शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

जिल्ह्यातील महामार्गातील निधीचा मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:30 IST

गोंदिया : गोंदिया हे पूर्व विदर्भातील प्रमुख शहर असूनही, स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांपर्यंत राष्ट्रीय महामार्गाला जोडले गेले नव्हते. गोंदिया शहराला ...

गोंदिया : गोंदिया हे पूर्व विदर्भातील प्रमुख शहर असूनही, स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांपर्यंत राष्ट्रीय महामार्गाला जोडले गेले नव्हते. गोंदिया शहराला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांची अवस्था दयनीय होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खा. सुनील मेंढे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी ५२१ कोटी २४ लाख रुपयांचा निधी केंद्रीय महामार्ग विकास मंत्रालयाने मंजूर करून यातील निधीचा मार्ग सुकर केला आहे.

गोंदिया-तिरोडा तसेच गोंदिया-आमगाव या रस्त्याने वाहतूक करताना नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे गोंदियासह आजूबाजूच्या परिसराचा विकास रखडला होता. खा. सुनील मेंढे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दोन्ही महामार्गाच्या विस्तारिकरणासाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी केली होती. बालाघाट टी पॉइंट जंक्शन, गोंदिया येथून सुरू होणाऱ्या चारपदरी गोंदिया-तिरोडा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ साठी २८२ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये गोंदिया शहरातील ४.१० किमी लांबीच्या चारपदरी रस्त्याचा व तिरोडा शहरातील २.६९ किमी अंतराच्या चारपदरी रस्त्याचा (एकूण ६.७९ किमी) समावेश आहे. पतंगा मैदान चौक गोंदिया येथून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ (गोंदिया-आमगाव) साठी २३९ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ज्यामध्ये किडंगीपार क्रॉसिंग आमगाव येथील चारपदरी उड्डाण पुलाचा समावेश आहे. तसेच खमारी, ठाणा व गोरठा या गावांना जोडणाऱ्या २.९५ किमी लांबीच्या चारपदरी रस्त्याचा समावेश आहे. ज्यामध्ये १ मोठा व लहान २२ पुलांचा समावेश आहे.

......

गोंदिया-तिरोडा राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर

मनसर-तिरोडा रस्त्याचे काम सुरू आहे व तिरोडा-गोंदिया व गोंदिया-आमगाव रस्त्याचे काम मंजूर करण्यात आलेले आहे. यातील एक महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ ला, तर दुसरा मनसरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ७५३ ला जोडला जाणार आहे. यामुळे पहिल्यांदाच गोंदिया, तिरोडा आणि आमगाव राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर आले आहे. गोंदिया शहरातून जाणाऱ्या रस्त्यांसाठी ५६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी केंद्रीय मार्ग विकास मंत्रालयाने निधी मंजूर करून जिल्हावासीयांची मागणी मान्य केली आहे.