शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

प्रत्येक जि.प. सदस्य करणार एक गाव स्वच्छू

By admin | Updated: November 22, 2014 23:04 IST

स्वच्छ भारताचे स्वप्न बघणाऱ्या पंतप्रधानांच्या संकल्पेला हातभार देण्यासाठी व जिल्हा स्वच्छ करण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेने सकारात्मक पाऊल उचलले आहे. संपूर्ण जिल्हा स्वच्छ, सुंदर,

गोंदिया : स्वच्छ भारताचे स्वप्न बघणाऱ्या पंतप्रधानांच्या संकल्पेला हातभार देण्यासाठी व जिल्हा स्वच्छ करण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेने सकारात्मक पाऊल उचलले आहे. संपूर्ण जिल्हा स्वच्छ, सुंदर, निर्मल व निरोगी करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत २६ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१४ दरम्यान स्वच्छ ग्राम योजना राबविली जाणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला कार्यक्षेत्रातील किमान एक गाव स्वच्छ ग्राम करावे लागणार आहे. स्वच्छ ग्राम योजनेंतर्गत एका वर्षात जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायती स्वच्छ, सुंदर, निर्मल व निरोगी करावयाच्या असून या योजनेंतर्गत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांच्यासह सर्वच जिल्हा परिषद सदस्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील एका गावाची निवड करून त्याचे पालकत्व स्विकारून त्या गावाला स्वच्छ ग्राम करावयाचे आहे. यासाठी निवड करताना गावे ही शक्यतो निर्मल भरत अभियानात समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीतूनच निवड करुन ती नावे जिल्हा परिषद अध्यक्षांकडे द्यावी लागणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी कुठल्याही निधीची तरतुद करण्यात आलेली नसून प्रत्येकाने आपले गाव आपलीच जबाबदारी समजून लोकसहभागाने व श्रमदानाने हे काम करायचे आहे. स्वच्छ ग्राम योजनेत सबंधित अधिकारी व कर्मचारी यांनीही या मोहिमेमध्ये सहभागी होवून किमान आठवड्यातून एक दिवस या ग्रामपंचायतीमध्ये श्रमदान करावयाचे असून गाव स्वच्छ, सुंदर, निर्मल व निरोगी करण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहे. या योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व स्वच्छ, सुंदर, निर्मल व निरोगी असणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, सचिव, ग्रा.पं.सदस्य व जिल्हा परिषद सदस्य यांचा २६ जानेवारी २०१५ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे, असे पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून कळविण्यात आले.