शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

प्रकल्पात शिक्षण विभागाचा अडथळा

By admin | Updated: September 10, 2014 23:48 IST

जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी व त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी गावची-शाळा आमची शाळा हा प्रकल्प शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे

सालेकसा : जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी व त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी गावची-शाळा आमची शाळा हा प्रकल्प शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे शिक्षणासंबंधीच्या सर्व तक्रारींचे समाधान करण्यात येणार आहे. पण ज्या शिक्षण विभागाद्वारे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे, तेच बेजबाबदारीने वागून या प्रकल्पात अडथळे निर्माण करीत आहेत. पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी हे पद अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकारी हे पद खंडविकास अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आले होते. आता नवीन गटशिक्षणाधिकारी येणार अशी चर्चा आहे. शिक्षण विभागातील कर्मचारीमंडळी कार्यालयीन वेळेत पूर्णवेळ राहत नाही. शिक्षक मंडळी अप-डाऊन करुन शाळेत वेळेवर पोहोचत नाही. कार्यालयीन कामाच्या नावावर सुट्या मारण्यात त्यांना धन्यता वाटते. शिक्षकांचे दोन-दोन महिने पगार होत नाही. त्यामुळे त्यांना मानसिक त्रासही होत असतो. पगार झाले तर बँकेची लिंक फेल असते. त्यासाठी शिक्षकांना शाळा सोडून बँकेच्या चकरा माराव्या लागतात. काही शाळेतील शिक्षक नेहमी गैरहजर असून अजूनही त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई झाली नाही. या सर्व कारणांमुळे मुलांच्या शैक्षणिक कार्यावर परिणाम होत आहे. सकाळ पाळीत काही शिक्षक बाहेर गावावरुन येणारे सकाळी ८ वाजतानंतर शाळेत पोहोचून आपले प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असतात. जेव्हा की सकाळपाळीत ७.३० वाजता येणे आवश्यक आहे.या प्रकारामुळे गावची शाळा आमची शाळा हा प्रकल्प अडचणीत आला आहे. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचे दोन पद रिक्त आहेत. या प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी काम करण्याची कर्मचाऱ्यांची मानसिकता नाही. काही शिक्षकांना हा उपक्रम म्हणजे गळ्यात लोंढणे वाटते. आदिवासी, नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करताना नक्षलभत्ता घेताना आदिवासी मुलांसाठी जास्त वेळ शिक्षण देताना दिसत नाही. तर त्यांच्या शिकविण्याच्या अधिकृत वेळेतही शिक्षक चाट मारत असतात. त्यामुळे ‘गावची शाळा आमची शाळा’ हा शिक्षण विभागातील कर्मचारी व शिक्षकांमुळे अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)