानंतरच धानाची पेरणी करावी.- नंदकिशोर नयनवाडजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.