शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

आजही त्यांची खिचडी एकातच

By admin | Updated: May 15, 2014 01:30 IST

आज भाऊच भावाच्या जीवावर उठला आहे. संपत्ती व स्वार्थापुढे नाते संबंध फिके पडताहेत. यातूनच परके तर सोडाच मात्र भाऊचं भावाचा गळा कापत आहे.

गोंदियातले जगताप कुटुंब : चार भावांचा परिवार साथ-साथकपिल केकत■ गोंदियाआज भाऊच भावाच्या जीवावर उठला आहे. संपत्ती व स्वार्थापुढे नाते संबंध फिके पडताहेत. यातूनच परके तर सोडाच मात्र भाऊचं भावाचा गळा कापत आहे. असे असतानाही मात्र कोठेतरी रक्ताच्या नात्यांतली ही गाठ आजही सैल झाली नसल्याचे बघावयास मिळत आहे. याचेच एक मुर्त उदाहरण येथील सिव्हील लाईन्स भागातील जगताप कुटुंब आहे. चार भावांचे हे कुटुंब आजही संयुक्त नांदत आहे. आजही त्यांची खिचडी एकातच असून येणार्‍या भावी पिढीसाठी आज या जगताप कुटुंबाचे आदर्श म्हणून उदाहरण दिले जात आहे.या कुटुंबाचा परिचय असा, गोपाळराव जगताप यांचे हे कुटुंब आहे. सन १९२५ मध्ये जवळील ग्राम चुलोद येथे वास्तव्यास असलेल्या गोपालराव जगताप यांचे १९४६ मध्ये गंगाबाई यांच्यासोबत लग्न झाले. रेल्वे विभागात कार्यरत गोपाळराव लग्ना नंतर सन १९४७ मध्ये गोंदियात स्थायी झाले. पुढे गंगाबाईंनी महेश, महादेव, वासुदेव, राजेंद्र, अनिल व विजय या सहा मुले आणि कमल व छाया या दोन मुलींना जन्म दिला. मुले जेमतेम मोठी होतच होती कि १९७२ मध्ये गोपाळरावांनी जगाचा निरोप घेतला. त्यावेळी महादेव हेच नोकरीवर होते व गोपाळरावांनंतर परिवाराची जबाबदारी आली ती आई गंगाबाई व थोरले सुपुत्र महेशराव यांच्यावर. मात्र महेश जगताप यांनी हि जबाबदारी उत्तमरित्या पेलली. बघता-बघता मुले-मुली मोठी झाली. महेश व राजेंद्र हे रेल्वे विभागातच नोकरीला लागले. तर वासुदेव यांना वडिलांच्या जागी नोकरी लागली. महादेव हे येथील धोटे प्रेसमध्ये कार्यरत आहेत.महेशरावांनी आपल्या थोरलेपणाचा परिचय येथेच दिला. त्यांनी सर्व धाकट्या भाऊ व बहिणींचे लग्न अगोदर उरकले व त्यानंतर शेवटी आपला विवाह केला. आज भावांमधील सर्वात धाकटे भाऊ अनिल व विजय यांचे निधन झाले असून चौघा भावांचाच परिवार गोंदियात वास्तव्यास आहे. चौघे भावंड चांगले कमावते असले तरिही त्यांचा घराचा पूर्ण कारभार आजही गंगाबाईं कडेच आहे. महेशरावांचे तसे घरातील सर्व भाऊ व सुनांना आदेशच आहे. विशेष बाब म्हणजे घरातील चारही सुना माला, उमा, कुंदा व नीताताई या सख्या बहिणींप्रमाणे एकत्रीत नांदत आहेत.यात महेश-मालाताईंना मिलिंद व भाग्यश्री, महादेव-उमाताईंना अंजली, वासुदेव-कुंदाताईंना मंजूषा, विवेक व कीर्ती तर राजेंद्र-नीताताईंना वैभव व कल्याणी ही अपत्य आहेत. यातील फक्त वैभव व कल्याणी हे शिक्षण घेत असून उर्वरितांचे लग्न झाले असून मुली आपल्या घरी सुखात नांदत आहेत. १९४७ पासून हा परिवार सिव्हिल लाईन्समध्येच वास्तव्यास असून त्यांच्या या संयुक्त कुटुंबामुळे शहरातही त्यांची वेगळी ओळख आहे.आज गंगाबाई ८४ वर्षांच्या आहेत. तरीही त्यांच्या आदेशानुसारच अख्या कुटुंबाची गाडी चालत आहे. यात वासुदेव घरचा सर्व कारभार मागील पाच वर्षांपासून बघत आहेत. तोही मात्र आई व महेशरावांच्या मार्गदर्शनातच. यांची मुले मोठी झाली, त्यांचे लग्न व अपत्य झाली असून त्यांच्यातही तीच आपुलकी बघावयास मिळते.आजही एखादा कार्यक्रम किंवा कर्तव्य असल्यास ते कुणा एका भावाच्या मुला-मुलीचेच नसून चौघा भावांसाठीचे आहे. या भावंड व त्यांच्या पत्नींमधील ही आपलुकीच आहे ज्यामुळे एवढा मोठा परिवार एकत्रीत राहत आहे. एका इमारतीतच ते सोबत राहत नसून त्यांचा स्वयंपाकही एकातच आहे. आज सुमारे १५ सदस्यांचा परिवार येथे आहे. त्यातील काही नोकरीमुळे बाहेर आहेत. मात्र सणासुदीला सर्व एकत्र आल्यावर जगताप परिवाराच्या या इमारतीतली गर्दी देखण्याजोगी असते.कुटुंबातील एकी हीच आमच्या विकासाची किल्ली आहे. कुटूंबात एकता असली तर एक शक्ती सोबत असते. घरातील मोठय़ांचा मान ठेवा, त्यांच्या मार्गदर्शनात राहावे हाच संदेश महेश जगताप या पिढीला देतात.