शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

विकास योजनांची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 9:08 PM

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामीण भाग व सर्वसामान्य नागरिकांच्या वैयक्तिक लाभासाठी शेकडो योजना राबविल्या जात आहेत. मात्र आजही ग्रामीण भागातील नागरिक मागासले आहेत. कारण त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती पोहचत नाही. अशात पंचायत समिती व ग्रामपंचायतींनी योजनांची माहिती प्रत्येकापर्यंत पोहचवावी. तेव्हाच सर्व सामान्यांचा विकास होणार असे प्रतिपादन आमदार ...

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : पंचायत समितीच्या आमसभेत विविध विषयांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामीण भाग व सर्वसामान्य नागरिकांच्या वैयक्तिक लाभासाठी शेकडो योजना राबविल्या जात आहेत. मात्र आजही ग्रामीण भागातील नागरिक मागासले आहेत. कारण त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती पोहचत नाही. अशात पंचायत समिती व ग्रामपंचायतींनी योजनांची माहिती प्रत्येकापर्यंत पोहचवावी. तेव्हाच सर्व सामान्यांचा विकास होणार असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.पंचायत समितीची वार्षिक आमसभा नुकतीच पार पडली असून सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, पशुसंवर्धन-कृषी विभागाकडे पशुधन विकासासाठी पशुपालकांना गाय-बैल देण्याची योजना आहे. मात्र ज्या लाभार्थ्यांच्या नावावर लाखो रूपयांचे पशुधन वितरीत केले जाते त्यांना या योजनेबाबत काही माहिती नसते. तसेच त्यांच्याकडे पशु ही नसते. यामुळे सरकारच्या निधीचा गैरवापर थांबविण्यासाठी गंभीर प्रयत्न व्हायला हवे. अन्यथा कठोर कारवाईसाठी तयार रहावे असा इशाराही त्यांनी पंचायत समितीतील सर्व पदाधिकारी व अधिकाऱ्यांना दिला.पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे यांनी, सर्व सामान्य नागरिकांच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी पंचायत समिती प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले. तर जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी यांनी, आमदारांच्या नेतृत्वात तालुका विविध विकास कामे होत असून अशी दूरदृष्टी अन्य लोकप्रतिनिधीत बघावयास मिळत नसल्याचे सांगीतले. दरम्यान सभेत कृषी, पंचायत, शिक्षण, पशुसवंर्धन, बांधकाम, महिला सशक्तीकरण व बालविकास, वीज मंडळ, पोलीस, तहसील कार्यालय, अन्न व नागरी पुरवठा आदि विषयांवर तालुक्यात सुरू असलेली कामे तसेच नागरिकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.सभेला जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, सभापती लता दोनोडे, बाजार समिती सभापती चुन्नी बेंद्रे, उपसभापती धनलाल ठाकरे, चमन बिसेन, स्नेहा गौतम, प्रकाश रहमतकर, अर्जुन नागपुरे, रूद्रसेन खांडेकर, सरिता अंबुले, लक्ष्मी रहांगडाले, ओमप्रकाश भक्तवर्ती, मनिष मेश्राम, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, विमल नागपुरे, अनिल मते, विनिता टेंभरे, निता पटले, प्रमिला करचाल, प्रकाश डहाट, जयप्रकाश बिसेन, प्रिया मेश्राम, सारंग भेलावे, हरिचंद कावळे, इंद्रानी धावडे, योगराज उपराडे यांच्यासह तालुक्यातील सरपंच, उपससरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.पाणी टंचाईवरही चर्चाआमसभेत आमदार अग्रवाल यांनी तालुक्यातील पाणी टंचाईचा विषय ही मांडला. त्यांनी पाणी टंचाईच्या समस्येशी निपटण्यासाठी योजनांवर गंभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे सांगीतले. तसेच याबाबत विधानसभेच्या अर्थसंकल्पीय सत्रात याकडे सरकारचे ध्यानाकर्षित केले असून पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश सरकारने जिल्हा प्रशासनाला दिल्याचे सांगीतले. तसेच शासनाच्या योजनांची माहिती सर्व नागरिक व सामाजीक कार्यकर्त्यांना व्हावी यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रस्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यास सांगीतले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल