शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

अतिवृष्टी अनुदानापासून शेतकरी अद्यापही वंचित

By admin | Updated: December 13, 2014 01:40 IST

गतवर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक घेता आले नाही. शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागला.

मुंडीकोटा : गतवर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक घेता आले नाही. शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागला. त्यामुळे शासनाने अतिवृष्टीच्या नुकसानीकरिता अनुदान जाहीर केले. अशावेळी अनेक शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली, पण काहींना दीड वर्षे लोटूनही अनुदानाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.अतिवृष्टीचा अनुदान साझा तलाठ्यामार्फत तयार करुन संबंधित शेतकऱ्यांना बँक पासबुकांच्या झेरॉक्स, तसेच शेतकऱ्याची मृत्यू झाल्यास वारसान प्रमाणपत्र आदी कागदपत्रे पूर्ण करुन शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे दिले. काही शेतकऱ्यांनी आपल्या नावाचे खाते क्रमांक तलाठी यांच्याकडे देण्यात आले. अशाच प्रकारे मुंडीकोटा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे तलाठ्यांकडे दिली. या सर्व बाबीला तब्बल दीड वर्षाचा कालावधी लोटला. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजपर्यंत अनुदान जमा झाले नाही. शेतकरी याबाबत तहसील कार्यालय व तलाठ्यांकडे वारंवार विचारणा करीत आहेत. पण त्यांना बरोबर उत्तरे दिली जात नसल्याने शेतकरी चांगलेच वैतागले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने जे अनुदान मंजूर केले, तेही दीड वर्षापासून दिले नाही. शेतकरी वेळोवेळी बँकेत येवून खात्यात रक्कम जमा झाली काय? असा प्रश्न बँकेतील व्यवस्थापकांना विचारत असतात. पण अनुदान शासनाकडून आलेच नाही तर बँकेत कसे जमा होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. तरी ज्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नाही अशा शेतकऱ्यांनी वरिष्ठांनी चौकशी करुन त्वरित रक्कम बँकेत जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)