शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गूळ-शेंगदाणे खा आणि हिमोग्लोबिन झटपट वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 05:00 IST

कुटुंबाच्या गरजांची पूर्तता करताना महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असून याचे परिणाम मात्र त्यांना भोगावे लागतात. हेच कारण आहे की, सर्वप्रथम महिलांमध्ये हिमोग्लोबिनच्या कमतरतेची समस्या जाणवते. मासिक पाळीतून अतिरक्तस्त्राव, खान-पानाकडे दुर्लक्ष, गरोदरपणात पोषक आहार न घेणे आदी कारणांमुळे महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होते. अशात महिलांमध्ये कमजोरी, चिडचिडेपणा, शरीरावर पांढरेपणा आदी लक्षणे दिसून येतात.

कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  आज महिला पुरुषांच्या बरोबर आली असून सर्वच क्षेत्र गाजवत असून, कशा प्रकारेही कमी नाही. असे असतानाही महिला कुटुंबाचा सांभाळ करताना स्वत:ला हरवून बसते, हे सुद्धा तेवढेच सत्य आहे. कुटुंबाच्या गरजांची पूर्तता करताना महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असून याचे परिणाम मात्र त्यांना भोगावे लागतात. हेच कारण आहे की, सर्वप्रथम महिलांमध्ये हिमोग्लोबिनच्या कमतरतेची समस्या जाणवते. मासिक पाळीतून अतिरक्तस्त्राव, खान-पानाकडे दुर्लक्ष, गरोदरपणात पोषक आहार न घेणे आदी कारणांमुळे महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होते. अशात महिलांमध्ये कमजोरी, चिडचिडेपणा, शरीरावर पांढरेपणा आदी लक्षणे दिसून येतात. अवघ्या कुटुंबाचा सांभाळ महिलांच्या खांद्यावर असल्याने महिलांनी वेळीच सावध होऊन आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. 

 हिमोग्लोबिनचे प्रमाण किती हवे? n शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण ग्राम परसेंटमध्ये मोजले जात असून ते कमी झाल्यास शरीरावर त्याचे काही परिणाम लगेच जाणवतात. nभारतातील महिलांमध्ये किमान ११ ग्राम परसेंट हिमोग्लोबिन असणे गरजेचे असून ते कमी झाल्यास महिलांना त्रास जाणवतो. 

कारणे काय? खानपानाकडे लक्ष न देणे, मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव होणे, सिकलसेल व थॅलिसिमिया यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. असे असल्यास महिलांमध्ये कमजोरी, चिडचिडेपणा, भोवळ येणे तसेच शरीर पांढरे दिसणे आदी लक्षणे दिसून येतात. 

पालेभाज्या खा, हिमोग्लोबिन वाढवा शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण ठरवून देण्यात आले असून महिलांमध्ये किमान ११ ग्राम परसेंट असणे गरजेचे आहे. यासाठी पालेभाज्या, फळांमध्ये सफरचंद, अंगूर, पेंडखजूर, अंजिर, बीट आदींचे नियमित सेवन करावे. तसेच गूळ-शेंगदाण्याचे सेवन केल्यानेही हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविता येते. 

वेळीच लक्ष द्यामासिक पाळीत अतिरक्तस्त्राव, खानपानाकडे दुर्लक्ष व गरोदरपणात पोषक आहार न घेणे यामुळे महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. याचे परिणाम होणाऱ्या बाळावरही होतात. याकरिता महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. लक्षणे दिसताच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डॉ. निर्मला जयपुरिया, स्त्रीरोगतज्ज्ञ 

इच्छा असूनही रक्तदान करता येईना

महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता हे कारण त्यांना इच्छा असूनही रक्तदानापासून लांब ठेवते. कारण महिलांमध्ये किमान १२.५ ग्राम परसेंट हिमोग्लोबीन असणे गरजेचे आहे. याशिवाय रक्तदानासाठी इच्छुक महिलेला थायरॉईड, बीपी, शुगर, मासिक पाळी आहे काय, हे सर्व विचारून तसेच वैद्यकीय चाचणी केल्यानंतरच रक्त घेतले जाते. - नितीन रायकवार, तंत्रज्ञ, लोकमान्य रक्तकेंद्र

बहुतांश महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असते व यामुळे त्यांना रक्तदान करता येत नाही. महिलांमध्ये किमान १२.५ ग्राम परसेंट हिमोग्लोबिन व किमान वजन ५० किलो असणे गरजेचे आहे. याशिवाय आवश्यक त्या अन्य चाचण्या केल्या जातात व त्यानंतरच रक्त घेतले जाते. यामुळेच महिलांचे रक्त कमी प्रमाणात घेतले जाते.  - डॉ. सुवर्णा हुबेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी, केटीएस रुग्णालय

 

टॅग्स :Healthआरोग्य