शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

शेतकऱ्यांची दिवाळी गेली अंधारात

By admin | Updated: October 30, 2014 22:54 IST

दिवाळी येताच सर्वत्र आंनदाचे वातावरण असते. मात्र जिल्ह्यात शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने व धानाचे भावदेखील फारच कमी असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली.

परसवाडा : दिवाळी येताच सर्वत्र आंनदाचे वातावरण असते. मात्र जिल्ह्यात शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने व धानाचे भावदेखील फारच कमी असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. व्यापाऱ्यांनी दिवाळीच्या तोंडावरच धानाचे भाव कमी केले. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. जून, जुलै व आॅगस्ट महिन्यात पावसाच्या कमी प्रमाणामुळे शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागली. धानपिके वाचविण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नाला काही प्रमाणातच यश आले. तर दुसरीकडे धानपिकावर किड लागल्याने हाती आलेले पीकही वाया गेले. थोडेफार धानाचे उत्पन्न हाती आले. पण दिवाळीच्या तोंडावर धानाचे भाव कमी असल्याने त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चदेखील निघणे कठीण झाले होते.हलक्या धानाचे भाव पडल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. शासकीय हमी भावाचा फज्जा उडाला असल्याचे चित्र दिसून येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. संचालकांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची लवकरच कापणी व मळणी करुन धान विक्रीसाठी बाजारपेठेत आणले. मात्र शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने याचा पूरेपूर फायदा खासगी व्यापाऱ्यांनी घेतला आहे. शासनाने घोषित केलेल्या हमी भावापेक्षाही अंत्यत कमी दराने धानाची खरेदी करुन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. धानाच्या उत्पादन खर्च साधारणत: एक एकरासाठी १५ ते २० हजारापर्यंत आहे. मात्र त्या तुलनेत धानाला मिळणार भाव कमी असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची ओरड परिसरात सुरू आहे. (वार्ताहर)