शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

प्रत्येक जि.प. सदस्य करणार एक गाव स्वच्छू

By admin | Updated: November 22, 2014 23:04 IST

स्वच्छ भारताचे स्वप्न बघणाऱ्या पंतप्रधानांच्या संकल्पेला हातभार देण्यासाठी व जिल्हा स्वच्छ करण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेने सकारात्मक पाऊल उचलले आहे. संपूर्ण जिल्हा स्वच्छ, सुंदर,

गोंदिया : स्वच्छ भारताचे स्वप्न बघणाऱ्या पंतप्रधानांच्या संकल्पेला हातभार देण्यासाठी व जिल्हा स्वच्छ करण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेने सकारात्मक पाऊल उचलले आहे. संपूर्ण जिल्हा स्वच्छ, सुंदर, निर्मल व निरोगी करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत २६ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१४ दरम्यान स्वच्छ ग्राम योजना राबविली जाणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला कार्यक्षेत्रातील किमान एक गाव स्वच्छ ग्राम करावे लागणार आहे. स्वच्छ ग्राम योजनेंतर्गत एका वर्षात जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायती स्वच्छ, सुंदर, निर्मल व निरोगी करावयाच्या असून या योजनेंतर्गत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांच्यासह सर्वच जिल्हा परिषद सदस्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील एका गावाची निवड करून त्याचे पालकत्व स्विकारून त्या गावाला स्वच्छ ग्राम करावयाचे आहे. यासाठी निवड करताना गावे ही शक्यतो निर्मल भरत अभियानात समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीतूनच निवड करुन ती नावे जिल्हा परिषद अध्यक्षांकडे द्यावी लागणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी कुठल्याही निधीची तरतुद करण्यात आलेली नसून प्रत्येकाने आपले गाव आपलीच जबाबदारी समजून लोकसहभागाने व श्रमदानाने हे काम करायचे आहे. स्वच्छ ग्राम योजनेत सबंधित अधिकारी व कर्मचारी यांनीही या मोहिमेमध्ये सहभागी होवून किमान आठवड्यातून एक दिवस या ग्रामपंचायतीमध्ये श्रमदान करावयाचे असून गाव स्वच्छ, सुंदर, निर्मल व निरोगी करण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहे. या योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व स्वच्छ, सुंदर, निर्मल व निरोगी असणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, सचिव, ग्रा.पं.सदस्य व जिल्हा परिषद सदस्य यांचा २६ जानेवारी २०१५ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे, असे पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून कळविण्यात आले.