शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

कृषी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता

By admin | Updated: June 11, 2014 00:08 IST

शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवीत असते. या योजनांची पूर्तता अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते. मात्र कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनेक योजनांचा बट्ट्याबोळ झाला आहे.

गोंदिया : शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवीत असते. या योजनांची पूर्तता अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते. मात्र कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनेक योजनांचा बट्ट्याबोळ झाला आहे. अनेक शेतकरी कृषीविषयक शासकीय योजनांपासून अनभिज्ञ आहेत. या शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना वेळेवर दिली जात नसल्याचे मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. गोंदिया जिल्हा हा धानपिकाचा जिल्हा तसेच तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील बहुतांश लोक हे शेतीव्यवसायावर अवलंबून आहेत. सुधारित तंत्रज्ञानाच्या आधारावर शेतकऱ्यांकरिता अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, राष्ट्रीय कडधान्य विकास कार्यक्रम, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, गतीमान पाणलोट, मृदा जलसंधारण कार्यक्रम, शेततळे, शेतबोडी, खोलीकरण, सेंद्रीय खताचा समतोल व एकात्मिक वापर पीक संरक्षण योजना, अनुसूचित जाती-जमाती उपाययोजना, अनुदानावर शेती औजारे वाटप अशा अनेक योजना राबविल्या जातात. या सर्व योजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्यामुळे त्या योजना कुणाच्या घशात जातात? हा चिंतनाचाच विषय आहे. योजना बळकाविणाऱ्यांचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. यामुळे योजनांचा बट्ट्याबोळ होणार नाही. योजनांचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचविता येईल. याकडे विशेषत्वाने लक्ष दिले गेले पाहिजे. शेततळे व शेतबोळी या योजनेमध्ये ज्यांच्या शेतावर बोळी आहे किंवा नाही, याची पाहणी करणे गरजेचे आहे. मात्र प्रत्यक्षात पाहणी न करता ज्यांच्याकडे बोळी आहे, अशा लाभार्थ्यांच्या शेतावरच बोळी मंजूर केली जाते. कधीकधी तर पात्र लाभार्थ्यांपर्यंत या विषयीची माहितीच पुरविण्यात येत नाही. यामुळे शासनाच्या चांगल्या योजनेपासून शेतकरी वंचित राहतात. पाणलोट क्षेत्रांतर्गत श्री पध्दत व चारसूत्री पध्दतीने रोपांची लागवड करण्यासाठी शेतीशाळा व मार्गदर्शन केले जाते. परंतु या उपक्रमाचा फास कशासाठी? असा प्रश्नही उपस्थित केला जातो. त्यामुळे योग्य मार्गदर्शन शेतकऱ्यांना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी रासायनिक खत व औषधांचा पुरवठा वेळेवर उपलब्ध करून दिला जात नाही. मात्र योजनेच्या नावावर शेतीसाठी प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षणाचा निधी अधिकारी व कर्मचारी कुठे गहाळ करतात, हेच कळत नाही. प्रशिक्षणात उपस्थित नसणाऱ्यांची नावे लिहून प्रशिक्षणात याचे पुरावे जोडण्यात येतात. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कृषी कागदपत्रांची जुळवाजुळव करून कृषी विभागाच्या कार्यालयात जातात. तोपर्यंत योजनांची मूदत संपलेली असते. गरीब, गरजू व पात्र लाभार्थ्यांना माहिती देण्यास सबंधित विभागाचे अधिकारी टाळाटाळ करीत असतात. या योजनांचा लाभ फक्त अधिकाऱ्यांच्या निकटवर्ती नातेवाईकांना किंवा श्रीमंत शेतकऱ्यांना मिळत असल्याचे बोलले जाते. एवढेच नव्हे तर कृषी पीकसंदर्भातील माहितीही सबंधित विभागाच्या कार्यालयातून दिली जात नाही. यामुळे कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी माहिती संदर्भात दिरंगाई का करतात, हे न उलगडणारे कोडे ठरले आहे. या योजनांची योग्यप्रकारे अंमलबजावणी होते की नाही, याची पाहणी करण्याकरिता कोणतीही प्रभावी यंत्रणा कार्यरत नाही. यामुळे कृषी योजनांपासून वंचित राहण्याची वेळ कृषी विभागामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी येते. या योजनांची माहिती गरजू शेतकऱ्यांना वेळोवेळी देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)