शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

‘हरविणे सोपे तर जिंकणे कठीण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 21:12 IST

कुणाला हरविणे खूप सोपे आहे, पण कुणाला जिंकणे खूपच कठीण आहे. म्हणजेच कुणालाही हरविण्याचा उद्देश न ठेवता त्याला जिंकून पुढे जाण्याचा उद्देश ठेवावा, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या (नवी दिल्ली) सुप्रीमो डॉ. लता महतो यांनी केले.

ठळक मुद्देलता महतो : स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोठणगाव : कुणाला हरविणे खूप सोपे आहे, पण कुणाला जिंकणे खूपच कठीण आहे. म्हणजेच कुणालाही हरविण्याचा उद्देश न ठेवता त्याला जिंकून पुढे जाण्याचा उद्देश ठेवावा, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या (नवी दिल्ली) सुप्रीमो डॉ. लता महतो यांनी केले.येथील दुर्गा चौकातील सांस्कृतिक भवनात स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा रविवारी (दि.८) घेण्यात आला. यात त्या अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करीत होत्या.पाहुणे म्हणून गट विकास अधिकारी नारायण जमईवार, सरपंच जिजा चांदेवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र कोडापे, संस्थाध्यक्ष राजहंस ढोके, उमेदचे कार्यकर्ते व महिला बचत गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.डॉ. महतो पुढे म्हणाल्या, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने वीस कलमी कार्यक्रम बेरोजगारीचा दर कमी करण्यासाठी तयार केला आहे. यामध्ये परंपरागत कलागुणांचा विकास करणे, त्यात उत्पादित मालासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, शिका व कमवा, वुमन हेल्पलाईन सेंटर, उज्ज्वला योजना, राज्य, जिल्हा व तालुका स्थळावर महिला शक्ती केंद्र, शेतकऱ्यांसाठी कृषी विकास योजना आदी योजनांचा समावेश आहे, असे सांगून त्यांनी स्वच्छ भारत स्वच्छता मिशनची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर केल्याचे सांगितले.स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन श्रीशंकर बाबा सेवा प्रतिष्ठान (पुणे) व इटियाडोह जलाशय मत्स्यव्यवसाय विकास संस्था (रामनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यात झाशीनगर, तिडका, येरंडी, दर्रे, पवनीधाबे, जब्बारखेडा, जांभळी, येलोडी, गोठणगाव, संजयनगर, रामनगर, बोंडगाव, सुरबन, गंधारी, जांभळी, प्रतापगड, कढोली येथील महिला बचत गट व उमेदचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. प्रास्ताविक मांडून संचालन करीत आभार संस्थाध्यक्ष राजहंस ढोके यांनी मानले. यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला.