शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: April 30, 2015 01:05 IST

तिरोडा तालुक्यात मागील महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने उन्हाळी धानाचे मोठे नुकसान झाले.

मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यात मागील महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने उन्हाळी धानाचे मोठे नुकसान झाले. रोगराई धानावर लागली, त्यातच गहू, चना, तूर, पोपट, उडीद, जवस यांची हातात आलेली पिके नष्ट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे सर्वे तलाठी, सचिव व कृषी सहायक यांच्याकडून करण्यात आलेले आहे. या शेतकऱ्यांचे बँकेत खाते नव्हते. अशा शेतकऱ्यांनी बँकेत खाते उघडले व तलाठी तसेच सचिव यांना खाते नंबर दिले. शेतकरी मोठ्या आशेने बँकेत पैसा जमा झाला असेल अशी वाट बघत असतात. पण पैशांचा पत्ताच नाही.सन २०१४ मध्ये एका पाण्यासाठी शेतकऱ्यांचे धान गेले. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची अथवा विद्युत पंपाची व्यवस्था होती, अशा शेतकऱ्यांनी थोडेफार धान पिक घेतले. पण अनेक शेतकरी निसर्गावर अवलंबून असतात त्यांचे काय? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर उभा आहे. जो दिवस असतो तो दिवस शेतकऱ्यांसाठी सारखाच असतो. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ शेतकरी पाहत आहेत. दिवसभर काबाडकष्ट करुन शेतकऱ्यांच्या हातात काहीच मिळत नाही. नेहमीच या पोटासाठी कष्ट करुन उपाशी पोटी शेतकरी जीवन जगत असतो, ही फार दुर्देवी बाब असून मात्र उपाय नाही. शेती हा परवडण्यासाखा व्यवसाय राहिला नाही. पण वडिलांची परंपरा सुरु ठेवावी लागते, असे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. रासायनिक खते, औषधे, मजूर यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. पण शेतकऱ्यांनी धान्य कितीही पिकवून त्याच्या मालाला भाव नाही. अशी शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. शेतकरी आपले धान्य वाटेल त्या भावाने विकत असतात. तर व्यापारी कमी दराने धान विकत घेवून शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत असतात. पण खर्चासाठी शेतकऱ्यांना धान विकणे गरजेचे असते. निसर्ग कोपल्यामुळे शेतकरी बैचेन दिसत आहे. पण अशावेळी शेतकऱ्यांचा वाली कोणीही दिसत नाही. (वार्ताहर)