शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

सिंचनासाठी शेतकरी ‘आसुसला’

By admin | Updated: January 3, 2015 23:05 IST

सतत कोणत्या ना कोणत्या समस्येत फसणारा शेतकरी आता उन्हाळी धानपीक घेण्यासाठी पुढे सरसावला आहे. इटियाडोह प्रकल्पाचे पाणी उन्हाळी धान पिकासाठी कालव्याद्वारे सोडण्यात

इटियाडोहचे पाणी सुटले इटखेडा : सतत कोणत्या ना कोणत्या समस्येत फसणारा शेतकरी आता उन्हाळी धानपीक घेण्यासाठी पुढे सरसावला आहे. इटियाडोह प्रकल्पाचे पाणी उन्हाळी धान पिकासाठी कालव्याद्वारे सोडण्यात आल्याने प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतीविषयक कामांना सुरूवात केली आहे. त्याद्वारे इटखेडा परिसरातील सुमारे ३०० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. उन्हाळी धान पिकांच्या उत्पादनातून आता तरी कर्जमुक्ती होईल, हीच आशा त्यांची पुन्हा बळावली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना आता बांधावरील गवत कापणे, धानाच्या रोपवाटिकेसाठी नागरणी करणे, बी-बियाण्यांची जुळवाजुळव करणे आदी शेतीविषयक कामांची लगबग वाढली आहे. शेतकऱ्यांच्या शेतांना सिंचन होण्याच्या दृष्टिने येथील समृद्धी वापर संस्थेच्या अधिपत्याखालील इटखेडा, इसापूर, घाटी पळसगाव, कन्हाळगाव येथील शेतकऱ्यांना सुमारे ३०० हेक्टर शेतीसाठी सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचावे या दृष्टिने पाटांची डागडुजी करणे, पाणी अडू नये यासाठी पाणी वाहून जाणाऱ्या पात्रातील गवत कापणे व स्वच्छता ठेवणे आदी बाबी पाणी वापर संस्थेने शेतकऱ्यांच्या हितासाठी कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून त्याचे योग्य नियोजन करावे व सिंचनाच्या पाण्याचा व्यवस्थित उपयोग करावे, असे आवाहन समृद्धी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष इंद्रदास झिलपे, देविदास पालिवाल, दामोदर चांदेवार, शालिकराम हुकरे, वासुदेव लांजेवार, शालिकराम भोयर, वासुदेवराव उईके, विलास भावे, मोरेश्वर गोंडाणे, लिनता येरणे, मालन उईके, सुशीला गोंडाणे व संस्थेचे सचिव विजय मेश्राम यांनी केले आहे. (वार्ताहर)