शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

निवडून येण्यासाठी उमेदवारांमध्ये पैज

By admin | Updated: August 1, 2015 02:11 IST

जून व जुलै महिन्यांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्या.

आमगाव : जून व जुलै महिन्यांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्या. अनेक पक्षांनी संपूर्ण ताकद पणाला लावून सत्ता स्थापित करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. यात कुणाला यश तर काहींना अपयश पत्करावे लागले. आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते २ आॅगस्ट रोजी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदांच्या निवडणुकीकडे. यातील उमेदवारांमध्ये निवडून येण्याकरिता पैज लागली आहे. त्याचप्रकारे जे मतदान करणारे मतदार आहेत त्यांची मांदियाळी लागली असून उमेदवारांकडून त्यांची चांगलीच चांदी होत आहे.सन १९६१ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. मात्र जवळपास तीन वर्षे प्रशासकीय कारवाईमुळे सभापती किंवा निवडणुका झाल्या नाही. त्यावेळी बाजार समितीचे प्रारूप छोटे होते. सन १९६४ मध्ये निवडणुका झाल्यानंतर पहिले सभापती मदनलाल शर्मा झाले. त्यानंतर ५४ वर्षाच्या कालखंडात तीन वर्षे वगळता ५१ वर्षांत १० सभापती वेगवेगळ्या पार्टीचे खुर्चीवर विराजमान झाले. सहा वेळा प्रशासकांनी बाजार समिती चालविली.येणाऱ्या निवडणुकीबाबत संपूर्ण उमेदवारांचा आढावा घेतला असता राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण भागातून आपले उमेदवार दिले, तर काँग्रेस-भाजप युती झाल्याने नगरातील अनेक दिग्गज मैदानात उतरले आहेत. एकंदरीत सत्तेची भागीदारी ही नगरातच राहिली पाहिजे, असा कदाचित दिग्गजांचा मानस असला पाहिजे. त्याचप्रमाणे व्यापारी गटातून जे उमेदवार सत्तेसाठी हालचल करीत आहेत, त्यात मतदारांसमोर मोठी द्विधा मन:स्थिती दिसत आहे. सर्वच आपले, मग निवडून कुणाला द्यायचे, हा प्रश्न मतदारांसमोर घर करून उभा आहे. तात्पर्य या निवडणुकीत कोण जिंकणार व कोण हारणार, हे येणाऱ्या ३ आॅगस्टला समजेल. तसेच नगरातील सट्टा बहाद्दरांनासुद्धा भाव लावता येत नाही, असे चित्र समोर आहे. (तालुका प्रतिनिधी)