शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
4
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
5
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
6
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
7
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
8
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
9
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
10
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
11
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
12
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
13
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
14
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
15
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
16
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
17
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
18
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
19
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
20
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
Daily Top 2Weekly Top 5

182 गावांची बत्ती केली गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 05:00 IST

गावातील पथदिव्यांचे वीज बिल जिल्हा परिषदेकडून भरले जात होते. मात्र, मध्यंतरी शासनाने त्यावर बंदी लावली आहे. परिणामी गावातील पथदिव्यांपोटी ग्रामपंचायतींना येणारे भरमसाट बिल भरण्याची त्यांची ताकद नाही. अशात ग्रामपंचायतींवर वीज बिलाची थकबाकी वाढत चालली होती. थकबाकीच्या गंभीर समस्येशी महावितरण अगोदरच लढत असून, त्यात ग्रामपंचायतींची पथदिव्यांची कोट्यवधींची थकबाकी अधिकच डोकेदुखी ठरत होती. अशात महावितरणने ग्रामपंचायतींची जोडणी कापण्यास सुरूवात केली. 

कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गावातील पथदिव्यांचे वीज बिल कोण भरणार, हा विषय अद्याप सुटलेला नसल्याने वीज बिल थकलेल्या जिल्ह्यातील १८२ ग्रामपचायतींची बत्ती महावितरणने गुल केली आहे. परिणामी या गावांतील पथदिवे बंद असून, आता पावसाळ्याच्या तोंडावर ही गावे अंधारात आहेत. गावातील पथदिव्यांचे वीज बिल जिल्हा परिषदेकडून भरले जात होते. मात्र, मध्यंतरी शासनाने त्यावर बंदी लावली आहे. परिणामी गावातील पथदिव्यांपोटी ग्रामपंचायतींना येणारे भरमसाट बिल भरण्याची त्यांची ताकद नाही. अशात ग्रामपंचायतींवर वीज बिलाची थकबाकी वाढत चालली होती. थकबाकीच्या गंभीर समस्येशी महावितरण अगोदरच लढत असून, त्यात ग्रामपंचायतींची पथदिव्यांची कोट्यवधींची थकबाकी अधिकच डोकेदुखी ठरत होती. अशात महावितरणने ग्रामपंचायतींची जोडणी कापण्यास सुरूवात केली. महावितरणच्या या कठोर कारवाईमुळे मध्यंतरी चांगलेच वादळही उठले होते. त्यातच सरपंच संघटनांनी वीज या प्रकाराचा विरोध करून वीज बिल जिल्हा परिषदेने (शासनानेच) भरावे, यासाठी प्रयत्नही चालविले होते. मात्र, त्यानंतरही या विषयावर काहीच तोडगा निघाला नाही. कारण आजही जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींची बत्ती महावितरणने गुल केली आहे. 

पावसाळा बघता गावकऱ्यांना भीती- पावसाळा म्हटला म्हणजे आजारांचा काळ असून, त्यात सरपटणारे विषारी प्राणीसुद्धा जोर घेतात. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात कीटक व सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका जास्त असतो. अशात महावितरणने पथदिव्यांची जोडणी कापल्यामुळे ही गावे अंधारात राहणार आहेत. यामुळे पावसाळा बघता गावकरी भीतीत वावरत आहेत. 

 २.८४ कोटींची थकबाकी 

- महावितरणची जिल्हावासीयांवर अगोदरच कोट्यवधीच्या घरात थकबाकी असून, ती भरून काढण्यासाठी महावितरणकडून सातत्याने मोहीम राबविली जात आहे. मात्र, त्यानंतरही पाहिजे त्या प्रमाणात वसुली होत नसून दरमहा त्यात भर पडत जाते. हाच प्रकार ग्रामपंचायतींच्या बाबतीत घडला असून, महावितरणचे १८२ ग्रामपंचायतींवर २,८४,०६,१९८ रुपये थकून आहेत. परिणामी महावितरणला एवढा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. सर्वाधिक थकबाकी अर्जुनी - मोरगाव तालुक्यावर - जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींवर महावितरणची २.८४ कोटींची थकबाकी असतानाच यातील सर्वाधिक १,६६,७४,१२१ रुपये अर्जुनी - मोरगाव तालुक्यावर थकून आहेत, तर सर्वात कमी थकबाकी तिरोडा तालुक्यावर ३,५१,४७३ रुपये एवढी आहे. 

 

टॅग्स :electricityवीज