शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

धापेवाडाचे पाणी मिळण्यासाठी सतत चार दिवस वीज पुरवठा

By admin | Updated: February 28, 2015 01:02 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने केल्या जाणाऱ्या विद्युत पुरवठ्यादरम्यान ग्रामीण भागात दररोज आठ तास लोडशेंडीग व आठ तास सिंगल फेज विद्युत पुरवठा ...

तिरोडा : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने केल्या जाणाऱ्या विद्युत पुरवठ्यादरम्यान ग्रामीण भागात दररोज आठ तास लोडशेंडीग व आठ तास सिंगल फेज विद्युत पुरवठा असे शेती फिडरसाठी वेळापत्रक तयार केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांंना रबी हंगामासाठी पिकांना पाणी देणे कठीण होते. यासंदर्भात आ.विजय रहांगडाले यांनी शासन स्तरावर केलेल्या पत्रव्यवहारानंतर यावर महत्वपूर्ण बैठक होऊन शेतकऱ्यांना सतत चार दिवस पूर्ण विद्युत पुरवठा देण्याचा निर्णय घेण्यात आला. धापेवाडा उपसा सिंचन टप्पा १ करीता १६ तास सतत वीज पुरवठा असून दररोज आठ तास भारनियमन होते. त्यात पाणी उपसा करण्यासाठी मोठमोठ्या मशीन वापरण्यात आल्या आहेत. त्या मशीन सुरळीत वेगात येण्यासाठी ६ तासांचा कालावधी लागतो. पर्यायाने दररोज १० तास पाण्याचा उपसा होऊन आठ तास भारनियमन झाल्याने पाण्याचा उपसा खंडीत होतो. पर्यायाने दुसऱ्या दिवशीसुध्दा ६ तास मशीनला सुरळीत सुरू होण्यासाठी लागतात. याचा परिणाम म्हणून शेवटपर्यत पाणी पोहचत नव्हते. या परिस्थितीत बदल करावा यासाठी आ. विजय रहांगडाले यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे, महावितरणचे मुख्य अभियंता बापट, अधीक्षक अभियंता फुलकर, धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प विभाग तिरोडाचे अभियंता वासटकर व तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यात यापुढे सतत चार दिवस विद्युत पुरवठा देवून उरलेले तीन दिवस भारनियमन देण्यात यावे, असे ठरले यामुळे शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत उपसा सिंचन योजनेचे पाणी पोहोचणार आहे. यातून शेतकरी रबीचे पीक घेऊ शकतील. (प्रतिनिधी)