शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
2
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
3
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
4
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
5
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
6
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 
7
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
8
Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा
9
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
10
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
11
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
12
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
13
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
14
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
15
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; सीएम योगींनी वाहिली श्रद्धांजली
16
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
17
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
18
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
19
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
20
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
Daily Top 2Weekly Top 5

ऊस लागवडीतून शेतकरी होत आहेत सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:20 IST

धान उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख गोंदिया जिल्ह्याची आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा दरवर्षी शेतीला बसत असलेल्या फटक्यामुळे शेतकरी सुध्दा धानाला पर्याय शोधत आहे.

ठळक मुद्देतीन एकरातून १२ लाखांचे उत्पन्न : आधुनिक तंत्रज्ञानाची जोड

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : धान उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख गोंदिया जिल्ह्याची आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा दरवर्षी शेतीला बसत असलेल्या फटक्यामुळे शेतकरी सुध्दा धानाला पर्याय शोधत आहे. गोरेगाव तालुक्यातील कंटगी येथील एका शेतकऱ्यांने पांरपरिक धान शेतीला फाटा देत तीन एकरवर उसाची लागवड करुन त्यातून १२ लाखांचे उत्पन्न घेवून शेतकºयांसमोर आदर्श निर्माण केला आहे.फनेंद्र हरिणखेडे असे त्या शेतकºयाचे नाव आहे. स्वत: उच्च शिक्षित असून त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग आधुनिक शेतीसाठी करुन घेतला. हरिणखेडे यांच्याकडे एकूण १४ एकर शेती आहे. यापैकी ३ एकर शेतीत त्यांनी मागील वर्षी उसाची लागवड केली.पहिल्या वर्षी यातून त्यांनी १२ लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. सुरूवातीला त्यांनी प्रयोग म्हणून तीन एकरवर उसाची लागवड केली. त्याचे सुक्ष्म नियोजन करुन आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. जंगली प्राण्यांकडून होणारे पिकांची नासधूस टाळण्यासाठी व चोरीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी त्यांनी शेतात सीसीटीव्ही कॅमेरे लावले. कमी क्षेत्रात अधिक उसाचे उत्पादन कसे घेता येईल, यासाठी त्यांनी काही प्रयोगशिल ऊस उत्पादक शेतकºयांच्या शेतीला भेट दिली. त्यांच्याकडून उसाच्या लागवडीची बारीक सारीक माहिती जाणून घेतली. त्यानंतर याच माहितीच्या आधारावर त्यांनी उसाची लागवड केली. यातून त्यांना पहिल्याच वर्षी १२ लाखांचे उत्पन्न मिळाले. शिवाय धानाच्या शेतीपेक्षा उसाचा लागवड खर्च देखील कमी असल्याने त्यांच्या पैशाची बचत झाली. हरिणखेडे हे गोरेगाव पंचायत समितीमध्ये कार्यरत आहेत. नोकरी करुन सुटीच्या दिवशी व फावल्या वेळात ते पूर्ण वेळ शेतावर घालवितात.त्यांच्या शेतात रुद्राक्ष, शम्मी, लाल जाम, अंजीर, हापुस आंबा, सागवान, निंबू, चिंच अशी विविध प्रकारची झाडे लावली आहेत. मागील वर्षी त्यांना चांगले उत्पन्न मिळाल्याने यंदा त्यांनी चार एकरवर दोन प्रजातीच्या उसाची लागवड केली आहे. उसाचा प्रती एकर लागवड खर्च ३० हजार रूपये असून यातून जवळपास २०० टन उसाचे उत्पादन होते. मागील वर्षी ऊस लागवडीतून १२ लाखांचा नफा मिळाल्याचे हरिणखेडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.जोपर्यंत शेतकरी पांरपरिक पिकांना फाटा देत दुसºया पिकांची लागवड करणार नाही, तोपर्यंत शेतीतून अधिक उत्पन्न घेणे शक्य होणार नाही. शेतकऱ्यांनी उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञानाची शेतीला जोड दिल्यास निश्चित शेती करणे फायद्याचे ठरेल.- फनिंद्र हरिणखेडे, शेतकरीशुद्ध पाण्याचा पुरवठाहरिणखेडे यांनी शेतीला संरक्षीत सिंचनाची सोय व्हावी, यासाठी शेततळे तयार केले आहे. शेततळ्यातील पाणी पिकांना देण्यापूर्वी पाण्याचे शुध्दीकरण करण्यासाठी पाणी शुध्दीकरण यंत्र लावले आहे. यामुळे पिकांना किडरोगांची लागण होत नाही.पंधरा लोकांना रोजगारहरिणखेडे यांच्याकडे एकूण १४ एकर शेती आहे. यापैकी ३ एकरवर त्यांनी उसाची लागवड केली आहे. ही शेती करण्यासाठी त्यांनी एकूण पंधरा मजूर वर्षभरासाठी ठेवले आहेत. त्यामुळे मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देणे सुध्दा शक्य झाले आहे.पाच सीसीटीव्ही कॅमेरेशेतातील शेतमाल व औजारे चोरीला जावू नये, जंगली प्राण्यापासून होणारे पिकांचे नुकसान टाळता यावे. यासाठी शेतातील मुख्य भागात पाच सीसीटिव्ही कॅमेरे लावले आहेत. यापूर्वी त्यांच्या शेतातून मोटारपंप व कृषी अवजरांची चोरी झाली होती. मात्र सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे या प्रकाराला सुध्दा आळा बसला.

टॅग्स :Farmerशेतकरी