शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

डांबर प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 21:21 IST

निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या सिरेगावबांधच्या रम्य परिसरात हॉट मिक्सींग डांबर प्लांट बसविण्यात आले. यामुळे सिरेगावबांध तलावातील जैवविविधता, विदेशी पक्ष्यांचा मुक्तसंचार व नजीकच्या पहाडावरील वन्यप्राण्यांचे पाणवठा स्थानाला अडथळे निर्माण झाले आहेत.

ठळक मुद्देपरवानगीबाबत तर्कवितर्क : विदेशी पक्षी व वन्यजीवांच्या मुक्तसंचारात अडथळा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या सिरेगावबांधच्या रम्य परिसरात हॉट मिक्सींग डांबर प्लांट बसविण्यात आले. यामुळे सिरेगावबांध तलावातील जैवविविधता, विदेशी पक्ष्यांचा मुक्तसंचार व नजीकच्या पहाडावरील वन्यप्राण्यांचे पाणवठा स्थानाला अडथळे निर्माण झाले आहेत. निसर्गरम्य ठिकाणी या प्लांटची निर्मिती हा परिसरात चर्चेचा विषय आहे.सोमलपूर-गंगेझरी येथील गट क्रमांक-१०६ लगत सिरेगावबांध तलाव आहे.या तलावाशेजारी आमराई आहे. या तलावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात हिवाळ््यात विदेशी पक्षांचे आगमन होते. लागूनच पहाड व जंगल परिसर असल्याने जलाशयाच्या पाणवठ्यावर वन्यप्राण्यांचा संचार असतो. हा परिसर सानगडी-नवेगावबांध मार्गावर आहे. नवेगावबांध व्याघ्र प्रकल्प व इटियाडोह धरण बघण्यासाठी येणारे पर्यटक या निसर्गरम्य ठिकाणी थांबले नाही तर नवलच! अशा या निसर्गदत्त ठिकाणी एक महिन्यापूर्वी हॉट मिक्स डांबर प्लांट उभारण्यात आले आहे.महाराष्ट्र शासनाने शतकोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. या उद्दिष्टपृूर्तीसाठी गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र दुसरीकडे जागा बळकावून त्या जागेवरील झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे. याठिकाणी वृक्ष लागवड योजनेंतर्गत आंबा, जांभुळ व इतर वृक्ष लागवड करण्यात आली होती असे गावकरी सांगतात. आज त्याठिकाणी लागवड केलेले वृक्षच दृष्टीस येत नाही. या वृक्षांची कत्तल झाली की ते जगलेच नाही हा खरा प्रश्न आहे. एक मात्र खरे की, या ठिकाणी असलेली झुडपे नष्ट झाली आहे, हे वास्तव आहे.या ठिकाणी प्लांट उभारणीसाठी शासकीय विभाग व ग्रामपंचायतने परवानगी अथवा नाहरकत प्रमाणपत्र दिलेच कसे? हा संशोधनाचा विषय आहे. परवानगी दिली नसेल तर महसूल व वनविभाग मूग गिळून गप्प का आहे?याची शहानिशा करणे गरजेचे आहे.या प्रकारामुळे पक्षी अभ्यासक कमालीचे निराश झाले असून पक्ष्यांचे आश्रयस्थान व मुक्तसंचार धोक्यात आल्याची बाब त्यांना खटकत आहे. यामुळे पुढील वर्षी कदाचित या परिसरात विदेशी पक्षांचा मुक्तसंचार न्याहाळण्याची संधी उपलब्ध होणार नाही ही भीती त्यांच्या मनात घर करुन आहे. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.तो डांबर प्लांट हटवा- तरोणेसिरेगावबांध हे तालुक्याचे वैभव आहे. परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. दरवर्षी हिवाळ्यात याठिकाणी मोठ्या प्रमाणावर सातासमुद्रापलीकडून विदेशी पक्षी हजेरी लावतात. या काळात पर्यटकांना एक पर्वणीच असते. मात्र या प्लांटमुळे येथे धूळ होईल. वाहनांच्या आवागमनामुळे ध्वनी प्रदूषण होईल शिवाय विदेशी पक्षी व वन्यप्राण्यांच्या दैनंदिन मुक्तसंचारात अडथळे निर्माण होतील. शिवाय नैसर्गिक जैवविविधता नष्ट होईल. आमराईतील गावरान आंब्याच्या आस्वादापासून ग्रामस्थांना वंचित व्हावे लागेल शिवाय पर्यावरणाला धोका निर्माण होईल, अशी भीती जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी व्यक्त केली. प्रशासनाने हा प्लांट तातडीने हटविण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी,उपवनसंरक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग,विभागीय आयुक्त व पर्यावरण विभागाकडे केली आहे.

टॅग्स :environmentवातावरण