शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी अनुदानापासून शेतकरी अद्यापही वंचित

By admin | Updated: December 13, 2014 01:40 IST

गतवर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक घेता आले नाही. शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागला.

मुंडीकोटा : गतवर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक घेता आले नाही. शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागला. त्यामुळे शासनाने अतिवृष्टीच्या नुकसानीकरिता अनुदान जाहीर केले. अशावेळी अनेक शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली, पण काहींना दीड वर्षे लोटूनही अनुदानाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.अतिवृष्टीचा अनुदान साझा तलाठ्यामार्फत तयार करुन संबंधित शेतकऱ्यांना बँक पासबुकांच्या झेरॉक्स, तसेच शेतकऱ्याची मृत्यू झाल्यास वारसान प्रमाणपत्र आदी कागदपत्रे पूर्ण करुन शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे दिले. काही शेतकऱ्यांनी आपल्या नावाचे खाते क्रमांक तलाठी यांच्याकडे देण्यात आले. अशाच प्रकारे मुंडीकोटा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे तलाठ्यांकडे दिली. या सर्व बाबीला तब्बल दीड वर्षाचा कालावधी लोटला. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजपर्यंत अनुदान जमा झाले नाही. शेतकरी याबाबत तहसील कार्यालय व तलाठ्यांकडे वारंवार विचारणा करीत आहेत. पण त्यांना बरोबर उत्तरे दिली जात नसल्याने शेतकरी चांगलेच वैतागले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने जे अनुदान मंजूर केले, तेही दीड वर्षापासून दिले नाही. शेतकरी वेळोवेळी बँकेत येवून खात्यात रक्कम जमा झाली काय? असा प्रश्न बँकेतील व्यवस्थापकांना विचारत असतात. पण अनुदान शासनाकडून आलेच नाही तर बँकेत कसे जमा होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. तरी ज्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नाही अशा शेतकऱ्यांनी वरिष्ठांनी चौकशी करुन त्वरित रक्कम बँकेत जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)