शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सन्मान निधीच्या लाभासाठी शेतकरी वेटींगवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यात एकूण २ लाख ५४ हजार खातेदार शेतकरी आहेत. यापैकी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी २ लाख ४४ हजार २०२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. यापैकी पडताळणीनंतर २ लाख २६ हजार ४०० शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तीन तीन महिन्यांनी जमा केले जातात. आत्तापर्यंत केंद्र सरकारने या योजनेचे पाच हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे.

ठळक मुद्देपात्र पूर्ण शेतकऱ्यांना लाभ नाहीच : आत्तापर्यंत पाच हप्ते झाले जमा

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान निधी योजनेतंर्गत वर्षाकाठी सहा हजार रुपये पेशंन देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या योजनेची देशभरात अंमलबजावणी करण्यात आलीे. यासाठी जिल्ह्यातील २ लाख ४४ हजार २०२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. यापैकी २ लाख २६ हजार ४०० शेतकरी पात्र ठरले. मात्र पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण हप्त्यांचा लाभ अद्यापही मिळालाच नसल्याची धक्कादायक बाब उघकीस आली आहे.गोंदिया जिल्ह्यात एकूण २ लाख ५४ हजार खातेदार शेतकरी आहेत. यापैकी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी २ लाख ४४ हजार २०२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. यापैकी पडताळणीनंतर २ लाख २६ हजार ४०० शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तीन तीन महिन्यांनी जमा केले जातात. आत्तापर्यंत केंद्र सरकारने या योजनेचे पाच हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. यात पहिल्या हप्ता एकूण १ लाख ३४ हजार ९० शेतकऱ्यांच्या खात्यावर, दुसऱ्या हप्ता १ लाख ९० हजार १२ शेतकºयांना, तिसऱ्या हप्ता १ लाख ५६ हजार ३९ शेतकरी, चौथ्या हप्ता १ लाख १० हजार १६३ शेतकऱ्यांना आणि पाचव्या हप्ता ७७ हजार ५७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आत्तापर्यंत जमा करण्यात आला आहे. पाच हप्ते जमा करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या पाहता जिल्ह्यातील जेवढे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी आत्तापर्यंत कधीच संपूर्ण पात्र शेतकऱ्यांना सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे सरासरी ४० हजारावर पात्र शेतकरी अजुनही या योजनेच्या पहिल्या हप्त्यापासून वंचित असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट केंद्र सरकारकडून रक्कम जमा केली जात असल्याने याची माहिती स्थानिक जिल्हा प्रशासनाला सुध्दा नसते. रक्कम जमा झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला या ऑनलाईन रक्कम जमा करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येची यादी उपलब्ध करुन देत असल्याची माहिती आहे. ज्या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली तो उद्देश मात्र या योजनेचा लाभ संपूर्ण शेतकऱ्यांना मिळत नसल्याने साध्य होत नसल्याचे चित्र आहे.हप्ते जमा झाले नसल्याची ओरड कायमपंतप्रधान सन्मान निधी योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या शेतकºयांना ही योजना सुरू झाल्यापासूनच या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यांच्या बँक खात्यावर अद्यापही पहिल्या हप्त्याची रक्कम झाली नसल्याने त्यांची यासाठी प्रतीक्षा कायम आहे. तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसरा आणि तिसरा हप्ता जमा झाला नसल्याची तक्रार आहे. एकंदरीत सुरूवातीपासून या योजनेचा लाभ पूर्ण पात्र शेतकऱ्यांना मिळाला नसल्याची बाब याद्यांवरुन स्पष्ट होते.पात्र आहे तर हप्ते जमा करण्याची अडचणया योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती महसूल व कृषी विभागाने ऑनलाईन केंद्र सरकारकडे पाठविली. तसेच पात्र शेतकऱ्यांचे आधारकार्ड, बँक खाते क्रमांक सुध्दा त्यात जोडले. मात्र यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेच्या हप्त्याची रक्कम जमा न होण्याचे कारण गुलदस्त्यात आहे.शेतकऱ्यांची बँकामध्ये पायपीट कायमपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात आहे. याचा संदेश देखील संबंधित पात्र शेतकऱ्याच्या मोबाईलवर पाठविला जात आहे. मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली नसल्याने त्यांची बँकामध्ये पायपीट कायम आहे. विशेष यासंबंधिची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात सुध्दा मिळत नसल्याचे शेतकऱ्यांची अडचण होत आहे.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी