शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

कृषी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता

By admin | Updated: June 11, 2014 00:08 IST

शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवीत असते. या योजनांची पूर्तता अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते. मात्र कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनेक योजनांचा बट्ट्याबोळ झाला आहे.

गोंदिया : शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवीत असते. या योजनांची पूर्तता अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते. मात्र कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनेक योजनांचा बट्ट्याबोळ झाला आहे. अनेक शेतकरी कृषीविषयक शासकीय योजनांपासून अनभिज्ञ आहेत. या शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना वेळेवर दिली जात नसल्याचे मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. गोंदिया जिल्हा हा धानपिकाचा जिल्हा तसेच तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील बहुतांश लोक हे शेतीव्यवसायावर अवलंबून आहेत. सुधारित तंत्रज्ञानाच्या आधारावर शेतकऱ्यांकरिता अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, राष्ट्रीय कडधान्य विकास कार्यक्रम, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, गतीमान पाणलोट, मृदा जलसंधारण कार्यक्रम, शेततळे, शेतबोडी, खोलीकरण, सेंद्रीय खताचा समतोल व एकात्मिक वापर पीक संरक्षण योजना, अनुसूचित जाती-जमाती उपाययोजना, अनुदानावर शेती औजारे वाटप अशा अनेक योजना राबविल्या जातात. या सर्व योजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्यामुळे त्या योजना कुणाच्या घशात जातात? हा चिंतनाचाच विषय आहे. योजना बळकाविणाऱ्यांचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. यामुळे योजनांचा बट्ट्याबोळ होणार नाही. योजनांचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचविता येईल. याकडे विशेषत्वाने लक्ष दिले गेले पाहिजे. शेततळे व शेतबोळी या योजनेमध्ये ज्यांच्या शेतावर बोळी आहे किंवा नाही, याची पाहणी करणे गरजेचे आहे. मात्र प्रत्यक्षात पाहणी न करता ज्यांच्याकडे बोळी आहे, अशा लाभार्थ्यांच्या शेतावरच बोळी मंजूर केली जाते. कधीकधी तर पात्र लाभार्थ्यांपर्यंत या विषयीची माहितीच पुरविण्यात येत नाही. यामुळे शासनाच्या चांगल्या योजनेपासून शेतकरी वंचित राहतात. पाणलोट क्षेत्रांतर्गत श्री पध्दत व चारसूत्री पध्दतीने रोपांची लागवड करण्यासाठी शेतीशाळा व मार्गदर्शन केले जाते. परंतु या उपक्रमाचा फास कशासाठी? असा प्रश्नही उपस्थित केला जातो. त्यामुळे योग्य मार्गदर्शन शेतकऱ्यांना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी रासायनिक खत व औषधांचा पुरवठा वेळेवर उपलब्ध करून दिला जात नाही. मात्र योजनेच्या नावावर शेतीसाठी प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षणाचा निधी अधिकारी व कर्मचारी कुठे गहाळ करतात, हेच कळत नाही. प्रशिक्षणात उपस्थित नसणाऱ्यांची नावे लिहून प्रशिक्षणात याचे पुरावे जोडण्यात येतात. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कृषी कागदपत्रांची जुळवाजुळव करून कृषी विभागाच्या कार्यालयात जातात. तोपर्यंत योजनांची मूदत संपलेली असते. गरीब, गरजू व पात्र लाभार्थ्यांना माहिती देण्यास सबंधित विभागाचे अधिकारी टाळाटाळ करीत असतात. या योजनांचा लाभ फक्त अधिकाऱ्यांच्या निकटवर्ती नातेवाईकांना किंवा श्रीमंत शेतकऱ्यांना मिळत असल्याचे बोलले जाते. एवढेच नव्हे तर कृषी पीकसंदर्भातील माहितीही सबंधित विभागाच्या कार्यालयातून दिली जात नाही. यामुळे कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी माहिती संदर्भात दिरंगाई का करतात, हे न उलगडणारे कोडे ठरले आहे. या योजनांची योग्यप्रकारे अंमलबजावणी होते की नाही, याची पाहणी करण्याकरिता कोणतीही प्रभावी यंत्रणा कार्यरत नाही. यामुळे कृषी योजनांपासून वंचित राहण्याची वेळ कृषी विभागामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी येते. या योजनांची माहिती गरजू शेतकऱ्यांना वेळोवेळी देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)