शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
3
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
4
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
5
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
6
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
7
२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण
8
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
9
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
10
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!
11
'विराटला १८ वर्षांनंतर जिंकताना पाहून...", आरसीबीच्या विजयावर जिनिलियाची प्रतिक्रिया
12
फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा
13
चीननं केला विश्वासघात, भारताला दिली 'या' देशाने साथ; ५ वर्षाचं टेन्शन मिटलं, शेतकऱ्यांना मोठा फायदा
14
Sneha Debnath : ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
15
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
16
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
17
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
18
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
19
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
20
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली

182 गावांची बत्ती केली गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 05:00 IST

गावातील पथदिव्यांचे वीज बिल जिल्हा परिषदेकडून भरले जात होते. मात्र, मध्यंतरी शासनाने त्यावर बंदी लावली आहे. परिणामी गावातील पथदिव्यांपोटी ग्रामपंचायतींना येणारे भरमसाट बिल भरण्याची त्यांची ताकद नाही. अशात ग्रामपंचायतींवर वीज बिलाची थकबाकी वाढत चालली होती. थकबाकीच्या गंभीर समस्येशी महावितरण अगोदरच लढत असून, त्यात ग्रामपंचायतींची पथदिव्यांची कोट्यवधींची थकबाकी अधिकच डोकेदुखी ठरत होती. अशात महावितरणने ग्रामपंचायतींची जोडणी कापण्यास सुरूवात केली. 

कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गावातील पथदिव्यांचे वीज बिल कोण भरणार, हा विषय अद्याप सुटलेला नसल्याने वीज बिल थकलेल्या जिल्ह्यातील १८२ ग्रामपचायतींची बत्ती महावितरणने गुल केली आहे. परिणामी या गावांतील पथदिवे बंद असून, आता पावसाळ्याच्या तोंडावर ही गावे अंधारात आहेत. गावातील पथदिव्यांचे वीज बिल जिल्हा परिषदेकडून भरले जात होते. मात्र, मध्यंतरी शासनाने त्यावर बंदी लावली आहे. परिणामी गावातील पथदिव्यांपोटी ग्रामपंचायतींना येणारे भरमसाट बिल भरण्याची त्यांची ताकद नाही. अशात ग्रामपंचायतींवर वीज बिलाची थकबाकी वाढत चालली होती. थकबाकीच्या गंभीर समस्येशी महावितरण अगोदरच लढत असून, त्यात ग्रामपंचायतींची पथदिव्यांची कोट्यवधींची थकबाकी अधिकच डोकेदुखी ठरत होती. अशात महावितरणने ग्रामपंचायतींची जोडणी कापण्यास सुरूवात केली. महावितरणच्या या कठोर कारवाईमुळे मध्यंतरी चांगलेच वादळही उठले होते. त्यातच सरपंच संघटनांनी वीज या प्रकाराचा विरोध करून वीज बिल जिल्हा परिषदेने (शासनानेच) भरावे, यासाठी प्रयत्नही चालविले होते. मात्र, त्यानंतरही या विषयावर काहीच तोडगा निघाला नाही. कारण आजही जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींची बत्ती महावितरणने गुल केली आहे. 

पावसाळा बघता गावकऱ्यांना भीती- पावसाळा म्हटला म्हणजे आजारांचा काळ असून, त्यात सरपटणारे विषारी प्राणीसुद्धा जोर घेतात. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात कीटक व सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका जास्त असतो. अशात महावितरणने पथदिव्यांची जोडणी कापल्यामुळे ही गावे अंधारात राहणार आहेत. यामुळे पावसाळा बघता गावकरी भीतीत वावरत आहेत. 

 २.८४ कोटींची थकबाकी 

- महावितरणची जिल्हावासीयांवर अगोदरच कोट्यवधीच्या घरात थकबाकी असून, ती भरून काढण्यासाठी महावितरणकडून सातत्याने मोहीम राबविली जात आहे. मात्र, त्यानंतरही पाहिजे त्या प्रमाणात वसुली होत नसून दरमहा त्यात भर पडत जाते. हाच प्रकार ग्रामपंचायतींच्या बाबतीत घडला असून, महावितरणचे १८२ ग्रामपंचायतींवर २,८४,०६,१९८ रुपये थकून आहेत. परिणामी महावितरणला एवढा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. सर्वाधिक थकबाकी अर्जुनी - मोरगाव तालुक्यावर - जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींवर महावितरणची २.८४ कोटींची थकबाकी असतानाच यातील सर्वाधिक १,६६,७४,१२१ रुपये अर्जुनी - मोरगाव तालुक्यावर थकून आहेत, तर सर्वात कमी थकबाकी तिरोडा तालुक्यावर ३,५१,४७३ रुपये एवढी आहे. 

 

टॅग्स :electricityवीज