शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

शेततळ्यातून हरितक्रांतीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2016 01:54 IST

मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण अनिश्चित व कमी झाल्याने कोरडवाहू शेती मुख्यता पावसावर अवलंबून असल्याने त्याचा विपरित परिणाम पिकांवर आणि उत्पादनावर झाला आहे.

जीवनमान उंचावण्यास मदत : शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात होणार वाढगोंदिया : मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण अनिश्चित व कमी झाल्याने कोरडवाहू शेती मुख्यता पावसावर अवलंबून असल्याने त्याचा विपरित परिणाम पिकांवर आणि उत्पादनावर झाला आहे. शेतीच्या उत्पादनात शाश्वतता आणणे तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त आहे. पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी जलसंवर्धन आणि पाणलोटच्या माध्यमातून सिंचनाची उपयुक्तता वाढविण्यासोबत संरक्षित आणि शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यातून हरितक्रांतीकडे वाटचाल करण्याचा संकल्प कृषी विभागाने केला आहे.शेततळ्यांच्या निर्मितीमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. शेततळे ही योजना शेतकऱ्यांसाठी संजीवनी देणारी ठरणार आहे. शेततळे कार्यक्रमाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. त्या शेतकऱ्यांची जमीन शेततळ्याकरिता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे. जेणेकरु न पावसाचे वाहणारे पाणी शेततळ्यामध्ये भरणे अथवा पुनर्भरण करणे शक्य होईल. अर्जदार शेतकऱ्याने यापूर्वी शेततळे, सामूदायिक शेततळे किंवा भात खाचरेसोबत तयार होणाऱ्या बोडीचा शासकीय योजनेतून लाभ घेतलेला, दारिद्र्य रेषेखालील शेतकरी व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या वारसांना निवड प्रक्रीयेमध्ये ज्येष्ठता यादीत सूट व प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तसेच या व्यतिरिक्त प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्याने निवड करण्यात येईल.मागेल त्याला शेततळे या योजनेमुळे लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचे आर्थिक स्तर उंचावण्यास मोठीच मदत होणार आहे. मागील पाच वर्षात एक वर्ष तरी ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावांमधील लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहतील. शेतकऱ्यांना १५ बाय १५ बाय ३ मीटर, २० बाय १५ बाय ३ व ३० बाय ३० बाय ३ मीटर आकाराचे शेततळे घेता येईल. अनुदानाची कमाल मर्यादा ५० हजार रुपये इतकी राहणार आहे. यापेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम लाभार्थ्याला खर्च करावी लागणार आहे. जास्तीत जास्त पाच शेतकऱ्यांचा गट करून त्यांना एकित्रतरित्या सामूदायिक शेततळे सदर आकारमानाचे तयार करता येईल. त्यांना मिळणारे अनुदान, पाण्याचा वापर आणि पाण्याची हिस्सेवारी याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर करार करु न तो अर्जासोबत शेततळे तयार करण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांकडे जमिनीचा सातबारा, ८ अ चा उतारा, दारिद्र्य रेषेखालील कार्ड/ आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे अर्ज तथा सहमती आवश्यक आहे. अर्जाची मागणी आॅनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे भरावयाची आहे. यासाठी अर्ज संकेतस्थळावार उपलब्ध असून ४५ दिवसांच्या आत अर्ज आॅनलाईन भरणे आवश्यक आहे. यासाठी अर्जदार स्वत: किंवा सायबर कॅफेतून संगणकाचा वापर करून अर्ज भरु शकतो. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले. (प्रतिनिधी)