शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख ९० हेक्टरमधील धानपिकावर अवकाळीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील बरेच शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात. हलका धान दिवाळीपूर्वी निघत असल्याने या धानाची लवकर मळणी करुन शेतकरी धान विक्रीसाठी बाजारपेठेत नेतात. यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यास आणि खरीप हंगामासाठी घेतलेली उधार उसणवारी फेडण्यास मदत होते.

ठळक मुद्देअवकाळीचा मिरची पिकालाही फटका : पावसामुळे धान सडण्याच्या मार्गावर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ९० हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. यंदा धानाला अनुकुल असा पाऊस झाल्याने धानाची चांगली वाढ झाली.त्यामुळे धानाचे बंफर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे १ लाख ९० हजार हेक्टरमधील धानावर ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले.त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.जिल्ह्यातील बरेच शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात. हलका धान दिवाळीपूर्वी निघत असल्याने या धानाची लवकर मळणी करुन शेतकरी धान विक्रीसाठी बाजारपेठेत नेतात. यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यास आणि खरीप हंगामासाठी घेतलेली उधार उसणवारी फेडण्यास मदत होते.यंदा खरीपातील धान असा अनुकुल असा पाऊस आणि वातावरण मिळाल्याने धानाची चांगली वाढ झाली. त्यामुळे कृषी विभागाने सुध्दा धानाच्या हेक्टरी उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तर जवळपास १० हजार हेक्टरमधील हलक्या धानाच्या कापणीला सुध्दा शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. मात्र मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या धानाच्या कळपा भिजल्या, तर काही ठिकाणी बांध्यामध्ये पाणी साचून राहिल्याने मोठ्या प्रमाणात धान सडला. परिणामी शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागला.सध्या ७० ते ८० टक्के धान कापणी योग्य झाला असून अवकाळी पावसामुळे धानाची कापणी करायची कशी असा बिकट प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.त्यामुळे कृषी आणि महसूल विभागाने धानाची पंचनामे करुन शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे.मिरची लागवडीवर परिणामढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे मिरचीची लागवड सुध्दा लांबणीवर पडली आहे. याचा मिरचीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव, देवरी, सडक अर्जुनी, गोंदिया या भागात जवळपास ४०० हेक्टरवर मिरचीची लागवड केली जाते. मात्र अवकाळी पावसामुळे यंदा मिरचीची लागवड लांबणीवर पडल्याने मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील खरीप हंगामातील धानाला मोठ्या प्रमाणात फटका बसला.अनेक शेतकºयांचा तोंडी आलेला घास हिरावल्या गेला. त्यामुळे शासनाने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी.- गंगाधर परशुरामकर, जि.प.सदस्य.धान पाखड होण्याची शक्यताअवकाळी पावसाचा कापणी केलेल्या धानाला फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात धान पाखड झाला आहे.पाखड झालेला धान खरेदी करण्यास व्यापारी तयारी होत नाही.शासकीय धान खरेदी केंद्रावर सुध्दा या धानाला कमी दर मिळतो त्यामुळे शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.धानाच्या दर्जावर परिणामअवकाळी पावसाचा फटका बसल्याने धानावर काजळी चढत असून पाखड देखील होत आहे.त्यामुळे याचा धानाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.त्यामुळे उच्च प्रतीच्या धानाला चांगला दर मिळण्यापासून शेतकºयांना वंचित राहावे लागत आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती