शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

श्रुंगारबांध तलावात विदेशी पक्ष्यांचा मृत्यू ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:42 IST

अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील बोडगाव सुरबन येथील श्रुंगारबांध तलावाच्या पाण्यात दोन विदेशी पक्षी गुरुवारी मृतावस्थेत आढळले. या पक्ष्यांचा मृत्यू ...

अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील बोडगाव सुरबन येथील श्रुंगारबांध तलावाच्या पाण्यात दोन विदेशी पक्षी गुरुवारी मृतावस्थेत आढळले. या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू, विषयुक्त पाणी की अन्य कारणांमुळे झाला हा चर्चेचा विषय आहे. या पक्ष्यांच्या मृत्यूबद्दल अनभिज्ञता आहे. नेमका मृत्यू कशामुळे झाला याची शहानिशा होणे गरजेचे आहे.पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे तर झाला नाही ना? अशी शक्यता वर्तवली जात आहे.

गोंदिया जिल्ह्याची तलावांचा जिल्हा अशी सर्वदूर ओळख आहे. येथील तलावात दरवर्षी साधारणतः ऑक्टोबर महिन्यात विदेशी पक्ष्यांचे आगमन होत असते. जास्त तापमान सहन होत नसल्याने हे पक्षी हिवाळा संपला की फेब्रुवारी महिन्यात परत जातात. यावर्षी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित पक्षी आले. परतीचा काळ संपूनही अद्याप ते परत गेले नसल्याने पक्षीप्रेमींमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्जुनी मोरगाव येथील पक्षीमित्र डॉ. प्रा. गोपाल पालिवाल, डॉ. प्रा.शरद मेश्राम, प्रा.अजय राऊत यांनी रविवारी श्रुंगारबांध तलावाला भेट दिली. यंदाच्या हिवाळा ऋतूतील नियमित भेटीत जेवढे विदेशी पक्षी आढळून आले नाही त्यापेक्षा अधिक प्रमाणात त्यांना रविवारी या तलावावर विदेशी पक्षी आढळून आले. एवढ्या मोठ्या संख्येत पक्षी बघून ते थक्क झाले. या तलावावर जणू पक्ष्यांची शाळाच भरली होती हे दृश्य बघून त्यांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. मात्र तलावात दोन मोठे ग्रे लेग गुज (कलहंस) मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना आढळले. हे दृश्य बघून ते गहिवरले. एकीकडे त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू तर दुसरीकडे दुखाश्रूचे भाव स्पष्ट दिसून येत होते.

.....

नेमका मृत्यू कशामुळे ?

दोन स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी व तेवढीच खेदजनक बाब आहे. दिवसेंदिवस वाढत्या अतिक्रमणांमुळे तलावांचे क्षेत्र कमी होत चालले आहे. तलावांच्या काठावर शेती होत आहे. शेतात पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केली जाते. तेच पाणी तलावात येते किंवा शेतकरी कीटकनाशकाचा रिकामा झालेला डब्बा तलावाच्या दिशेने फेकून देतात. यातील विषारी द्रव्य तलावाच्या पाण्यात मिसळते व पाणी दूषित होतो. विषयुक्त पाणी प्राशन केल्याने पक्ष्यांचा मृत्यू संभवतो. असे अनेक प्रकार घडत असतात जे दृष्टीस येत नाहीत.

.....

तलावावर पक्ष्यांची शिकार

या तलावावर पक्ष्यांची शिकार सुद्धा होत असल्याचे बोलल्या जाते. पक्ष्यांचा बर्ड फ्ल्यूमुळे मृत्यू होण्याची शक्यता कमी आहे. बर्ड फ्ल्यूमुळे मृत्यू झाला असता तर याची बाधा इतर पक्ष्यांवर झाली असती व अधिक प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू झाला असता. अशीच एक दुर्दैवी घटना २९ जुलै २०११ रोजी घडली होती. या तलावात एक सारस पक्ष्यांची जोडी होती. या जोडीमुळेच श्रुंगारबांध तलाव नावारूपाला आला होता. अत्यंत दुर्मिळ असलेले सारस पक्ष्यांचे जोडपे कीटकनाशक औषधीयुक्त धानबिया खाल्ल्याने मृत्युमुखी पडले होते.