शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
5
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
7
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
8
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
9
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
10
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
11
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
12
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
13
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
14
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
15
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
16
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
17
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
18
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
19
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
20
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा

१ लाख ९० हेक्टरमधील धानपिकावर अवकाळीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील बरेच शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात. हलका धान दिवाळीपूर्वी निघत असल्याने या धानाची लवकर मळणी करुन शेतकरी धान विक्रीसाठी बाजारपेठेत नेतात. यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यास आणि खरीप हंगामासाठी घेतलेली उधार उसणवारी फेडण्यास मदत होते.

ठळक मुद्देअवकाळीचा मिरची पिकालाही फटका : पावसामुळे धान सडण्याच्या मार्गावर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ९० हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. यंदा धानाला अनुकुल असा पाऊस झाल्याने धानाची चांगली वाढ झाली.त्यामुळे धानाचे बंफर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे १ लाख ९० हजार हेक्टरमधील धानावर ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले.त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.जिल्ह्यातील बरेच शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात. हलका धान दिवाळीपूर्वी निघत असल्याने या धानाची लवकर मळणी करुन शेतकरी धान विक्रीसाठी बाजारपेठेत नेतात. यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यास आणि खरीप हंगामासाठी घेतलेली उधार उसणवारी फेडण्यास मदत होते.यंदा खरीपातील धान असा अनुकुल असा पाऊस आणि वातावरण मिळाल्याने धानाची चांगली वाढ झाली. त्यामुळे कृषी विभागाने सुध्दा धानाच्या हेक्टरी उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तर जवळपास १० हजार हेक्टरमधील हलक्या धानाच्या कापणीला सुध्दा शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. मात्र मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या धानाच्या कळपा भिजल्या, तर काही ठिकाणी बांध्यामध्ये पाणी साचून राहिल्याने मोठ्या प्रमाणात धान सडला. परिणामी शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागला.सध्या ७० ते ८० टक्के धान कापणी योग्य झाला असून अवकाळी पावसामुळे धानाची कापणी करायची कशी असा बिकट प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.त्यामुळे कृषी आणि महसूल विभागाने धानाची पंचनामे करुन शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे.मिरची लागवडीवर परिणामढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे मिरचीची लागवड सुध्दा लांबणीवर पडली आहे. याचा मिरचीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव, देवरी, सडक अर्जुनी, गोंदिया या भागात जवळपास ४०० हेक्टरवर मिरचीची लागवड केली जाते. मात्र अवकाळी पावसामुळे यंदा मिरचीची लागवड लांबणीवर पडल्याने मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील खरीप हंगामातील धानाला मोठ्या प्रमाणात फटका बसला.अनेक शेतकºयांचा तोंडी आलेला घास हिरावल्या गेला. त्यामुळे शासनाने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी.- गंगाधर परशुरामकर, जि.प.सदस्य.धान पाखड होण्याची शक्यताअवकाळी पावसाचा कापणी केलेल्या धानाला फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात धान पाखड झाला आहे.पाखड झालेला धान खरेदी करण्यास व्यापारी तयारी होत नाही.शासकीय धान खरेदी केंद्रावर सुध्दा या धानाला कमी दर मिळतो त्यामुळे शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.धानाच्या दर्जावर परिणामअवकाळी पावसाचा फटका बसल्याने धानावर काजळी चढत असून पाखड देखील होत आहे.त्यामुळे याचा धानाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.त्यामुळे उच्च प्रतीच्या धानाला चांगला दर मिळण्यापासून शेतकºयांना वंचित राहावे लागत आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती