शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गोरखनाथ धानामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:05 IST

पूर्व विदर्भातील शेतकऱ्याला धानाच्या शेतीशिवाय पर्याय नाही. गोंदिया जिल्ह्यात यंदा १४० फोर्ड गोरखनाथ या प्रजातीचे धान ज्या-ज्या शेतकऱ्यांनी लावले त्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. १४० दिवसाचे जे धान लावण्यात आले ते धान फक्त ७० दिवसातच निघाले आणि तेही धान पोचट आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या कृषी विभागाला तक्रारी । पोचट धानाचा अहवाल जिल्हा कृषी अधिकाऱ्याने मागविला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कर्जाचे डोंगर कमी करण्यासाठी शेतात राबराब राबणाऱ्या जिल्हाभरातील अनेक शेतकºयांची यंदा फसवणूक झाली. १४० दिवसात निघणाऱ्या धानाचे बियाणे शेतकऱ्यांनी लावले. मात्र ते धान ७० दिवसातच निघाले. हा प्रकार डव्वा येथे उघडकीस आल्यानंतर हे बियाणे लावणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या धानाची पाहणी केली. परिणामी त्यांचीही फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार करायला सुरूवात केली आहे.पूर्व विदर्भातील शेतकऱ्याला धानाच्या शेतीशिवाय पर्याय नाही. गोंदिया जिल्ह्यात यंदा १४० फोर्ड गोरखनाथ या प्रजातीचे धान ज्या-ज्या शेतकऱ्यांनी लावले त्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. १४० दिवसाचे जे धान लावण्यात आले ते धान फक्त ७० दिवसातच निघाले आणि तेही धान पोचट आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. लाखो रूपये खर्च करून शेतात राबराब राबूनही कवडीचे धान घरात जाणार नसल्याचे शेतकऱ्यांना संपूर्ण खरीप हंगामाला मुकावे लागणार आहे. शिवाय धानाच्या लागवडीसाठी केलेला खर्च सुध्दा वाया जाणार असून शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.गोंदिया जिल्ह्यातील सडक-अजुनी तालुक्याच्या डव्वा, चिरचाळी, डोंगरगाव व कोदामेळी या चार गावातील शेतकऱ्यांचे धान पोचट निघाल्याने त्यांनी जिल्हा कृषी अधिकारी अनूप शुक्ला यांच्याकडे तक्रार केली. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच ज्या शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात ह्या धानाची लागवड केली त्या धानाची पाहणी केली. त्यांच्यासोबत फसवणूक झाल्याचे लक्षात आले असता त्यांनी आपापल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. नाथ बायोजीनिक्स या कंपनीचे फोरर्ड १४० गोरखनाथ या नावाचे धान ज्या शेतकऱ्यांनी लावले त्यांचे १४० दिवसाचे धान ७० दिवसातच पोचट निघत आहेत.यासंदर्भात देवरी तालुक्याच्या शिलापूर येथील येथील अरूण सखाराम मेंढे व सडक-अर्जुनी तालुक्यातील राका येथील शेतकऱ्यांच्या शेतातही असेच घडले. ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली त्या शेतकºयांना कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली.कृषी अधीक्षक कार्यालयाकडून चौकशी१४० फोर्ड गोरखनाथ ह्या धानाचे बियाणे ज्या शेतकऱ्यांनी लावले त्या शेतकऱ्यांचे १४० दिवसाचे धान ७० दिवसातच पोचट निघाले.लोकमतने यावर वृत्त प्रकाशित करताच खळबळून जागा झालेल्या कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत कोणकोणत्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली, या संदर्भात चौकशी करणे सुरू केले आहे.जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिले पत्रगोरखनाथ नावाचे जे बियाणे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावले त्या शेतकऱ्यांचे धान १४० दिवसापेक्षा ७० दिवसातच निघाले का ज्यांच्या शेतात असा प्रकार घडला असेल अश्या शेतकऱ्यांनी आपापल्या तक्रारी आपल्या तालुक्यातील जि.प.चे कृषी अधिकारी व स्टेटचे कृषी अधिकारी यांच्याकडे करावी. संबधीत तालुका कृषी अधिकाऱ्यांची या प्रकरणाची चौकशी करण्याचे पत्र जिल्हा कृषी संवर्धन अधिकारी यांनी दिले आहे.ज्या शेतकºयांच्या शेतातील धान पोचट निघत आहेत. त्या शेतकऱ्यांनी भात बियाणाची खरेदी केली त्याचे बिल सांभाळून ठेवावे. यासंदर्भात रितसर तक्रार तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करावे.-अनुप शुक्ला, जिल्हा कृषी अधिकारी, जि.प. गोंदिया.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती