शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आठ टक्के रोवण्या आटोपल्या

By admin | Updated: July 14, 2015 02:15 IST

गेल्या ४-५ दिवसात पावसाने हजेरी लावल्याने रोवण्यांनी वेग घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात आठ टक्के रोवण्या

गोंदिया : गेल्या ४-५ दिवसात पावसाने हजेरी लावल्याने रोवण्यांनी वेग घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात आठ टक्के रोवण्या आटोपल्याची माहिती कृषी विभागाने दिली. दरम्यान शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, कीटकनाशके, खते मिळण्यासाठी कृषी केंद्रांची तपासणी वाढविली असून अनियमितता बाळगणाऱ्या ११ कृषी केंद्रांना कृषी विभागाने नोटीस बजावत परवाने निलंबनाची टांगती तलवार उभी केली आहे.ऐन लागवडीच्या हंगामात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. आता ग्रामपंचायत निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण वातावरण ढवळून निघत आहे. अशा परिस्थितीत यावर्षी शेतीकडे अनेकांचे बऱ्याच प्रमाणात दुर्लक्ष झाले असले तरी आता रोवणीयोग्य पाऊस झाल्याने आणि नर्सरीही तयार झाली असल्याने ग्रामीण भागात रोवणीसाठी लगबग सुरू आहे.जिल्ह्यात भात लागवडीचे क्षेत्र १ लाख ८४ हजार ९०० हेक्टर आहे. त्यापैकी ५ हजार १६३ हेक्टरमध्ये रोवणी तर १० हजार २०९ हेक्टरमध्ये आवत्या झाल्या आहेत. एकूण १५ हजार ३७२ हेक्टरमध्ये भातपिकाची लागवड झाली आहे. रोपवाटिकांची (नर्सरी) लागवड पूर्णपणे आटोपली आहे. मधल्या काळात पावसाने दांडी मारल्यामुळे रोपे मरणासन्न होण्याच्या मार्गावर होती. मात्र ५-६ दिवसांपासून पाऊस हजेरी लावत असल्याने रोपांना जीवदान मिळण्यासोबतच रोवण्याही मार्गी लागल्या आहेत. शेतकऱ्यांची कृषी साहित्य विक्रेत्यांकडून कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये, शेतकऱ्यांना चांगल्या प्रतिचे बियाणे मिळावे, म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार कृषी कार्यालयाच्या गुण नियंत्रण विभागाने जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रांची रँडमली तपासणी सुरू केली आहे. त्यात आतापर्यंत २७७ केंद्रांची तपासणी आटोपली असून ११ केंद्रांमध्ये अनियमितता आढळल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या केंद्रांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांचे परवाने निलंबित केले जाणार आहेत. या कारवाईदरम्यान ५२२ क्विंटल बियाण्यांच्या विक्रीस बंदी घालण्यात आली. त्या बियाण्यांची किंमत ३६ लाख ५४ हजार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)शेतकऱ्यांनी वापरले घरचेच बियाणेयावर्षी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार ४६ हजार ३५० क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली होती. प्रत्यक्षात ४५ हजार १२० क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. मात्र त्यापैकी २६ हजार ९३६ क्विंटल बियाण्यांचीच विक्री होऊ शकली. शिल्लक असलेले बियाणे कंपन्यांकडे परत पाठविले जात आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी स्वत:च्याच शेतातील बियाणे वापरण्यास प्राधान्य दिल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले जात आहे. स्वत:च्या शेतात उगविलेल्या धानावर मिठाच्या पाण्यात प्रक्रिया करून ते बियाणे म्हणून दोन वर्ष वापरता येऊ शकतात, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.तूर, तीळ, उसाचीही लागवडजिल्ह्यात प्रमुख पिक धान असले तरी इतरही पिकांची लागवड केली जाते. आतापर्यंत लागवड झालेल्या इतर पिकांमध्ये तूर २७४२ हेक्टर, तीळ ३४३ हेक्टर, ऊस १०१ हेक्टर, भाजीपाला १२७ हेक्टर, हळद ९२ हेक्टर, अद्रक ६ हेक्टर, केळी ३ हेक्टर या पिकांचाही समावेश आहे.गेल्यावर्षीपेक्षा पाऊस चांगलायावर्षी पावसाने मधल्या काळात थोडी विश्रांती घेतली असली तरी दुबार पेरणीची वेळ येईल अशी अवकृपा पावसाने केलेली नाही. गेल्यावर्षी १३ जुलैपर्यंत जिल्ह्यात अवघा ११०.१ मिमी (सरासरीच्या २७.२ टक्के) पाऊस बरसला होता. यावर्षी ३३४.९ मिमी (सरासरीच्या ८२.०६ टक्के) पाऊस बरसला आहे. अशी स्थिती कायम राहिली तर यावर्षी पिकांची स्थिती उत्तम राहण्याची आशा आहे.या कृषी केंद्रांवर निलंबनाची टांगती तलवार दुर्गा कृषी केंद्र, परसोडी, ता.सडक अर्जुनी हिमालय कृषी केंद्र, गोरेगाववक्रतुंड कृषी केंद्र, अर्जुनी मोरगावविजय कृषी केंद्र, सालेकसा अंबिका कृषी केंद्र, नवेगावबांध अंबुले कृषी केंद्र, सालेकसा जयकिसान कृषी केंद्र, रावणवाडी उन्नती कृषी केंद्र, देवरी जयदुर्गा कृषी केंद्र, आमगाव परमात्मा एक कृषी केंद्र, कावराबांध चेतन कृषी केंद्र, आमगाव