शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

शिक्षणमंत्र्यांची घोषणा हवेतच

By admin | Updated: November 7, 2015 01:54 IST

गुरुजी अर्थात शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता, प्रगतीची बाग फुलविणारा महत्वाचा घटक. मात्र सध्या सर्व शिक्षकवृंद आर्थिक अडचणीला सामोरे जात आहेत.

जिल्हा परिषद : शिक्षकांचे पगार उशिराचइंदोरा बु : गुरुजी अर्थात शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता, प्रगतीची बाग फुलविणारा महत्वाचा घटक. मात्र सध्या सर्व शिक्षकवृंद आर्थिक अडचणीला सामोरे जात आहेत. यासाठी शासनाचे धोरण कारणीभूत ठरत आहे. त्यांच्यासाठी केलेल्या घोषणाही हवेतच विरत आहेत.शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीररित्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिक्षकांना महिन्याच्या १ तारखेला वेतन दिले जाईल असे जाहीर केले होते. मात्र त्यांचे आश्वासन केवळ हवेतच राहिले. आॅगस्ट महिना संपला, सप्टेंबर व आॅक्टोबर महिनेही गेले पण कोणत्याच महिन्यात १ तारखेला पगार झाले नाही. जिल्हा परिषदेच्या इतर विभागाकडे, वित्त विभागाकडे भरगच्च निधी असतो. काही विभाग हे कमिशनवर चालतात. तेथे निधी भरगच्च व शिक्षकांच्या पगारासाठी हेच जिल्हा परिषद मात्र शून्य अवस्थेत असते, याला कारणीभूत कोण? असा प्रश्न निर्माण होतो. पंचायत समिती स्तरावर शिक्षकांना कामे असतात. तेथेही शिक्षकांना अपमानित व्हावे लागते. शिक्षक सेवा पुस्तिकेत नोंदीसाठी गेले असता लिपिकाद्वारे शिक्षकांची कामे केली जात नाही. सहा महिन्यांपासून दिलेल्या पत्राची नोंदसुद्धा करण्यात येत नाही व शिक्षकांना पंचायत समितीच्या चकरा माराव्या लागतात, असेही शिक्षकांचे म्हणणे आहे. अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या शिक्षकांचे प्रश्न केव्हा मार्गी लागतील, हे अजून तरी कोणीच ठामपणे सांगू शकत नाही. मात्र केवळ आश्वासनांची खैरात वाटली जाते, एवढे मात्र खरे. शासनाने शब्दाला जागावे अशी अपेक्षा केली जात आहे. (वार्ताहर)