शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

डाक विभागाची कसरत : भारतीय संस्कृतीचे घडतेय दर्शन

By admin | Updated: August 17, 2016 00:07 IST

बहिण-भावाच्या पवित्र नात्यातील प्रेमाचे प्रतिक म्हणून रक्षाबंधन या सणाला आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.

गोंदिया : बहिण-भावाच्या पवित्र नात्यातील प्रेमाचे प्रतिक म्हणून रक्षाबंधन या सणाला आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच चिमुकल्या मुलींपासून सर्व महिलांना सध्या रक्षबंधनाचे वेध लागले आहेत. अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या या सणासाठी आवडीची राखी खरेदी करण्यासाठी मंगळवारी गोंदियाच्या मार्केटमध्ये महिलावर्गाची एकच गर्दी दिसून आली. अडचणीत किंवा संकटात भावाने बहिणीचे संरक्षण करण्याचे वचन म्हणून हा राखीचा धागा बांधला जात असला तरी केवळ एवढाच हेतू या रक्षाबंधनाचा नाही तर बहिण-भावाचे नाते आयुष्यभर एका प्रेमाच्या सूत्रात बांधले असावे, हा त्यामागील उद्देश्य असतो. पाश्चात्य संस्कृतीत रक्षाबंधनासारखे सण नाहीत. त्यामुळे तेथे बहिण-भावंडांमध्ये आपुलकी, आत्मियता, स्रेहभाव दिसून येत नाही. मात्र भारतीय संस्कृतीच्या वैशिष्ट्यांपैकी एक महत्वाचे वैशिष्ट म्हणजे रक्षाबंधन आहे. हा बंध केवळ धाग्याचा नसून बहिण-भावाच्या प्रेमाच्या नात्याचा असतो. वर्षभरातून केवळ एकदाच नारळी पौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या या सणाची प्रत्येक भारतीय भाऊ-बहिण उत्सुकतेने वाट पाहत असतात. या दिवशी मी आपल्या भावाला त्याच्याजवळ नसलेली एखादी वस्तू भेट देईन व माझ्या बहिणीला आवडणारी एखादी वस्तू भेट देईन, अशी आशा ते बाळगून असतात. बहिण भावाच्या नात्यातील ही ओढ केवळ आपल्या भारतीय संस्कृतीतच आढळते. त्यामुळेच महिलावर्गासोबत बहिणीला तिच्या आवडीचे गिफ्ट देण्यासाठी भाऊरायांचीही मार्केटमध्ये वर्दळ दिसून येत आहे. शहरातील बाजारपेठ राख्यांच्या दुकानांनी सजली आहे. विविध प्रकारचे रंगीबिरंगी व रक्षासूत्र विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहेत. आपल्या आवडीची रक्षासूत्रे पसंत करून महिला ती खरेदी करीत आहेत. पाच रूपयांपासून ते ५० रूपयांपर्यंत या रक्षासूत्रांचे दर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. शिवाय ५० रूपये डझन व १०० रूपये डझन याप्रमाणेसुद्धा राख्या विकल्या जात आहेत. परगावी राहणाऱ्या भावांना राख्या पाठविण्यासाठी लिफाफ्यांची विक्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रामीण भागात इतर सुविधा नसल्याने राख्या पोहोचविण्याच्या कामात डाकविभागाची मोठीच दमछाक होत आहे. डाक कार्यालयातही राख्यांनी भरलेल्या लिफाफ्यांची छाननी करण्यात डाक कर्मचारी व्यस्त असल्याचे चित्र दिसून येते. राखी विक्रीच्या दुकानांसह फळ व मिठाईच्या दुकानांवरही महिला व मुलींची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत फळांचे दरसुद्धा आकाशाला भिडले आहेत. कपडे व दागिण्यांच्या दुकानांवरही भावंडांची गर्दी आढळून येत आहे. ते आपल्या बहिणीला कपडे किंवा दागिणे भेट देण्यासाठी विविध दुकानांमध्ये चकरा मारताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे आधुनिक काळात अनेक सण कालबाह्य होताना दिसतात. मात्र रक्षाबंधन या सणाचे महत्त्व दरवर्षी वाढतच जात असल्याचे दिसते.(प्रतिनिधी)