शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने शेतकरी संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:13 IST

ऑनलाईन लोकमतगोंदिया : नाशिक येथील शेतकऱ्यांनी मुंबई मंत्रालयावर मोर्चा काढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. त्यात शेतकऱ्यांचे २०१७ पर्यंतचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली होती. मात्र यासंदर्भात कुठेलच आदेश अद्यापही बँकापर्यंत पोहचलेले नाही. त्यामुळे बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाकडून कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला ...

ठळक मुद्देबँकांना अद्यापही आदेश नाही :कर्जवसुलीसाठीचा तगादा संपेना

ऑनलाईन लोकमतगोंदिया : नाशिक येथील शेतकऱ्यांनी मुंबई मंत्रालयावर मोर्चा काढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. त्यात शेतकऱ्यांचे २०१७ पर्यंतचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली होती. मात्र यासंदर्भात कुठेलच आदेश अद्यापही बँकापर्यंत पोहचलेले नाही. त्यामुळे बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाकडून कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला जात आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेमुळे शेतकरी संभ्रमात आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीची सर्व प्रक्रिया आॅनलाईन राबविली जात आहे. आॅनलाईन प्रक्रियेतील घोळ अद्यापही संपलेला नाही. त्यातच मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच २०१७ पर्यंतचे शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली. त्यामुळे या घोळात आणखी भर पडली. मात्र याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार ३० जून २०१७ पर्यंतचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ केले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करणे थांबविले आहे. तर दुसरीकडे ३१ मार्चपूर्वी थकीत कर्ज न भरल्यास शेतकºयांना ६ टक्के व्याज भरावे लागणार आहे.तसेच त्यांची नावे थकबाकीदारांच्या यादीत जाणार आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.त्यामुळे कर्ज भरावे की नाही या संभ्रमात शेतकरी आहे. शासनाने यासंदर्भात लवकर भूमिका जाहीर न केल्यास याचा लाखो शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.वाढीव व्याजदराचा फटकाथकीत कर्जाची परतफेड करण्यास जिल्ह्यातील शेतकरी तयार आहेत. मात्र त्यांनी कर्जाची परतफेड केल्यास त्यांना मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. तर निर्धारित कालावधीत कर्ज न भरले नाही तर ६ टक्के व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागेल. त्यामुळे दोन्हीकडून नुकसान शेतकºयांचेच आहे.बँकेला पत्राची प्रतीक्षाकर्जमाफी संदर्भात जिल्ह्यातील बँका आणि विविध कार्यकारी सोसायट्यांना अद्यापही कर्जमाफी संदर्भात कुठलेच आदेश प्राप्त झाले नाही. त्यामुळे नियमानुसार बँका आणि सोसाट्यांकडून शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. यासंदर्भात बँक आणि उपनिंबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी शासनाकडून कर्जमाफी संदर्भात कुठलेच आदेश प्राप्त झाले नसल्याचे सांगितले.