शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

गोरखनाथ धानामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:05 IST

पूर्व विदर्भातील शेतकऱ्याला धानाच्या शेतीशिवाय पर्याय नाही. गोंदिया जिल्ह्यात यंदा १४० फोर्ड गोरखनाथ या प्रजातीचे धान ज्या-ज्या शेतकऱ्यांनी लावले त्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. १४० दिवसाचे जे धान लावण्यात आले ते धान फक्त ७० दिवसातच निघाले आणि तेही धान पोचट आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या कृषी विभागाला तक्रारी । पोचट धानाचा अहवाल जिल्हा कृषी अधिकाऱ्याने मागविला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कर्जाचे डोंगर कमी करण्यासाठी शेतात राबराब राबणाऱ्या जिल्हाभरातील अनेक शेतकºयांची यंदा फसवणूक झाली. १४० दिवसात निघणाऱ्या धानाचे बियाणे शेतकऱ्यांनी लावले. मात्र ते धान ७० दिवसातच निघाले. हा प्रकार डव्वा येथे उघडकीस आल्यानंतर हे बियाणे लावणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या धानाची पाहणी केली. परिणामी त्यांचीही फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार करायला सुरूवात केली आहे.पूर्व विदर्भातील शेतकऱ्याला धानाच्या शेतीशिवाय पर्याय नाही. गोंदिया जिल्ह्यात यंदा १४० फोर्ड गोरखनाथ या प्रजातीचे धान ज्या-ज्या शेतकऱ्यांनी लावले त्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. १४० दिवसाचे जे धान लावण्यात आले ते धान फक्त ७० दिवसातच निघाले आणि तेही धान पोचट आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. लाखो रूपये खर्च करून शेतात राबराब राबूनही कवडीचे धान घरात जाणार नसल्याचे शेतकऱ्यांना संपूर्ण खरीप हंगामाला मुकावे लागणार आहे. शिवाय धानाच्या लागवडीसाठी केलेला खर्च सुध्दा वाया जाणार असून शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.गोंदिया जिल्ह्यातील सडक-अजुनी तालुक्याच्या डव्वा, चिरचाळी, डोंगरगाव व कोदामेळी या चार गावातील शेतकऱ्यांचे धान पोचट निघाल्याने त्यांनी जिल्हा कृषी अधिकारी अनूप शुक्ला यांच्याकडे तक्रार केली. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच ज्या शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात ह्या धानाची लागवड केली त्या धानाची पाहणी केली. त्यांच्यासोबत फसवणूक झाल्याचे लक्षात आले असता त्यांनी आपापल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. नाथ बायोजीनिक्स या कंपनीचे फोरर्ड १४० गोरखनाथ या नावाचे धान ज्या शेतकऱ्यांनी लावले त्यांचे १४० दिवसाचे धान ७० दिवसातच पोचट निघत आहेत.यासंदर्भात देवरी तालुक्याच्या शिलापूर येथील येथील अरूण सखाराम मेंढे व सडक-अर्जुनी तालुक्यातील राका येथील शेतकऱ्यांच्या शेतातही असेच घडले. ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली त्या शेतकºयांना कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली.कृषी अधीक्षक कार्यालयाकडून चौकशी१४० फोर्ड गोरखनाथ ह्या धानाचे बियाणे ज्या शेतकऱ्यांनी लावले त्या शेतकऱ्यांचे १४० दिवसाचे धान ७० दिवसातच पोचट निघाले.लोकमतने यावर वृत्त प्रकाशित करताच खळबळून जागा झालेल्या कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत कोणकोणत्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली, या संदर्भात चौकशी करणे सुरू केले आहे.जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिले पत्रगोरखनाथ नावाचे जे बियाणे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावले त्या शेतकऱ्यांचे धान १४० दिवसापेक्षा ७० दिवसातच निघाले का ज्यांच्या शेतात असा प्रकार घडला असेल अश्या शेतकऱ्यांनी आपापल्या तक्रारी आपल्या तालुक्यातील जि.प.चे कृषी अधिकारी व स्टेटचे कृषी अधिकारी यांच्याकडे करावी. संबधीत तालुका कृषी अधिकाऱ्यांची या प्रकरणाची चौकशी करण्याचे पत्र जिल्हा कृषी संवर्धन अधिकारी यांनी दिले आहे.ज्या शेतकºयांच्या शेतातील धान पोचट निघत आहेत. त्या शेतकऱ्यांनी भात बियाणाची खरेदी केली त्याचे बिल सांभाळून ठेवावे. यासंदर्भात रितसर तक्रार तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करावे.-अनुप शुक्ला, जिल्हा कृषी अधिकारी, जि.प. गोंदिया.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती