शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 22:07 IST

पावसाचे एकापाठोपाठ एक नक्षत्र कोरडे जात असतांना अद्यापही वरुण राजाने दमदार हजेरी लावली नाही. परिणामी पेरणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पाऊस झाला नसला तरी काही शेतकरी धूळ पेरणी करीत आहेत. मात्र यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेरणी करण्यास पुन्हा पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी शिल्लक असून शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा सल्ला : पाऊस लांबल्याने शेतकरी संकटात ,१५ जुलैपर्यंत मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पावसाचे एकापाठोपाठ एक नक्षत्र कोरडे जात असतांना अद्यापही वरुण राजाने दमदार हजेरी लावली नाही. परिणामी पेरणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पाऊस झाला नसला तरी काही शेतकरी धूळ पेरणी करीत आहेत. मात्र यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेरणी करण्यास पुन्हा पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी शिल्लक असून शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ९२ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. धानाचे पऱ्हे टाकण्यासाठी जमिनीत किमान पाच इंचापर्यत ओलावा निर्माण होणे आवश्यक आहे. मात्र यंदा जून महिना पूर्ण लोटत असताना मृगापोठोपाठ आद्रा नक्षत्र सुध्दा कोरडा जात असल्याने शेतकऱ्यांवरील संकटात वाढ झाली आहे. मृगाचा दमदार पाऊस होताच शेतकरी पेरणीला सुरुवात करतात. पण यंदा अद्यापही पावसाने दमदार हजेरी लावली नाही. परिणामी पेरणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. रोज आकाशात ढग दाटून येत आहे मात्र पाऊस पडत नसल्याने वातावरणात सुध्दा उकाडा निर्माण होत आहे. पाऊस लांबत असल्याने पेरण्यांना उशीर होत असून शेतकऱ्यांच्या काळजीत सुध्दा वाढ होत आहे. पेरणीस उशीर झाल्याने रोवणी देखील लांबणार असून यामुळे याचा उत्पादनावर सुध्दा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी विभागाच्या अधिकाºयांनुसार धानाची पेरणी ही १५ जुलैपर्यंत करता येते . त्यामुळे पेरणी करण्यास पुन्हा २० दिवसांचा कालावधी शिल्लक असून शेतकºयांनी पेरणी करण्याची घाई करु नये असे सांगितले. १५ जुलैपर्यंत पाऊस झाल्यास शेतकºयांनी हलक्या प्रजातीच्या धानाची लागवड करावी ज्यामुळे शेतकºयांचे नुकसान होणार नाही.यंदा पाऊस लांबल्याने पेरण्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. मात्र धानाची पेरणी करण्यास पुन्हा २० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकºयांनी घाई न करता काही दिवस प्रतीक्षा करावी. चांगला दमदार पाऊस झाल्यानंतरच धानाची पेरणी करावी.- नंदकिशोर नयनवाडजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.