शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

किसान सन्मान निधीचा उडाला बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST

केंद्र सरकारने सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना टप्याटप्याने निधी देणे सुरु केले होते. त्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यात ३ टप्प्यांमध्ये वर्षाला ६ हजार रुपये थेट बँकेत जमा झाले. तर काही शेतकऱ्यांना योजनेच्या २ च टप्यांचीच निधी बँक खात्यामध्ये जमा झाली असून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही या योजनेचा निधी जमा झालेला नाही. त्यामुळे बहुतांश शेतकरी तहसील कार्यालयाच्या चकरा मारुन कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत.

ठळक मुद्देबहुतांश शेतकरी वंचित : खात्यावर निधी जमा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्करावणवाडी : निवडणुकी पूर्वी अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केली होती. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांना या योजनेचा अंशत: लाभ मिळाला असून बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे सरकारच्या या योजनेचा बोजवारा उडाला आहे.केंद्र सरकारने सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना टप्याटप्याने निधी देणे सुरु केले होते. त्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यात ३ टप्प्यांमध्ये वर्षाला ६ हजार रुपये थेट बँकेत जमा झाले. तर काही शेतकऱ्यांना योजनेच्या २ च टप्यांचीच निधी बँक खात्यामध्ये जमा झाली असून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही या योजनेचा निधी जमा झालेला नाही. त्यामुळे बहुतांश शेतकरी तहसील कार्यालयाच्या चकरा मारुन कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. परंतु संबंधित प्रशासन शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक न देता आज येणार उद्या येणार असे उडवा-उडवीचे उत्तर देत वंचित शेतकऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखवित आहेत. मग अशा योजना राबविण्याचा अर्थच काय असा प्रश्न वंचिताकडून करण्यात येत आहे.पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ काही मोजक्याच शेतकऱ्यांना ठराविक वेळेवर मिळत आहे. तर पात्र शेतकऱ्यांची नावे बँकेच्या ऑनलाईन यादीत न आल्याने अनेक शेतकरी या योजनेच्या लाभाला मुकले आहे.ही चूक नेमकी कुणाची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. लोकसभा निवडणुकी पुर्वी तलाठ्यांकडून शेतकऱ्यांची यादी संबंधित विभागाकडून मागविण्यात आली होती. मात्र लाभार्थ्यांची नावे ऑनलाईन करताना झालेल्या बँक खाते क्रमांक तसेच आयएफएससी कोड मधील चुकांमुळे अनेक शेतकरी अद्यापही सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे बँक खात्यांमध्ये तात्काळ योजनेचा निधी जमा करावा अशी वंचितांची मागणी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी