शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

182 गावांची बत्ती केली गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 05:00 IST

गावातील पथदिव्यांचे वीज बिल जिल्हा परिषदेकडून भरले जात होते. मात्र, मध्यंतरी शासनाने त्यावर बंदी लावली आहे. परिणामी गावातील पथदिव्यांपोटी ग्रामपंचायतींना येणारे भरमसाट बिल भरण्याची त्यांची ताकद नाही. अशात ग्रामपंचायतींवर वीज बिलाची थकबाकी वाढत चालली होती. थकबाकीच्या गंभीर समस्येशी महावितरण अगोदरच लढत असून, त्यात ग्रामपंचायतींची पथदिव्यांची कोट्यवधींची थकबाकी अधिकच डोकेदुखी ठरत होती. अशात महावितरणने ग्रामपंचायतींची जोडणी कापण्यास सुरूवात केली. 

कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गावातील पथदिव्यांचे वीज बिल कोण भरणार, हा विषय अद्याप सुटलेला नसल्याने वीज बिल थकलेल्या जिल्ह्यातील १८२ ग्रामपचायतींची बत्ती महावितरणने गुल केली आहे. परिणामी या गावांतील पथदिवे बंद असून, आता पावसाळ्याच्या तोंडावर ही गावे अंधारात आहेत. गावातील पथदिव्यांचे वीज बिल जिल्हा परिषदेकडून भरले जात होते. मात्र, मध्यंतरी शासनाने त्यावर बंदी लावली आहे. परिणामी गावातील पथदिव्यांपोटी ग्रामपंचायतींना येणारे भरमसाट बिल भरण्याची त्यांची ताकद नाही. अशात ग्रामपंचायतींवर वीज बिलाची थकबाकी वाढत चालली होती. थकबाकीच्या गंभीर समस्येशी महावितरण अगोदरच लढत असून, त्यात ग्रामपंचायतींची पथदिव्यांची कोट्यवधींची थकबाकी अधिकच डोकेदुखी ठरत होती. अशात महावितरणने ग्रामपंचायतींची जोडणी कापण्यास सुरूवात केली. महावितरणच्या या कठोर कारवाईमुळे मध्यंतरी चांगलेच वादळही उठले होते. त्यातच सरपंच संघटनांनी वीज या प्रकाराचा विरोध करून वीज बिल जिल्हा परिषदेने (शासनानेच) भरावे, यासाठी प्रयत्नही चालविले होते. मात्र, त्यानंतरही या विषयावर काहीच तोडगा निघाला नाही. कारण आजही जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींची बत्ती महावितरणने गुल केली आहे. 

पावसाळा बघता गावकऱ्यांना भीती- पावसाळा म्हटला म्हणजे आजारांचा काळ असून, त्यात सरपटणारे विषारी प्राणीसुद्धा जोर घेतात. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात कीटक व सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका जास्त असतो. अशात महावितरणने पथदिव्यांची जोडणी कापल्यामुळे ही गावे अंधारात राहणार आहेत. यामुळे पावसाळा बघता गावकरी भीतीत वावरत आहेत. 

 २.८४ कोटींची थकबाकी 

- महावितरणची जिल्हावासीयांवर अगोदरच कोट्यवधीच्या घरात थकबाकी असून, ती भरून काढण्यासाठी महावितरणकडून सातत्याने मोहीम राबविली जात आहे. मात्र, त्यानंतरही पाहिजे त्या प्रमाणात वसुली होत नसून दरमहा त्यात भर पडत जाते. हाच प्रकार ग्रामपंचायतींच्या बाबतीत घडला असून, महावितरणचे १८२ ग्रामपंचायतींवर २,८४,०६,१९८ रुपये थकून आहेत. परिणामी महावितरणला एवढा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. सर्वाधिक थकबाकी अर्जुनी - मोरगाव तालुक्यावर - जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींवर महावितरणची २.८४ कोटींची थकबाकी असतानाच यातील सर्वाधिक १,६६,७४,१२१ रुपये अर्जुनी - मोरगाव तालुक्यावर थकून आहेत, तर सर्वात कमी थकबाकी तिरोडा तालुक्यावर ३,५१,४७३ रुपये एवढी आहे. 

 

टॅग्स :electricityवीज