शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी संपावर ठाम, बस आगारातच उभ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 05:00 IST

संप मोडण्यासाठी महामंडळाकडून कित्येक प्रयोग करण्यात आले. मात्र, यंदा कर्मचारी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. यामुळेच ते पगारवाढ व कारवाईंना दाद देत नसल्याचे दिसत आहे. त्यात आता परिवहनमंत्र्यांनी संप मिटल्याची घोषणा केल्याची माहिती आहे. मात्र, त्यांच्या या घोषणेनंतरही कर्मचाऱ्यांवर काहीच परिणाम झालेला नसल्याचे जिल्ह्यातील दोन्ही आगारांत दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :­  २७ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपाला आता २ महिने होत आले आहेत. या संपामुळे एकीकडे महामंडळाचे नुकसान होत असतानाच सर्वसामान्य प्रवशांनाही चांगलाच फटका बसत असून त्रास सहन करावा लागत आहे. संप मोडण्यासाठी महामंडळाकडून कित्येक प्रयोग करण्यात आले. मात्र, यंदा कर्मचारी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. यामुळेच ते पगारवाढ व कारवाईंना दाद देत नसल्याचे दिसत आहे. त्यात आता परिवहनमंत्र्यांनी संप मिटल्याची घोषणा केल्याची माहिती आहे. मात्र, त्यांच्या या घोषणेनंतरही कर्मचाऱ्यांवर काहीच परिणाम झालेला नसल्याचे जिल्ह्यातील दोन्ही आगारांत दिसून येत आहे. कारण, दोन्ही आगारांत आहे तीच स्थिती असून, पूर्वीपासून कामावर येत असलेल्या मोजक्या कर्मचाऱ्यांना सोडून आता अन्य कर्मचारी कामावर परतून आले नाहीत. परिणामी पूर्ण फेऱ्या बंद असून, दोन्ही आगारांतील बस आगारातच होत्या तशाच उभ्या आहेत. 

४५ दिवसांत ५.६२ कोटींचे नुकसान 

nकर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपाला आता ४५ दिवसांपेक्षा जास्तीचा काळ झाला आहे. यामुळे दोन्ही आगारांना चांगलाच  फटका बसला आहे. आगारनिहाय बघितल्यास गोंदिया आगाराला सुमारे तीन कोटी ८२ लाख ५० हजार रुपयांचा, तर तिरोडा आगाराला सुमारे एक कोटी ८० लाख रुपयांचा फटका बसला आहे. एकंदर सुमारे पाच कोटी ६२ लाख ५० हजार रुपयांचे दोन्ही आगारांचे मिळून नुकसान झाले आहे. 

कर्मचाऱ्यांवर कारवाईची चिन्हेnसंपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर महामंडळाने कारवाई केली असून, यामध्ये गोंदिया आगारातील २२, तर तिरोडा आगारातील ३१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शिवाय, आता परिवहन मंत्र्यांनी संप मिटला अशी घोषणा केल्यानंतरही कर्मचारी कामावर परतून आलेले नाहीत. अशात त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांवर विभागीय कार्यालयाकडून कारवाई केली जात असल्याने पुढे काय? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

संपामुळे  पदरात काय पडले

दुखवटा सुरूच राहणार आम्ही संपात नसून आमचे जे कर्मचारी मृत्यूमूखी पडले. त्यांचा दुखवटा करीत आहोत. जोपर्यंत महामंडळाचे शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत हा दुखवटा सुरूच राहणार.     सईद शेख (कर्मचारी) 

आमच्या ज्या कर्मचाऱ्यांचा जीव गेला आहे, आम्ही त्यांच्या दुखवट्यात आहोत आणि जोपर्यंत महामंडळाचे शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हा दुखवटा सुरूच राहणार आहे. - अमोल काजळे (कर्मचारी)

जिल्ह्यात आहे तीच स्थिती आगारात पूर्वीपासून जेवढे कर्मचारी कामावर येत होते, तेवढेच कर्मचारी कामावर येत आहेत. आतापर्यंत अन्य कर्मचारी कामावर परतून आलेले नाहीत. परिणामी, पूर्ण फेऱ्या बंद असून बस आगारातच उभ्या आहेत. त्यामुळे संप केव्हा मागे होतो याकडे लक्ष आहे.- पंकज दांडगे आगारप्रमुख, तिरोडा 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप