शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ

By admin | Updated: July 21, 2014 23:54 IST

जिल्हा परिषद अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाकडून आदिवासी उपाययोजना, सर्वसाधारण योजना व विशेष घटक योजनेतील लाभार्थ्यांना शासन योजनेंतर्गत वाटप करण्यासाठी सौर कंदील

सौर कंदील घोटाळा प्रकरण : समितीच्या बैठकीत मुद्याला दिली बगलआमगाव : जिल्हा परिषद अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाकडून आदिवासी उपाययोजना, सर्वसाधारण योजना व विशेष घटक योजनेतील लाभार्थ्यांना शासन योजनेंतर्गत वाटप करण्यासाठी सौर कंदील खरेदी करण्यात आले. परंतु जिल्हा परिषदेने जवळच्या व्यक्तींना पुरवठा देऊन बंद कंदील स्विकारले होते. परंतु हे घोळ उघड झाले. तर अधिकारी आता बंद कंदील खरेदी घोटाळा लिक केल्याचा ठपका कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर ठेवत त्यांच्यावर मानसिक अत्याचार करीत आहे. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाने आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना शासन योजनेंतर्गत सौर कंदील देण्यासाठी सौर कंदील खरेदी केले. यात आदिवासी उपाययोजनेंतर्गत जिल्ह्यातील नऊ प्रकल्पांतर्गत ७१ सौर कंदीलाकरिता एक लाख ९१ हजार ६०० रुपयांचे नियोजन केले होते. तर विशेष योजनेंतर्गत नऊ प्रकल्पांतर्गत १७९ सौर कंदीलांसाठी पाच लाख ३७ हजार रूपयांचे नियोजन, त्याचप्रमाणे सर्वसाधारण योजनेंतर्गत नऊ प्रकल्पांतर्गत ११४ सौर कंदीलांकरिता चार लाख ४२ हजार ३२० रुपयांचे नियोजन मंजूर करण्यात आले. या मंजूर निधीअंतर्गत सौर कंदील पुरवठा करण्यासाठी अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी मॅनेज पुरवठा धारकांनाच प्रथम पसंती दिली. त्यामुळे पुरवठा धारकांनी ब्रान्डेड कंदील कंपनीना आॅडर न देता बाजारातूनच सौर कंदीलांची उचल केली. त्यामुळे सौर कंदीलांच्या गुणवत्तेवर भर घालण्यात आली नाही. पुरवठा धारकांनी सौर कंदीलांचा पुरवठा मिळालेल्या मुदतीतच करुन घेतला. परंतु सौर कंदीलांच्या गुणवत्तेबाबत कोणीही तपासणी केली नाही.जिल्हा परिषदेला पुरवठा करण्यात आलेले सौर कंदील जिल्ह्यातील नऊ प्रकल्पांत लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी देण्यात आले. परंतु लाभार्थ्यांनी स्विकारलेले कंदील बंद असल्याची तक्रार प्रकल्प अधिकाऱ्यांना केली. त्यांनीही याची दखल घेत पुरवठा झालेले सौर कंदील बंद असल्याची सुचना जिल्हा परिषदेला दिली. तर महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीतही प्रकल्प अधिकाऱ्यांनी मुद्दा उपस्थित करुन बंद सौर कंदील बदलून घेण्याची विनंती केली. परंतु अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. दुसरीकडे लाभार्थ्यांनी मिळालेल्या बंद सौर कंदीलाचे प्रकरणाबाबत इतरांना माहिती दिली व त्यामुळे प्रकरणाचे घोळ पुढे आले.जिल्हा परिषद अंतर्गत पुरवठा प्रकरणात आलेले बंद कंदील लाभार्थ्यांना देण्यापर्यंतचे कार्य प्रकल्प अधिकाऱ्यांनी करावे असे निर्देश् असताना सुद्धा बंद सौर कंदील खरेदी प्रकरण पत्रकारांना कसे माहिती झाले हा शोधाचा विषय घेऊन अधिकारी याचा ठपका प्रकल्प अधिकाऱ्यांवर ठेवत आहेत. प्रकरण बाहेर गेल्या प्रकरणी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरुन त्यांचा मानसिक छळ करीत असल्याची विश्वसनीय माहिती पुढे आली आहे.जिल्हा परिषदेने लोक कल्याणकारी शासनाच्या योजनांना नागरिकांपर्यंत घेऊन जाण्याचे ध्येय बाळगण्याची आवश्यकता आहे. यात आदिवासी विशेष घटक व सर्वसाधारण घटकांना शासन योजनांमुळे आधार मिळतो. परंतु अधिकारी व पदाधिकारी या योजनांच्या माध्यमातून घोळ करतात. (शहर प्रतिनिधी)