शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 21:05 IST

शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायीकांनी अतिक्रमण केले असल्याने रस्ते अरुंद झाले असून दर तासाला वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र शहरातील मुख्य चौकात पाहायला मिळते.

ठळक मुद्देआजपासून सुरूवात : रस्त्यावरील अतिक्रमण काढणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायीकांनी अतिक्रमण केले असल्याने रस्ते अरुंद झाले असून दर तासाला वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र शहरातील मुख्य चौकात पाहायला मिळते. यावर शहरवासीयांची ओरड वाढल्यानंतर वाहतूक नियंत्रण विभागाने नगर परिषदेसह शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी शुक्रवारपासून (दि.१०) शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.शहरातील रेल्वे स्थानक, गोरेलाल चौक, नेहरु चौक, गांधी प्रतिमा, चांदणी चौक, दुर्गा चौक या परिसरात मुख्य बाजारपेठ असल्याने नागरिकांची दिवसभर वर्दळ असते. मात्र या रस्त्याच्या दोन्हीे बाजुला मोठ्या व्यावसायीकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्त्यांची रुंदी कमी झालीे आहे. एखादे चारचाकी वाहन आल्यास संपूर्ण रस्ताच बंद होतो. दिवाळी व इतर सण उत्सवाच्या कालावधीत या रस्त्यावरुन पायी जाणे सुध्दा कठिण होते.यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. यावर मार्ग काढण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाने वन वे पार्कींगचा प्रयोग राबविला. मात्र त्यात सातत्य ठेवण्यात या विभागाला अपयश आले. विशेष म्हणजे शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शिपायांची नियुक्ती केली. मात्र याचाही काहीच उपयोग झाला नाही.त्यामुळे पुन्हा एकदा वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाने शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहीमेची सुरूवात शुक्रवारपासून केली जाणार आहे. या मोहीमेदरम्यान छोट्या व्यावसायिकांना लक्ष केले जाते की सर्वांवरच कारवाई केली जाते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणtraffic policeवाहतूक पोलीस