शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

प्रवासी सुवधेसाठी अतिरिक्त ३०० फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा सण दिवाळी असून वर्षभर आपल्या घरी न आलेले अगत्याने दिवाळी मात्र आपल्या कुटूबियांसोबत साजरी करतात. यासाठी वर्षभरापासून त्यांचे नियोजन असते व दिवाळीची सुट्टी टाकून ते आपल्या घरी परततात. यात मोठ्या शहरात जावून कमविणाऱ्या मजूर वर्गाचे सर्वात जास्त प्रमाण असते. हेच कारण आहे की, दिवाळी आता तोंडावर आली असतानाच मजुरांचे जत्थे आपल्या गावी परतू लागले आहेत.

ठळक मुद्देगोंदिया आगाराचे दिवाळी नियोजन : २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर पर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या घरी परतणाºया प्रवाशांची सुविधा व्हावी म्हणून राज्य परिवहन मंडळाकडून बस फेºया वाढविल्या जातात. त्यानुसार, गोंदिया आगाराकडून यंदा अतिरीक्त ३०० फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान या फेऱ्या वाढविल्या जाणार आहेत. प्रवाशांना आपल्या घरापर्यंत पोहचण्यात सोय होणार असून शिवाय परिवहन मंडळाचे उत्पन्न ही वाढणार आहे.हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा सण दिवाळी असून वर्षभर आपल्या घरी न आलेले अगत्याने दिवाळी मात्र आपल्या कुटूबियांसोबत साजरी करतात. यासाठी वर्षभरापासून त्यांचे नियोजन असते व दिवाळीची सुट्टी टाकून ते आपल्या घरी परततात. यात मोठ्या शहरात जावून कमविणाऱ्या मजूर वर्गाचे सर्वात जास्त प्रमाण असते. हेच कारण आहे की, दिवाळी आता तोंडावर आली असतानाच मजुरांचे जत्थे आपल्या गावी परतू लागले आहेत. अशात कित्येकदा त्यांना आपल्या गावी पोहचण्यासाठी वाहनांची वाट बघत ताटकळत बसावे लागते. शिवाय खाजगी वाहनांतून धोक्याचा प्रवास करावा लागतो.हीच बाब हेरून व प्रवाशांच्या सुविधेसाठी गोंदिया आगाराने यंदा अतिरीक्त ३०० फेऱ्यांचे नियोजन केले आहे. आता शाळांना सुट्या लागणार असून अशात मानव विकासच्या बसेस मोकळ््या राहतील. दिवाळीच्या या नियोजनात या बसेस अस आगारातील अन्य बसेसला घेऊन हे ३०० फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.विशेष म्हणजे, ५ दिवसांच्या दिवाळीनंतरही आणखी ५-६ दिवस दिवाळीची रंगत असते व या काळात प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत या फेºयांचे नियोजन करण्यात आले आहे.बसेसमध्ये वाढली आतापासूनच गर्दीबाहेरगावी कमविण्यासाठी गेलेला मजूरवर्ग आता परत येत असताना दिसत असून रेल्वे सह बसस्थानकांवर त्यांचे जत्थे बघावयास मिळत आहेत. रेल्वेने मार्गावरील स्थानकांपर्यंतचा प्रवास होत असला तरिही आत असलेल्या गावात जाण्यासाठी बसेस हाच पर्याय आहे. परिणामी बसेस प्रवाशांनी भरभरून जात असल्याचे दिसत आहे. आता हे चित्र असताना दिवाळीच्या काळात ही गर्दी आणखी वाढणार यात शंका नाही.

टॅग्स :state transportएसटी