शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

डव्वाच्या वीज वितरण केंद्रावर शेतकऱ्यांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:30 IST

सडक अर्जुनी : तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाची लागवड केली असून, धानाला सध्या पाण्याची गरज आहे. मात्र, महावितरणकडून केवळ ...

सडक अर्जुनी : तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाची लागवड केली असून, धानाला सध्या पाण्याची गरज आहे. मात्र, महावितरणकडून केवळ पाच ते सहा तास कृषिपंपाला वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. कृषिपंपाला अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी डव्वा येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर शनिवारी (दि. ३) मोर्चा काढला.

डव्वा परिसरातील १५ ते २० गावांतील शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाची लागवड केली आहे; पण कृषिपंपाला नियमित पाच ते सहा तासदेखील वीज पुरवठा होत नसल्याने धान पीक धोक्यात आले आहे. याबाबत वांरवार महावितरण कार्यालयाला निवेदन देऊन अखंडित वीज पुरवठा करण्याची मागणी केली होती; पण त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शनिवारी महावितरणाच्या कार्यालयावर धडक दिली. मात्र, बराच वेळ महावितरणचे अधिकारी आले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी चक्का जाम केला होता. अखेर डुग्गीपारचे ठाणेदार सचिन वांगळे यांनी मध्यस्ती करीत शेतकऱ्यांची समजूत काढली. उच्च दाबासह १२ तास वीज पुरवठा करण्याचे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता फुलझले यांनी शेतकऱ्यांना दिले. तसेच उर्वरित मागण्यांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.