शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅपरेशन मुस्कान’नंतरही त्यांचे जीवन ‘जैसे थे’

By admin | Updated: July 29, 2015 01:26 IST

बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांना त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने सुरू केलेल्या आॅपरेशन मुस्कानमध्ये

मुख्य प्रवाहापासून दूर : आई-वडील मजुरीवर, मुले करतात भटकंती, शैक्षणिक गंधही नाहीनरेश रहिले  गोंदियाबेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांना त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने सुरू केलेल्या आॅपरेशन मुस्कानमध्ये गोंदिया जिल्ह्यात २२ बालकांना शोधून काढल्याचे दाखविण्यात आले. परंतु केवळ बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करणे एवढे सोपस्कार करून पोलीस मोकळे झाले असले तरी भटकंती करणाऱ्या आणि मुख्य प्रवाहापासून भरकटलेल्या त्या बालकांच्या जीवनात कोणताही बदल झालेला नाही. अजूनही ते पूर्वीसारखेच जीवन जगत आहेत. केवळ अपहरण किंवा बेपत्ता झालेल्याच नाही तर आई-वडिलांपासून दुरावलेल्या आणि वाईट संगतीत लागलेल्या किशोरवयीन मुलांनाही या मोहिमेत पोलिसांनी पकडून त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. यात गोंदिया शहरातील रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत रेल्वे स्थानक परिसरात भटकंती करणाऱ्या सहा बालकांना पोलिसांनी पकडले होते. परंतु त्या सहापैैकी तीन बालकांचे आईवडील नसल्यामुळे त्यांना नागपूर येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे, तर तीन बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. ज्या बालकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले त्या बालकांची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांची स्थिती या अभियानानंतरही ‘जैसे थे’ असल्याचे सत्य दिसून आले.शासनाने हरविलेल्या किंवा बेपत्ता असलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यास सांगितले. परंतु रामनगर पोलिसांनी बालकांचा आकडा वाढविण्याच्या दृष्टीने रेल्वेस्थानक परिसरात फिरणाऱ्या तीन बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करून त्यांना रेल्वे स्थानकावर फिरू देऊ नका असे सांगितले. ही बालके अपहरण झालेली किंवा बेपत्ताही नव्हती. दिवसभर शहरात फिरत असली तरी ती बालके सायंकाळी स्वत:च्या घरी जात होती. मग अश्या बालकांना पकडून त्यांच्या आईवडीलांच्या स्वाधीन करण्यामागे पोलिसांचा काय हेतू होता? जी बालके बेपत्ता आहेत, ज्यांचे अपहरण झाले आहे, अश्या बालकांना पकडणे गरजेचे होते. परंतु त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. ज्या तीन बालकांना नागपूरला पाठिवण्यात आले त्या बालकांचे पालक नसल्यामुळे त्यांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली. परंतु सुधारगृहात पाठविल्यानेच ती बालके मुख्य प्रवाहात येतील का? असा प्रश्न आहे. कटंगीकला येथील यशकुमार गुलाब भुते (९) याचे आईवडील नसल्याने त्याला त्याचे नातेवाईक आशा भांडारकर यांच्याकडे ठेवण्यात आले. रेलटोली येथील साहिल सुनील भांडारकर (१४) या बालकाला त्याची आई आशा भांडारकर हिच्या स्वाधीन करण्यात आले. आकाश दिलीप यादव (१६) रा.कचरा मोहल्ला याला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र अशा बहुतांश बालकांचे मोलमजुरी करणारे आई-वडिल दिवसभर घरी नसतात. शाळेत ही मुले रमत नाहीत. त्यामुळे दिवसभर भटकंती करून मनात येईल ते करण्याची आणि वागण्याची त्यांची सवय आजही कायम आहे.मुख्य प्रवाहात कोण आणणार?ज्या बालकांना आॅपरेशन मुस्कानच्या माध्यमातून पकडण्यात येते त्या बालकांचे मातापिता नसल्यास त्या बालकांच्या शिक्षणाची, राहण्याची, खाण्यापिण्याची सोय शासनाने करून देणे आवश्यक आहे. परंतु तसे झाले नाही. ज्या बालकांचे मातापिता मिळाले त्यांच्या त्यांच्या स्वाधीन केले. पण ज्यांचे मातापिता नाहीत त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली. त्यामुळे त्या बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची सोय कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.सामाजिक संघटना उदासीनया बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. परंतु या बालकांना त्यांच्या हक्काचे शिक्षण देणे या मूळ संकल्पनेला तिलांजली देऊन फक्त त्यांना त्यांच्या आई-वडीलांच्या स्वाधीन करणे, आई वडील नसल्यास बालकल्याण समितीपुढे उभे करण्यापर्यंतचे काम पोलिस करतात. समितीने त्या बालकांना बालसुधारगृहात पाठविण्यास सांगितल्यावर पोलीस त्या बालकांना नेऊन सोडून देतात. त्यानंतर त्या बालकांकडे दुर्लक्ष केले जाते. या बालकांना इतर बालकांप्रमाणे सर्व प्रकारचे हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.