शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शिक्षण विभाग म्हणतो तयार है हम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:31 IST

गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. दोन महिन्यापूर्वी शासनाने आठवी ...

गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. दोन महिन्यापूर्वी शासनाने आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या. त्यानंतर आता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा येत्या ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी घेतला. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जि.प.शिक्षण विभाग शाळा सुरु करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमांचे पालन करून ४ ऑक्टोबरपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्षात सुरु केल्या जाणार आहे. त्यामुळे आता ४ ऑक्टोबरपासून तब्बल दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजणार हे निश्चित झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सद्यस्थितीत ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र यामुळे बरेच विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची समस्या असल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हीच बाब लक्षात घेत आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि.२४) शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनंतर पहिली ते सातवीचे विद्यार्थी शाळेत प्रत्यक्षात हजेरी लावणार आहेत. जिल्ह्यात पहिली ते सातवीच्या एकूण १६६९ शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण १ लाख ३३ हजार १५६ विद्यार्थी आहेत. या शाळा सुरू करण्यासाठी वर्गखोल्यांचे सॅनिटायजेशन आणि रंगरगोटीचे कामसुध्दा पूर्ण झाले आहे. या सर्व शाळांमध्ये एकूण ३७६४६ शिक्षक व कर्मचारी कार्यरत असून यापैकी जवळपास सर्व शिक्षकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यास कुठलीच अडचण नसल्याने शिक्षण विभागाने सांगितले.

..............

सूचनांकडे लक्ष

राज्य शासनाने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. मात्र शाळा सुरु करताना कुठल्या गोष्टी करायच्या, ग्रामपंचायत आणि शालेय व्यवस्थापन यांची मंजुरी आणि पालकांचे सहमती पत्र लागणार का? एका वर्गात किती विद्यार्थी बसवायचे यासंदर्भात शासनाच्या काय सूचना येतात यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

...............

पालकांच्या संमिश्र प्रतिक्रिया

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आहे. तर मागील दोन महिन्यापासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरू आहेत. मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी आणि पालकसुध्दा कंटाळले आहे. त्यामुळे शासनाने शुक्रवारी शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे पालकांनी स्वागत केले. मात्र कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नसल्याने काही पालकांनी काळजीसुध्दा व्यक्त केली.

..............

जिल्ह्यातील एकूण शाळा : १६६९

जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी संख्या : १,३३१५६

.......................

इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची विद्यार्थी संख्या

इयत्ता पहिली : १४५६५

इयत्ता दुसरी : १८५४२

इयत्ता तिसरी : २०४७६

इयत्ता चौथी : २०४०६

इयत्ता पाचवी : १९६६४

इयत्ता सहावी : १९४४०

इयत्ता सातवी : २००६३

..............................

कोट

राज्य सरकारने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी जि.प.शिक्षण विभाग सज्ज आहे. शाळा सुरू करण्यासाठी कुठलीच अडचण नाही.

- अनिल चव्हाण, उपशिक्षणाधिकारी.