शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

पाण्यासाठी शेतकऱ्यांची धापेवाडा कार्यालयावर धाव

By admin | Updated: August 27, 2016 00:07 IST

निसर्गाने पाठ फिरवली. शेतकऱ्यांचे शेतातील पिकांची अवस्था अतिशय वाईट होत असल्याने

विद्युत पुरवठा खंडित: १७.५० लाखांची थकबाकीकाचेवानी : निसर्गाने पाठ फिरवली. शेतकऱ्यांचे शेतातील पिकांची अवस्था अतिशय वाईट होत असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी धापेवाडा प्रकल्प कार्यालय गाठले. जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांच्या नेतृत्वात चार तास अधिकाऱ्यांशी चर्चा करुन समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली. कवलेवाडा क्षेत्राचे जि.प.सदस्य मनोज डोंगरे यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे, ३० दिवसापासून पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतातील पिके मृत्यू पावत आहेत. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे. परंतु धापेवाडा सिंचन प्रकल्पाकडून पाणी सोडण्यात येत नसल्याने शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांची कार्यकारी अभियंता यांचे स्वीय सहाय्यक डी.ए. बोरकर, उपविभागीय अभियंता धापेवाडा टप्पा -१ चे सुरेश कुकडे यांच्याशी चर्चा केली. पाणी सोडण्यात आले नाही तर संपूर्ण धान जळून राख होईल असे शेतकरी म्हणाले. अधिकारी सुरेश कुकडे आणि डी.ए. बोरकर यांनी विद्युत कनेक्शनची समस्या शेतकऱ्यांसमक्ष ठेवली. विद्युत कपात करण्यात आली होती तेव्हा विद्युत विभागाने ५ टप्पे तयार करुन मार्च २०१६ अखेर चार टप्यातील किस्त भरण्यात आली. मात्र शेवटची किश्त २.५० लाख रुपये भरण्यात आले नाही. त्यामुळे विद्युत विभागाने विद्युत कपात केली. आजघडीला धापेवाडा प्रकल्पावर विद्युत थकबाकी १७ लाख ५० हजार रुपये आहे. परंतु यापैकी ६ लाख २ हजार रुपये भरल्यास वीज पुरवठा सुरू केला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.पूर्वीचे २ लाख ७५ हजार रुपये कार्यालयाकडे उपलब्ध आहेत. दोन दिवसात शेतकऱ्यांकडून वसुलीद्वारे आलेले २ लाख १० हजार असे मिळून ४ लाख ८५ हजार जमा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी वसुली अधिकाऱ्यांना बोलावून दोन दिवसात वसूली करण्यात यावी असे अधिकारी व जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी वसुलदारांना खडसावून सांगीतले. यावेळी कवलेवाडा सरपंच देवन पारधी, किरण पारधी, मुरली कटरे, रामू पारधी, गणेश पटले, मुंडीपारचे वासू हरिणखेडे, रंगलाल रहांगडाले, चिरेखनीचे सोनू पारधी, गिरधारी भगत, गंगाराम टेंभरे, मरारटोलाचे बंडू कटरे, सरपंच कुंजीलाल बिसेन, भाऊजी पटले व इतर उपस्थित होते. (वार्ताहर)पाणीपट्टीचे उत्पन्न ७८ लाख विद्युत बिल भरण्यास अडथळा येण्याचे कारण शेतकऱ्यांकडे येणारे पाणी पट्टीचे शुल्क वेळेत भरणा होत नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे. यावर्षी उन्हाळी पीकाची पाणी पट्टी ४२ लाख रुपये आकारण्यात आली. त्यापैकी २५ लाख वसूल झाले. १७ लाख अप्राप्त आहे. वर्षाला खरीप पिकाची पाणी पट्टी आकारणी ७७.६८ लाख होते. एप्रिल महिन्यात एकाच महिन्याचा बिल ९ लाख रुपये आला होता. पंप बंद असतात त्यावेळचा सरासरी बिल २० हजार रुपये महिना येतो. वर्षाला विद्युत बील ८० लाखाच्या घरात जातो. यावर्षी ६५ लाख रुपये बिल भरण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.चवथे पंप जानेवारीपासून बंदधापेवाडा प्रकल्प विभागाच्या हलगर्जीपणामुळे चौथे पंप जानेवारी २०१६ पासून बंद पडून आहे. चौथे पंप बंद असल्याने टेलवर असणाऱ्या शेतकऱ्यांना बरोबर पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत पाण्यासाठी वाद होत आहेत.