शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

धान पिकावर अळींचे अतिक्रमण

By admin | Updated: September 22, 2014 23:22 IST

कोपलेल्या निसर्गाच्या दुष्टचक्रात पुन्हा एकदा शेतकरी फसला अहे. धानपिकावर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. त्यात बहुतांश पिके पस्त झाली असून काही पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

रावणवाडी : कोपलेल्या निसर्गाच्या दुष्टचक्रात पुन्हा एकदा शेतकरी फसला अहे. धानपिकावर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. त्यात बहुतांश पिके पस्त झाली असून काही पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. रोगाला आटोक्यात आणण्याकरिता शेतकरी विविध कंपनीची महागडी किटकनाशकांची फवारणी करीत आहेत. मात्र हवामान उष्ण असल्यामुळे रोग आटोक्यात येताना दिसून येत नाही. कृषी विभागाने ग्रामपंचायत स्तरावर सवलतीच्या दरात किटकनाशक औषधे उपलब्ध करवून द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी सध्या अनेक समस्यांना तोंड देत आहे. त्यातून स्वत:च्या उत्थानासाठी सर्वतोपरी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र निसर्गाच्या दृष्टचक्रात फसगत होवून बळीराजा कर्जाच्या कचाट्यात सापडत आहे. अनेक वर्षापासून कधी पूर-महापूर तर कधी अवकाळी पाऊस, तर कधी कोरडा दुष्काळ, त्यात भर म्हणून विविध रोगांचे धानपिकावर आक्रमण अशा कालचक्राचा सामना त्यांना करावा लागत आहे. बळीराजाला शेतीसाठी खर्च अधिक तर त्या बदल्यात उत्पन्न कमी, अशी परिस्थिती आहे. मात्र धान उत्पादक बळीराजा आशावादी असल्याने आज नाही तर उद्या निसर्ग साथ देईल व कर्जाच्या बोझ्याची परतफेड करू, अशा आशेवर दरवर्षी तो शेती करतच आहे.यावर्षी पावसाळाच्या हंगामाला सुरूवात होऊनही दिड महिने पावसाचा एक थेंबही पडला नाही. शेतात पेरलेले धान जागीच फस्त झाले असून शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून कशीबशी रोवणी केली. मात्र हवा तसा पाऊस या हंगामात न आल्याने बळीराज्याची चिंता अधिकच वाढली. काही ठिकाणी तर पिके वाळून गेलीत, कुठे सिंचनाची अपुरी सोय आहे. त्या ठिकाणची पिके पाण्याअभावी करपून गेलीत. तर सध्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला असून विविध किडी, करपा, खोडकिडा, तुडतुडा, मावू अशा अनेक रोगांनी ग्रासले आहे. तरी बळीराजा सर्वकस प्रयत्न करून पीक वाचवण्याचा प्रयत्नात गुंतला आहे. या पिकावरील रोगांवर दुबार-तिबार किटनाशकांची फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नाही. त्यामुळे शासनाने समस्येची दखल घेऊन कृषी विभागामार्फत सवलतींच्या दरात औषधी उपलब्ध कराव्यात, तसेच ग्रामपंचायत स्तरावरून खत वितरण करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.