शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

वीज पुरवठा खंडीत तरी शाळा शंभर टक्के डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 22:30 IST

तीन चार महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व १०६९ शाळा डिजीटल झाल्याचा गाजावाजा करीत स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र यापैकी १७३ शाळांमधील वीज पुरवठा खंडीत तर २१ शाळांमध्ये वीजच नाही.

ठळक मुद्दे२१ शाळांमध्ये वीजच नाही : जि.प.शिक्षण विभागाचा कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तीन चार महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व १०६९ शाळा डिजीटल झाल्याचा गाजावाजा करीत स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र यापैकी १७३ शाळांमधील वीज पुरवठा खंडीत तर २१ शाळांमध्ये वीजच नाही. मग शाळा शंभर टक्के डिजीटल कशा झाल्या असा प्रश्न सुज्ञ नागरिकांपुढे निर्माण झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या डिजीटल संकल्पनेला साथ देत शिक्षण विभागाने डिजीटलची कास धरली. खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावत असताना शिक्षण विभागाने शाळांना डिजीटल शिक्षणाचा डोज दिला.जि.प.शिक्षण विभागाने उचलेले हे शैक्षणिक पाऊल कौतुकास्पद होते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्व १०६९ शाळांमध्ये डिजीटल स्क्रीन आणि साहित्य उपलब्ध करुन दिले. फळ्यावर खडूने लिहून शिकविण्याऐवजी विद्यार्थ्यांना स्क्रीन बोर्डवर शिकविण्यास सुरूवात केली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यास मदत झाली. सध्या सगळीकडे डिजीटलचा बोलबाला आहे. त्यात काही गैर नाही. मात्र गोंदिया जि.प.शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळा शंभर टक्के डिजीटल झाल्याचा मोठा गाजावाजा केला होता. याच विभागाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील १७३ शाळांमधील वीज पुरवठा खंडीत आहे. त्यामागे विविध कारणे असल्याचे सांगितले. यापेक्षा धक्कादायक म्हणजे गावखेड्यांपर्यंत वीज पोहचली असताना जि.प.च्या २१ शाळांमध्ये अद्यापही वीज पोहचली नसल्याचे वास्तव पुढे आले. त्यामुळे जिल्ह्यातील शंभर टक्के शाळा डिजीटल कश्या झाल्या. एकाहीे शाळेमध्ये जनरेटरची व्यवस्था नाही मग विद्यार्थ्यांना डिजीटल स्क्रीनवर धडे कसे दिले जात आहे. असा प्रश्न सुज्ञ नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.यासंदर्भात शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधला त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले. तर सर्व शिक्षा अभियानातील अधिकाºयांनी सप्टेबरपर्यंत १७३ शाळांचा विद्युत पुरवठा खंडीत होता असे सांगितले. पण सध्या स्थितीत या शाळांचा वीज पुरवठा सुरळीत झाला अथवा नाही याची माहिती अपडेट नसल्याचे सांगितले.डिजिटलची पडताळणी करणार कोणजि.प.शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षण दिले जात असल्याचा दावा केला. मात्र ज्या शाळांमध्ये वीजच नाही तिथे विद्यार्थ्यांना डिजीटलचे धडे कसे दिले जात आहे. संगणकांची काय स्थिती आहे. याची जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी शाळेला भेट देऊन पडताळणी करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Schoolशाळा