शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

दृष्काळसदृश परिस्थितीची धास्ती

By admin | Updated: September 11, 2015 02:08 IST

जून, जुलै आणि आॅगस्ट हे तीन महिने पावसाचे असतात. या महिन्यांत पावसाने धोका दिल्यास शेतकऱ्यांचे भवितव्य खरे नाही.

शेतकरी चिंताग्रस्त : जिल्हा व तालुका प्रशासनाने तयारी ठेवावी काचेवानी : जून, जुलै आणि आॅगस्ट हे तीन महिने पावसाचे असतात. या महिन्यांत पावसाने धोका दिल्यास शेतकऱ्यांचे भवितव्य खरे नाही. गेल्या दहा वर्षांत या तीन महिन्यातील पावसाची सरासरी बघितल्यास कमी दिसून येईल. तिरोडा तालुक्यात पाऊस खूप कमी झाल्याने शेतकऱ्यांची शुद्ध हरपली आहे.सप्टेंबर महिन्यात पाऊस येतो, मात्र त्याचे प्रमाण फारच कमी असते. गेल्या तीन महिन्यांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सप्टेंबरमध्ये जोराचे पाऊस पडेल, असा शेतकऱ्यांचा अंदाज आणि आशा आहे. शेतकऱ्यांना आशा असण्याचे कारण म्हणजे यावर्षी अधिक मास असल्याने पूर्ण सण एक महिना उशीरा होत आहेत. रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी यासारखे सण असल्याने या सणांच्या वेळी पाऊस येतो, अशी शेतकऱ्यांची समज आहे. अपवाद वगळता २० आॅगस्टपर्यंत कसे-बसे रोहण्यांची कामे संपली. मात्र पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली आहे. हलक्या जातीच्या धान्याची दशा खूपच वाईट होणार आहे. काही धान गर्भी (पोटरीवर) आहेत तर काही येत्या १५ दिवसात गर्भी येणार आहेत. गर्भावस्थेत धान असताना पाण्याचे प्रमाण अधिक लागते. अशा अवस्थेत पाऊस कमी झाले तर शेतकऱ्यांचे नशीब फुटल्याशिवाय राहणार नाही. तिरोडा तालुक्यात गेल्या तीन महिन्यांत सरासरी पावसाचे प्रमाण कमी असल्याने आणि १५ ते २० दिवसांत पावसाने दडी मारल्याने दुष्काळी समस्या टाळता येणार नाही, अशी चिंता कवलेवाडा क्षेत्राचे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे. त्यांनी प्रशासकीय यंत्रणेने दुष्काळसदृश्य परिस्थिती पाहता तिरोडा तालुक्यातील संपूर्ण सरकारी यंत्रणेला सजग राहण्यास आणि नजर ठेवण्यास सांगण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने द्यावे, अशीही मागणी केली आहे. आॅगस्ट महिना संपलेला आहे. परंतु लहान-मोठे सरोवर निम्यापेक्षा कमी भरले आहेत. अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने पावसाचा साठा कमी असल्याने सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही. यावर जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. (वार्ताहर)प्रशासनाने सतर्क असावे वरूण देवतेची अवकृपा दिसून येत असल्याने जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, सिंचन विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि संबंधित प्रशासनाने तसेच तालुका स्तरावरील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी संबंधित अधिनस्थ कर्मचारी व अधिकाऱ्यांना दुष्काळसदृश्य परिस्थितीकडे जातीने लक्ष द्यावे. तसेच संपूर्ण प्रशासनान सजग रहावे, अशी मागणी जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी केली आहे.