शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

आजही त्यांची खिचडी एकातच

By admin | Updated: May 15, 2014 01:30 IST

आज भाऊच भावाच्या जीवावर उठला आहे. संपत्ती व स्वार्थापुढे नाते संबंध फिके पडताहेत. यातूनच परके तर सोडाच मात्र भाऊचं भावाचा गळा कापत आहे.

गोंदियातले जगताप कुटुंब : चार भावांचा परिवार साथ-साथकपिल केकत■ गोंदियाआज भाऊच भावाच्या जीवावर उठला आहे. संपत्ती व स्वार्थापुढे नाते संबंध फिके पडताहेत. यातूनच परके तर सोडाच मात्र भाऊचं भावाचा गळा कापत आहे. असे असतानाही मात्र कोठेतरी रक्ताच्या नात्यांतली ही गाठ आजही सैल झाली नसल्याचे बघावयास मिळत आहे. याचेच एक मुर्त उदाहरण येथील सिव्हील लाईन्स भागातील जगताप कुटुंब आहे. चार भावांचे हे कुटुंब आजही संयुक्त नांदत आहे. आजही त्यांची खिचडी एकातच असून येणार्‍या भावी पिढीसाठी आज या जगताप कुटुंबाचे आदर्श म्हणून उदाहरण दिले जात आहे.या कुटुंबाचा परिचय असा, गोपाळराव जगताप यांचे हे कुटुंब आहे. सन १९२५ मध्ये जवळील ग्राम चुलोद येथे वास्तव्यास असलेल्या गोपालराव जगताप यांचे १९४६ मध्ये गंगाबाई यांच्यासोबत लग्न झाले. रेल्वे विभागात कार्यरत गोपाळराव लग्ना नंतर सन १९४७ मध्ये गोंदियात स्थायी झाले. पुढे गंगाबाईंनी महेश, महादेव, वासुदेव, राजेंद्र, अनिल व विजय या सहा मुले आणि कमल व छाया या दोन मुलींना जन्म दिला. मुले जेमतेम मोठी होतच होती कि १९७२ मध्ये गोपाळरावांनी जगाचा निरोप घेतला. त्यावेळी महादेव हेच नोकरीवर होते व गोपाळरावांनंतर परिवाराची जबाबदारी आली ती आई गंगाबाई व थोरले सुपुत्र महेशराव यांच्यावर. मात्र महेश जगताप यांनी हि जबाबदारी उत्तमरित्या पेलली. बघता-बघता मुले-मुली मोठी झाली. महेश व राजेंद्र हे रेल्वे विभागातच नोकरीला लागले. तर वासुदेव यांना वडिलांच्या जागी नोकरी लागली. महादेव हे येथील धोटे प्रेसमध्ये कार्यरत आहेत.महेशरावांनी आपल्या थोरलेपणाचा परिचय येथेच दिला. त्यांनी सर्व धाकट्या भाऊ व बहिणींचे लग्न अगोदर उरकले व त्यानंतर शेवटी आपला विवाह केला. आज भावांमधील सर्वात धाकटे भाऊ अनिल व विजय यांचे निधन झाले असून चौघा भावांचाच परिवार गोंदियात वास्तव्यास आहे. चौघे भावंड चांगले कमावते असले तरिही त्यांचा घराचा पूर्ण कारभार आजही गंगाबाईं कडेच आहे. महेशरावांचे तसे घरातील सर्व भाऊ व सुनांना आदेशच आहे. विशेष बाब म्हणजे घरातील चारही सुना माला, उमा, कुंदा व नीताताई या सख्या बहिणींप्रमाणे एकत्रीत नांदत आहेत.यात महेश-मालाताईंना मिलिंद व भाग्यश्री, महादेव-उमाताईंना अंजली, वासुदेव-कुंदाताईंना मंजूषा, विवेक व कीर्ती तर राजेंद्र-नीताताईंना वैभव व कल्याणी ही अपत्य आहेत. यातील फक्त वैभव व कल्याणी हे शिक्षण घेत असून उर्वरितांचे लग्न झाले असून मुली आपल्या घरी सुखात नांदत आहेत. १९४७ पासून हा परिवार सिव्हिल लाईन्समध्येच वास्तव्यास असून त्यांच्या या संयुक्त कुटुंबामुळे शहरातही त्यांची वेगळी ओळख आहे.आज गंगाबाई ८४ वर्षांच्या आहेत. तरीही त्यांच्या आदेशानुसारच अख्या कुटुंबाची गाडी चालत आहे. यात वासुदेव घरचा सर्व कारभार मागील पाच वर्षांपासून बघत आहेत. तोही मात्र आई व महेशरावांच्या मार्गदर्शनातच. यांची मुले मोठी झाली, त्यांचे लग्न व अपत्य झाली असून त्यांच्यातही तीच आपुलकी बघावयास मिळते.आजही एखादा कार्यक्रम किंवा कर्तव्य असल्यास ते कुणा एका भावाच्या मुला-मुलीचेच नसून चौघा भावांसाठीचे आहे. या भावंड व त्यांच्या पत्नींमधील ही आपलुकीच आहे ज्यामुळे एवढा मोठा परिवार एकत्रीत राहत आहे. एका इमारतीतच ते सोबत राहत नसून त्यांचा स्वयंपाकही एकातच आहे. आज सुमारे १५ सदस्यांचा परिवार येथे आहे. त्यातील काही नोकरीमुळे बाहेर आहेत. मात्र सणासुदीला सर्व एकत्र आल्यावर जगताप परिवाराच्या या इमारतीतली गर्दी देखण्याजोगी असते.कुटुंबातील एकी हीच आमच्या विकासाची किल्ली आहे. कुटूंबात एकता असली तर एक शक्ती सोबत असते. घरातील मोठय़ांचा मान ठेवा, त्यांच्या मार्गदर्शनात राहावे हाच संदेश महेश जगताप या पिढीला देतात.