शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

दृष्काळसदृश परिस्थितीची धास्ती

By admin | Updated: September 11, 2015 02:08 IST

जून, जुलै आणि आॅगस्ट हे तीन महिने पावसाचे असतात. या महिन्यांत पावसाने धोका दिल्यास शेतकऱ्यांचे भवितव्य खरे नाही.

शेतकरी चिंताग्रस्त : जिल्हा व तालुका प्रशासनाने तयारी ठेवावी काचेवानी : जून, जुलै आणि आॅगस्ट हे तीन महिने पावसाचे असतात. या महिन्यांत पावसाने धोका दिल्यास शेतकऱ्यांचे भवितव्य खरे नाही. गेल्या दहा वर्षांत या तीन महिन्यातील पावसाची सरासरी बघितल्यास कमी दिसून येईल. तिरोडा तालुक्यात पाऊस खूप कमी झाल्याने शेतकऱ्यांची शुद्ध हरपली आहे.सप्टेंबर महिन्यात पाऊस येतो, मात्र त्याचे प्रमाण फारच कमी असते. गेल्या तीन महिन्यांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सप्टेंबरमध्ये जोराचे पाऊस पडेल, असा शेतकऱ्यांचा अंदाज आणि आशा आहे. शेतकऱ्यांना आशा असण्याचे कारण म्हणजे यावर्षी अधिक मास असल्याने पूर्ण सण एक महिना उशीरा होत आहेत. रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी यासारखे सण असल्याने या सणांच्या वेळी पाऊस येतो, अशी शेतकऱ्यांची समज आहे. अपवाद वगळता २० आॅगस्टपर्यंत कसे-बसे रोहण्यांची कामे संपली. मात्र पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली आहे. हलक्या जातीच्या धान्याची दशा खूपच वाईट होणार आहे. काही धान गर्भी (पोटरीवर) आहेत तर काही येत्या १५ दिवसात गर्भी येणार आहेत. गर्भावस्थेत धान असताना पाण्याचे प्रमाण अधिक लागते. अशा अवस्थेत पाऊस कमी झाले तर शेतकऱ्यांचे नशीब फुटल्याशिवाय राहणार नाही. तिरोडा तालुक्यात गेल्या तीन महिन्यांत सरासरी पावसाचे प्रमाण कमी असल्याने आणि १५ ते २० दिवसांत पावसाने दडी मारल्याने दुष्काळी समस्या टाळता येणार नाही, अशी चिंता कवलेवाडा क्षेत्राचे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे. त्यांनी प्रशासकीय यंत्रणेने दुष्काळसदृश्य परिस्थिती पाहता तिरोडा तालुक्यातील संपूर्ण सरकारी यंत्रणेला सजग राहण्यास आणि नजर ठेवण्यास सांगण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने द्यावे, अशीही मागणी केली आहे. आॅगस्ट महिना संपलेला आहे. परंतु लहान-मोठे सरोवर निम्यापेक्षा कमी भरले आहेत. अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने पावसाचा साठा कमी असल्याने सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही. यावर जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. (वार्ताहर)प्रशासनाने सतर्क असावे वरूण देवतेची अवकृपा दिसून येत असल्याने जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, सिंचन विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि संबंधित प्रशासनाने तसेच तालुका स्तरावरील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी संबंधित अधिनस्थ कर्मचारी व अधिकाऱ्यांना दुष्काळसदृश्य परिस्थितीकडे जातीने लक्ष द्यावे. तसेच संपूर्ण प्रशासनान सजग रहावे, अशी मागणी जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी केली आहे.