शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

शेततळ्यातून हरितक्रांतीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2016 01:54 IST

मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण अनिश्चित व कमी झाल्याने कोरडवाहू शेती मुख्यता पावसावर अवलंबून असल्याने त्याचा विपरित परिणाम पिकांवर आणि उत्पादनावर झाला आहे.

जीवनमान उंचावण्यास मदत : शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात होणार वाढगोंदिया : मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण अनिश्चित व कमी झाल्याने कोरडवाहू शेती मुख्यता पावसावर अवलंबून असल्याने त्याचा विपरित परिणाम पिकांवर आणि उत्पादनावर झाला आहे. शेतीच्या उत्पादनात शाश्वतता आणणे तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त आहे. पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी जलसंवर्धन आणि पाणलोटच्या माध्यमातून सिंचनाची उपयुक्तता वाढविण्यासोबत संरक्षित आणि शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यातून हरितक्रांतीकडे वाटचाल करण्याचा संकल्प कृषी विभागाने केला आहे.शेततळ्यांच्या निर्मितीमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. शेततळे ही योजना शेतकऱ्यांसाठी संजीवनी देणारी ठरणार आहे. शेततळे कार्यक्रमाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. त्या शेतकऱ्यांची जमीन शेततळ्याकरिता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे. जेणेकरु न पावसाचे वाहणारे पाणी शेततळ्यामध्ये भरणे अथवा पुनर्भरण करणे शक्य होईल. अर्जदार शेतकऱ्याने यापूर्वी शेततळे, सामूदायिक शेततळे किंवा भात खाचरेसोबत तयार होणाऱ्या बोडीचा शासकीय योजनेतून लाभ घेतलेला, दारिद्र्य रेषेखालील शेतकरी व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या वारसांना निवड प्रक्रीयेमध्ये ज्येष्ठता यादीत सूट व प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तसेच या व्यतिरिक्त प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्याने निवड करण्यात येईल.मागेल त्याला शेततळे या योजनेमुळे लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचे आर्थिक स्तर उंचावण्यास मोठीच मदत होणार आहे. मागील पाच वर्षात एक वर्ष तरी ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावांमधील लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहतील. शेतकऱ्यांना १५ बाय १५ बाय ३ मीटर, २० बाय १५ बाय ३ व ३० बाय ३० बाय ३ मीटर आकाराचे शेततळे घेता येईल. अनुदानाची कमाल मर्यादा ५० हजार रुपये इतकी राहणार आहे. यापेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम लाभार्थ्याला खर्च करावी लागणार आहे. जास्तीत जास्त पाच शेतकऱ्यांचा गट करून त्यांना एकित्रतरित्या सामूदायिक शेततळे सदर आकारमानाचे तयार करता येईल. त्यांना मिळणारे अनुदान, पाण्याचा वापर आणि पाण्याची हिस्सेवारी याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर करार करु न तो अर्जासोबत शेततळे तयार करण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांकडे जमिनीचा सातबारा, ८ अ चा उतारा, दारिद्र्य रेषेखालील कार्ड/ आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे अर्ज तथा सहमती आवश्यक आहे. अर्जाची मागणी आॅनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे भरावयाची आहे. यासाठी अर्ज संकेतस्थळावार उपलब्ध असून ४५ दिवसांच्या आत अर्ज आॅनलाईन भरणे आवश्यक आहे. यासाठी अर्जदार स्वत: किंवा सायबर कॅफेतून संगणकाचा वापर करून अर्ज भरु शकतो. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले. (प्रतिनिधी)