शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: April 30, 2015 01:05 IST

तिरोडा तालुक्यात मागील महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने उन्हाळी धानाचे मोठे नुकसान झाले.

मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यात मागील महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने उन्हाळी धानाचे मोठे नुकसान झाले. रोगराई धानावर लागली, त्यातच गहू, चना, तूर, पोपट, उडीद, जवस यांची हातात आलेली पिके नष्ट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे सर्वे तलाठी, सचिव व कृषी सहायक यांच्याकडून करण्यात आलेले आहे. या शेतकऱ्यांचे बँकेत खाते नव्हते. अशा शेतकऱ्यांनी बँकेत खाते उघडले व तलाठी तसेच सचिव यांना खाते नंबर दिले. शेतकरी मोठ्या आशेने बँकेत पैसा जमा झाला असेल अशी वाट बघत असतात. पण पैशांचा पत्ताच नाही.सन २०१४ मध्ये एका पाण्यासाठी शेतकऱ्यांचे धान गेले. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची अथवा विद्युत पंपाची व्यवस्था होती, अशा शेतकऱ्यांनी थोडेफार धान पिक घेतले. पण अनेक शेतकरी निसर्गावर अवलंबून असतात त्यांचे काय? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर उभा आहे. जो दिवस असतो तो दिवस शेतकऱ्यांसाठी सारखाच असतो. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ शेतकरी पाहत आहेत. दिवसभर काबाडकष्ट करुन शेतकऱ्यांच्या हातात काहीच मिळत नाही. नेहमीच या पोटासाठी कष्ट करुन उपाशी पोटी शेतकरी जीवन जगत असतो, ही फार दुर्देवी बाब असून मात्र उपाय नाही. शेती हा परवडण्यासाखा व्यवसाय राहिला नाही. पण वडिलांची परंपरा सुरु ठेवावी लागते, असे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. रासायनिक खते, औषधे, मजूर यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. पण शेतकऱ्यांनी धान्य कितीही पिकवून त्याच्या मालाला भाव नाही. अशी शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. शेतकरी आपले धान्य वाटेल त्या भावाने विकत असतात. तर व्यापारी कमी दराने धान विकत घेवून शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत असतात. पण खर्चासाठी शेतकऱ्यांना धान विकणे गरजेचे असते. निसर्ग कोपल्यामुळे शेतकरी बैचेन दिसत आहे. पण अशावेळी शेतकऱ्यांचा वाली कोणीही दिसत नाही. (वार्ताहर)