शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

कर्मचारी संपावर ठाम, बस आगारातच उभ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 05:00 IST

संप मोडण्यासाठी महामंडळाकडून कित्येक प्रयोग करण्यात आले. मात्र, यंदा कर्मचारी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. यामुळेच ते पगारवाढ व कारवाईंना दाद देत नसल्याचे दिसत आहे. त्यात आता परिवहनमंत्र्यांनी संप मिटल्याची घोषणा केल्याची माहिती आहे. मात्र, त्यांच्या या घोषणेनंतरही कर्मचाऱ्यांवर काहीच परिणाम झालेला नसल्याचे जिल्ह्यातील दोन्ही आगारांत दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :­  २७ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपाला आता २ महिने होत आले आहेत. या संपामुळे एकीकडे महामंडळाचे नुकसान होत असतानाच सर्वसामान्य प्रवशांनाही चांगलाच फटका बसत असून त्रास सहन करावा लागत आहे. संप मोडण्यासाठी महामंडळाकडून कित्येक प्रयोग करण्यात आले. मात्र, यंदा कर्मचारी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. यामुळेच ते पगारवाढ व कारवाईंना दाद देत नसल्याचे दिसत आहे. त्यात आता परिवहनमंत्र्यांनी संप मिटल्याची घोषणा केल्याची माहिती आहे. मात्र, त्यांच्या या घोषणेनंतरही कर्मचाऱ्यांवर काहीच परिणाम झालेला नसल्याचे जिल्ह्यातील दोन्ही आगारांत दिसून येत आहे. कारण, दोन्ही आगारांत आहे तीच स्थिती असून, पूर्वीपासून कामावर येत असलेल्या मोजक्या कर्मचाऱ्यांना सोडून आता अन्य कर्मचारी कामावर परतून आले नाहीत. परिणामी पूर्ण फेऱ्या बंद असून, दोन्ही आगारांतील बस आगारातच होत्या तशाच उभ्या आहेत. 

४५ दिवसांत ५.६२ कोटींचे नुकसान 

nकर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपाला आता ४५ दिवसांपेक्षा जास्तीचा काळ झाला आहे. यामुळे दोन्ही आगारांना चांगलाच  फटका बसला आहे. आगारनिहाय बघितल्यास गोंदिया आगाराला सुमारे तीन कोटी ८२ लाख ५० हजार रुपयांचा, तर तिरोडा आगाराला सुमारे एक कोटी ८० लाख रुपयांचा फटका बसला आहे. एकंदर सुमारे पाच कोटी ६२ लाख ५० हजार रुपयांचे दोन्ही आगारांचे मिळून नुकसान झाले आहे. 

कर्मचाऱ्यांवर कारवाईची चिन्हेnसंपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर महामंडळाने कारवाई केली असून, यामध्ये गोंदिया आगारातील २२, तर तिरोडा आगारातील ३१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शिवाय, आता परिवहन मंत्र्यांनी संप मिटला अशी घोषणा केल्यानंतरही कर्मचारी कामावर परतून आलेले नाहीत. अशात त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांवर विभागीय कार्यालयाकडून कारवाई केली जात असल्याने पुढे काय? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

संपामुळे  पदरात काय पडले

दुखवटा सुरूच राहणार आम्ही संपात नसून आमचे जे कर्मचारी मृत्यूमूखी पडले. त्यांचा दुखवटा करीत आहोत. जोपर्यंत महामंडळाचे शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत हा दुखवटा सुरूच राहणार.     सईद शेख (कर्मचारी) 

आमच्या ज्या कर्मचाऱ्यांचा जीव गेला आहे, आम्ही त्यांच्या दुखवट्यात आहोत आणि जोपर्यंत महामंडळाचे शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हा दुखवटा सुरूच राहणार आहे. - अमोल काजळे (कर्मचारी)

जिल्ह्यात आहे तीच स्थिती आगारात पूर्वीपासून जेवढे कर्मचारी कामावर येत होते, तेवढेच कर्मचारी कामावर येत आहेत. आतापर्यंत अन्य कर्मचारी कामावर परतून आलेले नाहीत. परिणामी, पूर्ण फेऱ्या बंद असून बस आगारातच उभ्या आहेत. त्यामुळे संप केव्हा मागे होतो याकडे लक्ष आहे.- पंकज दांडगे आगारप्रमुख, तिरोडा 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप