शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

प्रशिक्षणातून उद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 21:38 IST

ग्रामीण भागातील युवकांनी केवळ कौशल्य विकास प्रशिक्षण देवून होणार नाही, तर त्यांना आर्थिक पाठबळ देवून त्यांना रोजगाराभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न आहे,

ठळक मुद्देराजकुमार बडोले : कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ

आॅनलाईन लोकमतअर्जुनी-मोरगाव : ग्रामीण भागातील युवकांनी केवळ कौशल्य विकास प्रशिक्षण देवून होणार नाही, तर त्यांना आर्थिक पाठबळ देवून त्यांना रोजगाराभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न आहे, यासाठी आम्ही किमान १०० उद्योजक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तयार करण्याचा डिक्कीसोबत करार केला आहे. ग्रामीण भागात कौशल्य विकास प्रशिक्षणातून उद्योजक उभे करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), डी-गेन ग्रुप व एबी अँड सी स्किल अँड एज्युकेशन यांच्या माध्यमातून अनुसूचित प्रवर्गातील युवक व युवतींसाठी लॉजिस्टिक सेक्टर व जीएसटी अकांउंट क्षेत्रातील मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष रचना गहाणे होत्या. यावेळी पं.स.सभापती अरविंद शिवणकर, भाजपा तालुकाध्यक्ष उमाकांत ढेंगे, गटविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार, खरेदी विक्र ी केंद्राचे अध्यक्ष नामदेव कापगते, ठाणेदार प्रशांत भस्मे, शिवनारायण पालीवाल, भाजप जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, माजी सभापती प्रकाश गहाणे, न.प.उपाध्यक्ष विजय कापगते, रघुनाथ लांजेवार, रामदास कोहाडकर, मुरलीधर ठाकरे, डि-गेनचे संचालक तुषार राठी, विनोद ठोंबरे, एबी अँड सीचे अक्षय बाहेती, नागपूर बार्टीच्या सहायक प्रकल्प संचालक नेहा ठोंबरे प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलतांना पालकमंत्री बडोले यांनी, कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ९०० मुलींना प्रशिक्षित करून रोजगारभिमुख करण्यात आले आहे. बार्टीच्या माध्यमातून राज्यातील २० मुलींना एअरहोस्टेजमध्ये काम मिळाले आहे. आता आपले सर्व लक्ष ग्रामीण भगातील मुलांमुलींकडे असून त्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभे करणे आहे. राज्यात साडेबारा हजार बँक आहेत. एका बँकमधून मुद्रा योजनाच्या माध्यमातून २ उद्योजकांना आर्थिक सहाय्य मिळायला पाहिजे. म्हणजे २५ हजार उद्योजक उभे व्हायला पाहिजे. मात्र, बँकेच्या उदासिन धोरणामुळे राज्यात आतापर्यंत अनुसूचित जातीचे ५००, अनुसूचित जमातीचे १०० तर २७७४ महिला उद्योजक असे एकूण आतापर्यंत ३३७४ उद्योजक तयार झाले असल्याचे त्यांनी सांगीतले.राज्यातील बेरोजगारीचे निर्मुलन झाले पाहिजे, असे सांगत नामदार बडोले यांनी, शिक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवक-युवतींना रोजगाराभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बार्टीच्या माध्यमातून २० टक्के ओबीसी युवक-युवतींनाही या प्रशिक्षणाचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन देवून पुढील महिन्यात ४ ते ५ कोटींचे साहित्य दिव्यांगाना वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रास्तावीक झिल इन्फोटेकचे संचालक माणिक मेश्राम यांनी मांडले. संचालन प्रा. दिलीप काकडे यांनी केले. आभार तृप्ती मेश्राम यांनी मानले.